शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

देशाच्या राजकीय इतिहासात त्रिपुरा निवडणुकीची खास नोंद घेतली जाईल- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 17:01 IST

देशाच्या राजकीय इतिहासात या विजयाची खास नोंद घेतली जाईल.

अगरतळा- त्रिपुरात भाजपाला मिळालेला विजय हा ऐतिहासिक आहे. देशाच्या राजकीय इतिहासात या विजयाची खास नोंद घेतली जाईल. त्रिपुराचा विजय कधीही विस्मृतीत जाणार नाही. आमच्या नव्या सरकारमधील नवे चेहरे त्रिपुराला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी त्रिपुरामध्ये भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. मोदींच्या उपस्थितीत विप्लबकुमार देव यांनी त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधीत केलं.

 

त्रिपुरामध्ये पुन्हा दिवाळीसारखं वातावरण आहे. ज्यांनी भाजपाला मत दिलं नाही, हे त्यांचंही सरकार आहे. जे विरोधीपक्षात निवडून आले त्यांच्याकडे अनुभव आहे. जे सत्तेवर निवडणून आले त्यांच्याकडे उत्साह आहे. दोघांनी मिळून कामं करा, असंही नरेंद्र मोदींनी म्हंटलं. त्रिपुराची ही निवडणूक बोटावर मोजता येणाऱ्या निवडक निवडणुकांपैकी एक आहे ज्याची इतिहासाच चर्चा होईल व विश्लेषण केलं जाईल. भारताच्या राजकारणात अगदी थोड्या निवडणुका आहेत. ज्यांची दिर्घ काळासाठी चर्चा झाली. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराजा विक्रम सिंह यांचीही आठवण काढली. त्रिपुराचा प्रत्येक नागरिक आमचा आहे. सत्तेतील व विरोधीपक्षातील सगळेच आमदार एकत्र मिळून त्रिपुराच्या विकासासाठी काम करतील, असा मला विश्वास आहे. ज्यांनी आम्हाला मत दिलं त्यांच्यासाठी हे सरकार आहेच पण ज्यांनी मत दिलं नाही, हे सरकार त्यांच्यासाठीही असल्याचं मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018