शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

“मोदींवर विश्वास ठेवला होता, BJP ला मदत करुन चूक केली”; पक्षाला रामराम करत नेत्याने केले मुंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 09:33 IST

भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला चितपट करत मुख्यमंत्रीपद कायम राखले.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला होताभाजप पराभूत होत नाही, तोपर्यंत असाच राहणारलोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी विरोधकांचा मुख्य चेहरा असतील

कोलकाता: अलीकडेच भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला चितपट करत मुख्यमंत्रीपद कायम राखले. या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या प्रियंका टिबरेवाल यांचा तब्बल ५८ हजार ८३२ मतांनी पराभव झाला. यानंतर आता भाजपचे त्रिपुरा येथील आमदार आशिष दास यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत आमदारकीचा राजीनामा देत असून, भाजपलाही रामराम करत असल्याचे जाहीर केले. भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा गेला असून, पश्चात्ताप म्हणून कालीघाट येथे दास यांनी मुंडनही केले. (tripura mla ashish das left the bjp party got his head shaved in kolkata as a remorse)

आगामी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच विरोधकांचा मुख्य चेहरा असतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे, असे सांगत त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगितले. तसेच अपेक्षाभंग झाला म्हणून आशिष दास यांनी कोलकाता येथील कालीघाट येथे मुंडन करून घेतले. काही दिवसांपूर्वी आशिष दास यांनी तृणमूल काँग्रेसच्या कोलकाता कार्यालयात जाऊन तृणमूल नेत्यांची भेट घेतली होती, असे सांगितले जात आहे. 

पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला होता

कालीघाट खूपच अद्भूत आणि दिव्य स्थान आहे. येथे आलेल्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते. पश्चात्ताप झाल्याने येथे मुंडन केले आहे. तसेच २०२३ मध्ये भाजप पराभूत होत नाही, तोपर्यंत असाच राहणार आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत आहे. पुढील भूमिका आणि रणनीती लवकरच जाहीर करेन, असे आशिष दास यांनी म्हटले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा विश्वास ठेवला होता. गेली २५ वर्षे चाललेल्या कुशासनातून आम्हाला मुक्ती मिळेल, या अपेक्षेने भाजपला मतदान केले होते, सहकार्य केले. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडणून दिले होते. मात्र, आमच्याकडून चूक झाली, अशी टीका करत आशिष दास यांनी आमदारकी सोडत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य यांनी सांगितले की, यासंदर्भात कोणतीही टिपण्णी करणार नाही. पक्षनेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले. वास्तविक आशिष दास यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत असल्याबाबत औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, लवकरच ते तृणमूल पक्षात प्रवेश करतील, असा कयास बांधला जात आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाTripuraत्रिपुराTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी