शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सीमेवरील तणाव वाढवण्यासाठी चीनची 'ऑनलाइन खेळी', भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 07:58 IST

China escalates border tension on Twitter : आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नवी दिल्ली : सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, चीनला (China) सीमेवर तणावाची स्थिती कायम ठेवण्यास रस आहे. त्यामुळे चीनकडून वारंवार सीमेवरील वातावरण बिघडवणाऱ्या कारवाया करण्यात येत आहेत. आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

एवढेच नाही तर या मोहिमेद्वारे अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh)लष्करी कारवाईची धमकीही देण्यात आली आहे. भारतीय सीमेवर (Indian Border) पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People’s Liberation Army)जवानांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेक व्हेरिफाईड आणि अनव्हेरिफाईड अकाऊंटवरून शेअर केले जात आहेत.

'द इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, चीनमध्ये ट्विटरवर बंदी घालण्यात आली असली तरी, भारतीय सीमेवर तैनात असलेल्या पीएलए सैनिकांचे फोटो आणि माहितीने हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे भरून टाकण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे लडाख (Ladakh) आणि अरुणाचल या दोन्ही सीमेवर भारतीय अधिकारी हाय अलर्टवर आहेत. नुकत्याच पेंटागॉनच्या (Pentagon)अहवालात चीनबाबत अनेक खुलासे करण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अधिक सजग आहे.

पेंटागॉनच्या अहवालानंतर दोन दिवसांनी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे की, अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या सीमेवर चिनी सैन्य पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, अन्य एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनने पूर्व लडाखच्या सीमेवर त्यांचे लांब पल्ल्याचे रॉकेट तैनात केले आहे. तसेच, चिनी-समर्थित एका अकाऊंटच्या पोस्टमध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंगमध्ये चिनी सैनिक दाखविले आहेत. याशिवाय इतर अनेक प्रक्षोभक पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.

पेंटागॉनच्या अहवालानंतर सीमेवर अधिक दक्षतादरम्यान, सोशल मीडियावर चिनी कृत्यांवर भारतीय अधिकारी आधीच लक्ष ठेवून असले तरी पेंटागॉनच्या अहवालानंतर त्याला वेग आला आहे. अरुणाचल सीमेवरील वादग्रस्त भागात चीनने 100 घरांचे गाव बांधले आहे, असेही अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, भारताला सीमा वादावर शांततापूर्ण तोडगा हवा आहे आणि तो सातत्याने प्रयत्न करत आहे, पण चीन आपल्या कारवायांना आवर घालत नाही. 

टॅग्स :chinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतIndian Armyभारतीय जवान