शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

त्रिपुराचा विजय एकटया मोदींचा नाही, RSS चा ही मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 17:50 IST

त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती.

ठळक मुद्देमागच्या दोनवर्षांपासून संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षात तळागाळात भाजपाच्या विजयासाठी मेहनत घेत होते.त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले.

नवी दिल्ली - त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडच्या दोन राज्यांमधील भाजपाची प्रगती अनेक अंगांनी महत्वपूर्ण आहे. त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती. यापूर्वी अन्य राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भर दिला होता. पण त्रिपुरामध्ये भाजपा पूर्णपणे नरेंद्र मोदींवर अवलंबून नव्हता. भाजपाची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्रिपुरा जिंकण्यासाठी मैदानात उतरला होता.  

मागच्या दोनवर्षांपासून संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षात तळागाळात भाजपाच्या विजयासाठी मेहनत घेत होते. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव, मुख्य निवडणूक रणनितीकार हेमंत बिस्वा सरमा आणि सुनील देवधर हे तिघेही रणनिती आखण्यापासून ते नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी मेहनत घेत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले सुनील देवधर हे 500 पेक्षा जास्त दिवसांपासून त्रिपुरामध्ये तळ ठोकून होते. मोदी सरकारच्या योजना राज्यातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा भर होता. त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना ईशान्येकडच्या राज्यांना भेटी देऊन तिथे सुरु असलेल्या प्रकल्पांमध्ये विशेष लक्ष घालण्याची सूचना केली होती. आरएसएसचे प्रांत प्रमुखही आपल्या संघटनात्मक कार्यावर विशेष लक्ष देत होते. निवडणूक काळात मोदी सरकारमधील एकूण 52 मंत्र्यांनी त्रिपुराचा दौरा केला. यापूर्वी कधीही इतके मंत्री राज्यात फिरकले नव्हते. पंतप्रधानांनी इतके बारीक लक्ष घातल्यामुळे राज्यातील जनतेत विश्वास निर्माण झाला आणि या विश्वासाचे रुपांतर विजयात झाले असे सुनील देवधर यांनी सांगितले. 

सरसंघचालक मोहन भागवतही डिसेंबरमध्ये त्रिपुरात आले होते. बेरोजगारी, विकासाचा अभाव यांना मुद्दा बनवत भाजपाने त्रिपुरात आघाडी घेतली व डाव्यांना आपणच योग्य पर्याय असल्याचे पटवून दिले. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. फक्त 1.54 टक्के मते भाजपाला मिळाली होती. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सर्वच्या सर्व 50 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे अशा राज्यात विजय खेचून आणण्याचे देवधर यांच्यासमोर अत्यंत कठिण आव्हान होते. भाजपाने इथे छोटया पक्षांबरोबर हातमिळवणी केली. आदिवासी पट्टयात जनाधार असलेल्या आयपीएफटी पक्षाबरोबर हातमिळवणी केली. त्याचा भाजपाला मोठा फायदा झाला.                        

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ