शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

“मोदींवर विश्वास ठेवला होता, BJP ला मदत करुन चूक केली”; पक्षाला रामराम करत नेत्याने केले मुंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 09:33 IST

भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला चितपट करत मुख्यमंत्रीपद कायम राखले.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला होताभाजप पराभूत होत नाही, तोपर्यंत असाच राहणारलोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी विरोधकांचा मुख्य चेहरा असतील

कोलकाता: अलीकडेच भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला चितपट करत मुख्यमंत्रीपद कायम राखले. या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या प्रियंका टिबरेवाल यांचा तब्बल ५८ हजार ८३२ मतांनी पराभव झाला. यानंतर आता भाजपचे त्रिपुरा येथील आमदार आशिष दास यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत आमदारकीचा राजीनामा देत असून, भाजपलाही रामराम करत असल्याचे जाहीर केले. भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा गेला असून, पश्चात्ताप म्हणून कालीघाट येथे दास यांनी मुंडनही केले. (tripura mla ashish das left the bjp party got his head shaved in kolkata as a remorse)

आगामी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच विरोधकांचा मुख्य चेहरा असतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे, असे सांगत त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगितले. तसेच अपेक्षाभंग झाला म्हणून आशिष दास यांनी कोलकाता येथील कालीघाट येथे मुंडन करून घेतले. काही दिवसांपूर्वी आशिष दास यांनी तृणमूल काँग्रेसच्या कोलकाता कार्यालयात जाऊन तृणमूल नेत्यांची भेट घेतली होती, असे सांगितले जात आहे. 

पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला होता

कालीघाट खूपच अद्भूत आणि दिव्य स्थान आहे. येथे आलेल्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते. पश्चात्ताप झाल्याने येथे मुंडन केले आहे. तसेच २०२३ मध्ये भाजप पराभूत होत नाही, तोपर्यंत असाच राहणार आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत आहे. पुढील भूमिका आणि रणनीती लवकरच जाहीर करेन, असे आशिष दास यांनी म्हटले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा विश्वास ठेवला होता. गेली २५ वर्षे चाललेल्या कुशासनातून आम्हाला मुक्ती मिळेल, या अपेक्षेने भाजपला मतदान केले होते, सहकार्य केले. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडणून दिले होते. मात्र, आमच्याकडून चूक झाली, अशी टीका करत आशिष दास यांनी आमदारकी सोडत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य यांनी सांगितले की, यासंदर्भात कोणतीही टिपण्णी करणार नाही. पक्षनेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले. वास्तविक आशिष दास यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत असल्याबाबत औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, लवकरच ते तृणमूल पक्षात प्रवेश करतील, असा कयास बांधला जात आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाTripuraत्रिपुराTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी