शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

तिहेरी तलाक विधेयकावर आज राज्यसभेत विरोधकांचं शक्तिप्रदर्शन, सरकारची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:54 AM

Triple Talaq : केंद्र सरकारकडून आज राज्यसभेमध्ये ‘तिहेरी तलाक’ विधेयक मांडण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘ट्रिपल तलाक’ विधेयक आज राज्यसभेत मांडणारराज्यसभेत विरोधकांची एकजुट तिहेरी तलाक : राज्यसभेत आज सरकारची अग्निपरीक्षा

नवी दिल्ली -  केंद्र सरकारकडून राज्यसभेमध्ये आज ‘तिहेरी तलाक’ विधेयक मांडण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात येईल. या विधेयकाला गुरुवारी (27 डिसेंबर) लोकसभेत मंजुरी मिळाली असली तरी राज्यसभेत हे विधेयक मंजूर करुन घेणे, ही बाब सरकारसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाहीय. तर दुसरीकडे, या विधेयकावर आणखी विचार करण्यासाठी ते संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याची मागणी काँग्रेससहीत अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. याबाबत राज्यसभा सभापतींना पत्रदेखील लिहिण्यात आले आहे. दरम्यान, रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारीच असा दावा केला की, भलेही राज्यसभेत भाजपाकडे पर्याप्त संख्याबळ नसेल; पण सभागृहात या विधेयकाला समर्थन मिळेल.

राज्यसभेमध्ये विरोधकांची एकजुट पाहायला मिळत आहे. विधेयक सादर होण्यापूर्वीच जवळपास 12 विरोधी पक्षांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून विधेयक निवडी समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीडीपी, टीएमसी, सीपीआय, सीपीएम आणि आम आदमी पार्टी यांसारख्या राजकीय पक्षांचा समावेश आहे. या बारा विरोधी पक्षांमध्ये तामिळनाडूतील AIADMK पक्षाची समावेश असून, हा केंद्र सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.  नियमानुसार, राज्यसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकावरील चर्चेपूर्वी सभापती या प्रस्तावाबाबतची माहिती सभागृहात देतील.  

(तीन तलाकवरून सत्ताधारी-विरोधकांत जुगलबंदी, लोकसभेत चालली दीर्घकाळ चर्चा)

(Triple Talaq: सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की तोडायची आहेत?- सुप्रिया सुळे)

...तर कुटुंबे बर्बाद होतीलट्रिपल तलाक विधेयकाचे जर कायद्यात रूपांतर झाले, तर अनेक कुटुंबे बर्बाद होतील, अशी भीती आॅल इंडिया मुस्लिम वुमेन पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमडब्ल्यूपीएलबी) व्यक्त केली आहे. पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे की, मतैक्यासाठी काही संधी ठेवण्याची गरज होती. जेव्हा सर्व पर्याय समाप्त होतात तेव्हाच तलाक होतो. लॉ बोर्डाच्या अध्यक्षा शाइस्ता अंबर यांनी म्हटले आहे की, नव्या विधेयकात दिलासा मिळण्याऐवजी शिक्षाच होत असेल, तर आम्ही याविरुद्ध आंदोलन करू.

आम आदमी पार्टी करणार विरोधदरम्यान, आम आदमी पार्टीदेखील सभागृहामध्ये तिहेरी तलाक विधेयकाला विरोध करणार आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आहे, तर मग सरकार पुन्हा ते विधेयक कसे काय मांडू शकते. सर्वोच्च न्यायालयाकडून तिहेरी तलाकचा विषय संपुष्टात आणण्यात आला आहे, तर मग हा मुद्दा गुन्हेगारी श्रेणीत का ठेवण्यात आला आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीRajya Sabhaराज्यसभा