शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

सीमेवरील तणाव वाढवण्यासाठी चीनची 'ऑनलाइन खेळी', भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 07:58 IST

China escalates border tension on Twitter : आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नवी दिल्ली : सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, चीनला (China) सीमेवर तणावाची स्थिती कायम ठेवण्यास रस आहे. त्यामुळे चीनकडून वारंवार सीमेवरील वातावरण बिघडवणाऱ्या कारवाया करण्यात येत आहेत. आता चीनकडून भारताविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत जुने व्हिडिओ शेअर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

एवढेच नाही तर या मोहिमेद्वारे अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh)लष्करी कारवाईची धमकीही देण्यात आली आहे. भारतीय सीमेवर (Indian Border) पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People’s Liberation Army)जवानांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेक व्हेरिफाईड आणि अनव्हेरिफाईड अकाऊंटवरून शेअर केले जात आहेत.

'द इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, चीनमध्ये ट्विटरवर बंदी घालण्यात आली असली तरी, भारतीय सीमेवर तैनात असलेल्या पीएलए सैनिकांचे फोटो आणि माहितीने हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे भरून टाकण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे लडाख (Ladakh) आणि अरुणाचल या दोन्ही सीमेवर भारतीय अधिकारी हाय अलर्टवर आहेत. नुकत्याच पेंटागॉनच्या (Pentagon)अहवालात चीनबाबत अनेक खुलासे करण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अधिक सजग आहे.

पेंटागॉनच्या अहवालानंतर दोन दिवसांनी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे की, अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या सीमेवर चिनी सैन्य पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, अन्य एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनने पूर्व लडाखच्या सीमेवर त्यांचे लांब पल्ल्याचे रॉकेट तैनात केले आहे. तसेच, चिनी-समर्थित एका अकाऊंटच्या पोस्टमध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंगमध्ये चिनी सैनिक दाखविले आहेत. याशिवाय इतर अनेक प्रक्षोभक पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.

पेंटागॉनच्या अहवालानंतर सीमेवर अधिक दक्षतादरम्यान, सोशल मीडियावर चिनी कृत्यांवर भारतीय अधिकारी आधीच लक्ष ठेवून असले तरी पेंटागॉनच्या अहवालानंतर त्याला वेग आला आहे. अरुणाचल सीमेवरील वादग्रस्त भागात चीनने 100 घरांचे गाव बांधले आहे, असेही अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, भारताला सीमा वादावर शांततापूर्ण तोडगा हवा आहे आणि तो सातत्याने प्रयत्न करत आहे, पण चीन आपल्या कारवायांना आवर घालत नाही. 

टॅग्स :chinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतIndian Armyभारतीय जवान