शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

त्रिपुराचा विजय एकटया मोदींचा नाही, RSS चा ही मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 17:50 IST

त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती.

ठळक मुद्देमागच्या दोनवर्षांपासून संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षात तळागाळात भाजपाच्या विजयासाठी मेहनत घेत होते.त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले.

नवी दिल्ली - त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडच्या दोन राज्यांमधील भाजपाची प्रगती अनेक अंगांनी महत्वपूर्ण आहे. त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती. यापूर्वी अन्य राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भर दिला होता. पण त्रिपुरामध्ये भाजपा पूर्णपणे नरेंद्र मोदींवर अवलंबून नव्हता. भाजपाची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्रिपुरा जिंकण्यासाठी मैदानात उतरला होता.  

मागच्या दोनवर्षांपासून संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षात तळागाळात भाजपाच्या विजयासाठी मेहनत घेत होते. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव, मुख्य निवडणूक रणनितीकार हेमंत बिस्वा सरमा आणि सुनील देवधर हे तिघेही रणनिती आखण्यापासून ते नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी मेहनत घेत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले सुनील देवधर हे 500 पेक्षा जास्त दिवसांपासून त्रिपुरामध्ये तळ ठोकून होते. मोदी सरकारच्या योजना राज्यातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा भर होता. त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना ईशान्येकडच्या राज्यांना भेटी देऊन तिथे सुरु असलेल्या प्रकल्पांमध्ये विशेष लक्ष घालण्याची सूचना केली होती. आरएसएसचे प्रांत प्रमुखही आपल्या संघटनात्मक कार्यावर विशेष लक्ष देत होते. निवडणूक काळात मोदी सरकारमधील एकूण 52 मंत्र्यांनी त्रिपुराचा दौरा केला. यापूर्वी कधीही इतके मंत्री राज्यात फिरकले नव्हते. पंतप्रधानांनी इतके बारीक लक्ष घातल्यामुळे राज्यातील जनतेत विश्वास निर्माण झाला आणि या विश्वासाचे रुपांतर विजयात झाले असे सुनील देवधर यांनी सांगितले. 

सरसंघचालक मोहन भागवतही डिसेंबरमध्ये त्रिपुरात आले होते. बेरोजगारी, विकासाचा अभाव यांना मुद्दा बनवत भाजपाने त्रिपुरात आघाडी घेतली व डाव्यांना आपणच योग्य पर्याय असल्याचे पटवून दिले. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. फक्त 1.54 टक्के मते भाजपाला मिळाली होती. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सर्वच्या सर्व 50 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे अशा राज्यात विजय खेचून आणण्याचे देवधर यांच्यासमोर अत्यंत कठिण आव्हान होते. भाजपाने इथे छोटया पक्षांबरोबर हातमिळवणी केली. आदिवासी पट्टयात जनाधार असलेल्या आयपीएफटी पक्षाबरोबर हातमिळवणी केली. त्याचा भाजपाला मोठा फायदा झाला.                        

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ