शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

त्रिपुरात जमावाने लेनिन यांचा आणखी एक पुतळा पाडला, मार्क्सवाद्यांची कार्यालये व घरेही फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:58 IST

मार्क्सवाद्यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी त्रिपुरातील बेलोनिया शहरातील जागतिक कीर्तीचे महान कम्युनिस्ट नेते व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा जेसीबी मशीनच्या साह्याने पाडून टाकला तर या घटनेच्या दुस-याच दिवशी एका जमावाने सबरुम तालुक्यात लेनिन यांचा आखणी एक पुतळा पाडून टाकला आहे.

आगरतळा - मार्क्सवाद्यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी त्रिपुरातील बेलोनिया शहरातील जागतिक कीर्तीचे महान कम्युनिस्ट नेते व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा जेसीबी मशीनच्या साह्याने पाडून टाकला तर या घटनेच्या दुस-याच दिवशी एका जमावाने सबरुम तालुक्यात लेनिन यांचा आखणी एक पुतळा पाडून टाकला आहे. या घटनेनंतर राज्याच्या अनेक भागात हिंसाचार उसळला आहे. काही भागात पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. अनेक ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कार्यालये तसेच कार्यकर्त्यांच्या घरांचीही तोडफोड करण्यात आली आहे.त्रिपुरातील माकपचे जिल्हा सचिव तापस दत्ता म्हणाले की, राज्यात बेलोनियामध्ये कॉलेज स्क्वेअरमध्ये असलेला लेनिन यांचा पुतळा भाजपा कार्यकर्त्यांनी पाडून टाकला. काही महिन्यांपूर्वीच पॉलिट ब्यूरोचे सदस्य प्रकाश करात यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा पाडल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या. दक्षिण त्रिपुरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंचक इप्पर यांनी सांगितले की, जेसीबी मशीनच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली. हा पुतळा महापालिकेने ताब्यात घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपाल तथागत राय आणि डीजीपी ए. के. शुक्ला यांच्याशी चर्चा राज्यात उसळलेल्या हिंसाचाराबाबत चर्चा केली आहे. त्यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.भाजपाने केला उलटा आरोपमाकपमधून भाजपामध्ये आलेल्या अज्ञात लोकांनी हा हिंसाचार केला, असा दावा भाजपाचे उपाध्यक्ष सुबल भौमिक यांनी केला. माकप कार्यकर्त्यांनीच आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले, असा आरोपही त्यांनी केला.विदेशी नेत्यांच्या पुतळ्यांची भारतात गरज नाही : अहिरसर्व प्रकारच्या हिंसाचाराचा सरकार निषेध करत आहे. मात्र विदेशी नेत्यांच्या पुतळ्यांची भारतात मुळात गरजच नाही. भारतात महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीन दयाल उपाध्याय व राम मनोहर लोहिया यांच्यासारखे बरेच थोर आदर्श आणि विचारवंत होऊन गेले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.माकप कार्यालये फोडलीमाकपची त्रिपुरातील १३४ कार्यालये फोडून आतील सामान लुटले आहे. ६४ कार्यालयांना आगी लावल्या आणि सुमारे ९0 संघटनांच्या कार्यालयांचा ताबा भाजपा व आयपीएफटीच्या कार्यकर्त्यांनी घेतला, असे माकपचे नेते बिजन धर यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या ५१४ कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, कार्यकर्त्यांच्या १५३९ घरांची नासधूस तर १९६ कार्यकर्त्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत. हिंसाचारानंतर श्रीनगर, लेफुंगाख, मंडई, आमतली, मोहनपूरसह दक्षिण त्रिपुरात काही भागात प्रतिबंधक आदेश लागू केले आहेत.तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोडभाजपाचे चिटणीस एच. राजा आणि भाजयुमो तमिळनाडू शाखेचे प्रमुख एस.जी. सूर्या यांनी लेनिनचा पुतळा पाडण्याचे स्वागत करताना, तामिळनाडूतील थोर समाजसुधारक ई.व्ही. रामस्वामी पेरियार यांचा ‘जातीय राजकारणाचे शिरोमणी’ असा उल्लेख करून त्यांचेही पुतळे पाडले जायला हवेत, असे सूचित केल्यानंतर काही तासांतच वेल्लूर येथील पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. हा पुतळा तिरुपत्तूर महापालिकेच्या कार्यालयात होता़ याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यासह दोघांना अटक केली आहे़ दोघेही दारूच्या नशेत होते असे समजते़ यावरून द्रविडी पक्ष आणि दलितांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राजा यांना अटकेची मागणी द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केली. दलित नेते थोल तिरुमवलवन यांनी राजा यांना सत्तेची मस्ती चढल्याचा आरोप केला. हा वाद अंगलट येत असल्याचे दिसताच स्वत: एच. राजा यांनी टिष्ट्वट मागे घेतले व ते त्यांचे व्यक्तिगत मत होते, असे सांगत तमिळनाडू भाजपा अध्यक्ष तमिलीसाई सुंदरराजन यांनी वादातून पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला़

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या