शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वतःचं घरही नसलेले माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आता कुठे राहतात माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 16:04 IST

माणिक सरकार यांनी आपली पिढीजात संपत्ती बहिणींना देऊन टाकली आहे.

आगरतळा- भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री ओळखले जाणारे माणिक सरकार सत्तेतून बाहेर गेल्यावर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये राहत आहेत. आगरतळा येथे पक्षकार्यालयावरती असणाऱ्या दोन खोल्यांच्या सदनिकेत माणिक सरकार आणि त्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य राहत आहेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदावरुन २० वर्षांनी पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे स्वतःचे घर नसल्यामुळे दोघांनाही पक्ष कार्यालयाचा आसरा घ्यावा लागला आहे. आमदार निवासस्थानात राहण्यास सरकार यांनी नकार दिला आहे.माकपाच्या त्रिपुरा विभागाचे सचिव बिजन धर यांनी या कार्यालयामध्ये फारशा सोयी नसल्याचे सांगितले. आमच्या पक्षाच्या नेत्यांचे आयुष्य अत्यंत साधे असल्याचे सांगितले. माणिक सरकार यांनी आपली पिढीजात संपत्ती बहिणींना देऊन टाकली आहे आणि यापूर्वीही ते पक्षाच्या कार्यालयामध्ये राहिलेले आहेत. सरकार यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य यांची त्रिपुरामध्ये स्थावर मालमत्ता होती पण ती एका बांधकाम व्यावसायिकाला दिल्यावर वाद निर्माण झाला होता. या इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सर्व प्रकारच्या सरकारी सोयी मिळतील असे मत मुख्यमंत्री पदाचे दावेदार विप्लव देव यांनी व्यक्त केले असून विरोधी पक्षनेत्यासही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा व भत्ते मिळतील आणि इतर आमदार एमएलए हॉस्टेलमध्ये राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.  माणिक सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्या त्रिपुराच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे असेही देव यांनी सांगितले.

टॅग्स :Manik Sarkarमाणिक सरकारTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018