शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

त्रिपुराचा विजय एकटया मोदींचा नाही, RSS चा ही मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 17:50 IST

त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती.

ठळक मुद्देमागच्या दोनवर्षांपासून संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षात तळागाळात भाजपाच्या विजयासाठी मेहनत घेत होते.त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले.

नवी दिल्ली - त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडच्या दोन राज्यांमधील भाजपाची प्रगती अनेक अंगांनी महत्वपूर्ण आहे. त्रिपुरामध्ये भाजपाने मिळवलेला एकहाती विजय आणि नागालँडमध्ये एनडीपीपीच्या साथीने विजयाच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल वाटते तितकी सोपी नव्हती. यापूर्वी अन्य राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भर दिला होता. पण त्रिपुरामध्ये भाजपा पूर्णपणे नरेंद्र मोदींवर अवलंबून नव्हता. भाजपाची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्रिपुरा जिंकण्यासाठी मैदानात उतरला होता.  

मागच्या दोनवर्षांपासून संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षात तळागाळात भाजपाच्या विजयासाठी मेहनत घेत होते. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव, मुख्य निवडणूक रणनितीकार हेमंत बिस्वा सरमा आणि सुनील देवधर हे तिघेही रणनिती आखण्यापासून ते नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी मेहनत घेत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले सुनील देवधर हे 500 पेक्षा जास्त दिवसांपासून त्रिपुरामध्ये तळ ठोकून होते. मोदी सरकारच्या योजना राज्यातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा भर होता. त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना ईशान्येकडच्या राज्यांना भेटी देऊन तिथे सुरु असलेल्या प्रकल्पांमध्ये विशेष लक्ष घालण्याची सूचना केली होती. आरएसएसचे प्रांत प्रमुखही आपल्या संघटनात्मक कार्यावर विशेष लक्ष देत होते. निवडणूक काळात मोदी सरकारमधील एकूण 52 मंत्र्यांनी त्रिपुराचा दौरा केला. यापूर्वी कधीही इतके मंत्री राज्यात फिरकले नव्हते. पंतप्रधानांनी इतके बारीक लक्ष घातल्यामुळे राज्यातील जनतेत विश्वास निर्माण झाला आणि या विश्वासाचे रुपांतर विजयात झाले असे सुनील देवधर यांनी सांगितले. 

सरसंघचालक मोहन भागवतही डिसेंबरमध्ये त्रिपुरात आले होते. बेरोजगारी, विकासाचा अभाव यांना मुद्दा बनवत भाजपाने त्रिपुरात आघाडी घेतली व डाव्यांना आपणच योग्य पर्याय असल्याचे पटवून दिले. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. फक्त 1.54 टक्के मते भाजपाला मिळाली होती. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सर्वच्या सर्व 50 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे अशा राज्यात विजय खेचून आणण्याचे देवधर यांच्यासमोर अत्यंत कठिण आव्हान होते. भाजपाने इथे छोटया पक्षांबरोबर हातमिळवणी केली. आदिवासी पट्टयात जनाधार असलेल्या आयपीएफटी पक्षाबरोबर हातमिळवणी केली. त्याचा भाजपाला मोठा फायदा झाला.                        

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ