शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील तणाव वाढवण्यासाठी चीनची 'ऑनलाइन खेळी', भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 07:58 IST

China escalates border tension on Twitter : आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नवी दिल्ली : सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, चीनला (China) सीमेवर तणावाची स्थिती कायम ठेवण्यास रस आहे. त्यामुळे चीनकडून वारंवार सीमेवरील वातावरण बिघडवणाऱ्या कारवाया करण्यात येत आहेत. आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

एवढेच नाही तर या मोहिमेद्वारे अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh)लष्करी कारवाईची धमकीही देण्यात आली आहे. भारतीय सीमेवर (Indian Border) पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People’s Liberation Army)जवानांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेक व्हेरिफाईड आणि अनव्हेरिफाईड अकाऊंटवरून शेअर केले जात आहेत.

'द इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, चीनमध्ये ट्विटरवर बंदी घालण्यात आली असली तरी, भारतीय सीमेवर तैनात असलेल्या पीएलए सैनिकांचे फोटो आणि माहितीने हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे भरून टाकण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे लडाख (Ladakh) आणि अरुणाचल या दोन्ही सीमेवर भारतीय अधिकारी हाय अलर्टवर आहेत. नुकत्याच पेंटागॉनच्या (Pentagon)अहवालात चीनबाबत अनेक खुलासे करण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अधिक सजग आहे.

पेंटागॉनच्या अहवालानंतर दोन दिवसांनी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे की, अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या सीमेवर चिनी सैन्य पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, अन्य एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनने पूर्व लडाखच्या सीमेवर त्यांचे लांब पल्ल्याचे रॉकेट तैनात केले आहे. तसेच, चिनी-समर्थित एका अकाऊंटच्या पोस्टमध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंगमध्ये चिनी सैनिक दाखविले आहेत. याशिवाय इतर अनेक प्रक्षोभक पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.

पेंटागॉनच्या अहवालानंतर सीमेवर अधिक दक्षतादरम्यान, सोशल मीडियावर चिनी कृत्यांवर भारतीय अधिकारी आधीच लक्ष ठेवून असले तरी पेंटागॉनच्या अहवालानंतर त्याला वेग आला आहे. अरुणाचल सीमेवरील वादग्रस्त भागात चीनने 100 घरांचे गाव बांधले आहे, असेही अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, भारताला सीमा वादावर शांततापूर्ण तोडगा हवा आहे आणि तो सातत्याने प्रयत्न करत आहे, पण चीन आपल्या कारवायांना आवर घालत नाही. 

टॅग्स :chinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतIndian Armyभारतीय जवान