शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील तणाव वाढवण्यासाठी चीनची 'ऑनलाइन खेळी', भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 07:58 IST

China escalates border tension on Twitter : आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नवी दिल्ली : सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, चीनला (China) सीमेवर तणावाची स्थिती कायम ठेवण्यास रस आहे. त्यामुळे चीनकडून वारंवार सीमेवरील वातावरण बिघडवणाऱ्या कारवाया करण्यात येत आहेत. आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

एवढेच नाही तर या मोहिमेद्वारे अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh)लष्करी कारवाईची धमकीही देण्यात आली आहे. भारतीय सीमेवर (Indian Border) पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People’s Liberation Army)जवानांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेक व्हेरिफाईड आणि अनव्हेरिफाईड अकाऊंटवरून शेअर केले जात आहेत.

'द इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, चीनमध्ये ट्विटरवर बंदी घालण्यात आली असली तरी, भारतीय सीमेवर तैनात असलेल्या पीएलए सैनिकांचे फोटो आणि माहितीने हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे भरून टाकण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे लडाख (Ladakh) आणि अरुणाचल या दोन्ही सीमेवर भारतीय अधिकारी हाय अलर्टवर आहेत. नुकत्याच पेंटागॉनच्या (Pentagon)अहवालात चीनबाबत अनेक खुलासे करण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अधिक सजग आहे.

पेंटागॉनच्या अहवालानंतर दोन दिवसांनी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे की, अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या सीमेवर चिनी सैन्य पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, अन्य एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनने पूर्व लडाखच्या सीमेवर त्यांचे लांब पल्ल्याचे रॉकेट तैनात केले आहे. तसेच, चिनी-समर्थित एका अकाऊंटच्या पोस्टमध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंगमध्ये चिनी सैनिक दाखविले आहेत. याशिवाय इतर अनेक प्रक्षोभक पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.

पेंटागॉनच्या अहवालानंतर सीमेवर अधिक दक्षतादरम्यान, सोशल मीडियावर चिनी कृत्यांवर भारतीय अधिकारी आधीच लक्ष ठेवून असले तरी पेंटागॉनच्या अहवालानंतर त्याला वेग आला आहे. अरुणाचल सीमेवरील वादग्रस्त भागात चीनने 100 घरांचे गाव बांधले आहे, असेही अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, भारताला सीमा वादावर शांततापूर्ण तोडगा हवा आहे आणि तो सातत्याने प्रयत्न करत आहे, पण चीन आपल्या कारवायांना आवर घालत नाही. 

टॅग्स :chinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतIndian Armyभारतीय जवान