शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

तिहेरी तलाक विधेयकावर आज राज्यसभेत विरोधकांचं शक्तिप्रदर्शन, सरकारची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 11:51 IST

Triple Talaq : केंद्र सरकारकडून आज राज्यसभेमध्ये ‘तिहेरी तलाक’ विधेयक मांडण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘ट्रिपल तलाक’ विधेयक आज राज्यसभेत मांडणारराज्यसभेत विरोधकांची एकजुट तिहेरी तलाक : राज्यसभेत आज सरकारची अग्निपरीक्षा

नवी दिल्ली -  केंद्र सरकारकडून राज्यसभेमध्ये आज ‘तिहेरी तलाक’ विधेयक मांडण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात येईल. या विधेयकाला गुरुवारी (27 डिसेंबर) लोकसभेत मंजुरी मिळाली असली तरी राज्यसभेत हे विधेयक मंजूर करुन घेणे, ही बाब सरकारसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाहीय. तर दुसरीकडे, या विधेयकावर आणखी विचार करण्यासाठी ते संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याची मागणी काँग्रेससहीत अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. याबाबत राज्यसभा सभापतींना पत्रदेखील लिहिण्यात आले आहे. दरम्यान, रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारीच असा दावा केला की, भलेही राज्यसभेत भाजपाकडे पर्याप्त संख्याबळ नसेल; पण सभागृहात या विधेयकाला समर्थन मिळेल.

राज्यसभेमध्ये विरोधकांची एकजुट पाहायला मिळत आहे. विधेयक सादर होण्यापूर्वीच जवळपास 12 विरोधी पक्षांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून विधेयक निवडी समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीडीपी, टीएमसी, सीपीआय, सीपीएम आणि आम आदमी पार्टी यांसारख्या राजकीय पक्षांचा समावेश आहे. या बारा विरोधी पक्षांमध्ये तामिळनाडूतील AIADMK पक्षाची समावेश असून, हा केंद्र सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.  नियमानुसार, राज्यसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकावरील चर्चेपूर्वी सभापती या प्रस्तावाबाबतची माहिती सभागृहात देतील.  

(तीन तलाकवरून सत्ताधारी-विरोधकांत जुगलबंदी, लोकसभेत चालली दीर्घकाळ चर्चा)

(Triple Talaq: सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की तोडायची आहेत?- सुप्रिया सुळे)

...तर कुटुंबे बर्बाद होतीलट्रिपल तलाक विधेयकाचे जर कायद्यात रूपांतर झाले, तर अनेक कुटुंबे बर्बाद होतील, अशी भीती आॅल इंडिया मुस्लिम वुमेन पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमडब्ल्यूपीएलबी) व्यक्त केली आहे. पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे की, मतैक्यासाठी काही संधी ठेवण्याची गरज होती. जेव्हा सर्व पर्याय समाप्त होतात तेव्हाच तलाक होतो. लॉ बोर्डाच्या अध्यक्षा शाइस्ता अंबर यांनी म्हटले आहे की, नव्या विधेयकात दिलासा मिळण्याऐवजी शिक्षाच होत असेल, तर आम्ही याविरुद्ध आंदोलन करू.

आम आदमी पार्टी करणार विरोधदरम्यान, आम आदमी पार्टीदेखील सभागृहामध्ये तिहेरी तलाक विधेयकाला विरोध करणार आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आहे, तर मग सरकार पुन्हा ते विधेयक कसे काय मांडू शकते. सर्वोच्च न्यायालयाकडून तिहेरी तलाकचा विषय संपुष्टात आणण्यात आला आहे, तर मग हा मुद्दा गुन्हेगारी श्रेणीत का ठेवण्यात आला आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीRajya Sabhaराज्यसभा