शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तिहेरी तलाक प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय सुनावणाऱ फैसला, संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 21:40 IST

गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून तिहेरी तलाक प्रकरणी येणाऱ्या निकालाकडे संपूर्णँ देशाचे लक्ष लागले आहे. 

नवी दिल्ली, दि. 21  -  गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून तिहेरी तलाक प्रकरणी येणाऱ्या निकालाकडे संपूर्णँ देशाचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वेच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ या प्रकरणी निर्णय सुनावणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता याबाबतचा निकाल सुनावण्यात येण्याची शक्यता आहे. तिहेरी तलाक प्रकरणी 11ते 18 मे दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अधिक वाचा महिलांना ट्रिपल तलाक नाकारण्याचा हक्क मिळू शकतो का?ट्रिपल तलाक संपवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे यावं, मोदींचं आवाहनसंघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदीतिहेरी तलाकविषयी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना केंद्र सरकारने आपण तिहेरी तलाकच्या प्रथेला वैध मानत नसल्याचे सांगितले. तसेच सरकार ही कुप्रथा सुरू ठेवण्याच्या बाजूने नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.  याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मुस्लिमांमध्ये विवाहसंबंध संपविण्याची ‘तीन वेळा तलाक’ ही प्रथा विशिष्ट विचारसरणीच्या गटांच्या मते ‘कायदेशीर’ असली तरी प्रत्यक्षात ‘अत्यंत वाईट’ आणि ‘अनिष्ट’ आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने  व्यक्त केले होते. "तीन वेळा तलाक हा कायदेशीर आहे अशी विशिष्ट विचारसरणी आहे; परंतु ती विवाहसंबंध संपविण्याची अत्यंत वाईट आणि अनिष्ट प्रथा आहे, असे सरन्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले होते. यावेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान, मोरोक्को आणि सौदी अरेबिया या देशांत तीन वेळा तलाक म्हणून विवाहसंबंध संपविण्यास परवानगी नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले.   11 ते 18 मे या काळात झालेल्या सुनावणीवेळी निकाहनामा म्हणजे मुस्लिमांच्या विवाहाच्यावेळी मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकला नकार देण्याचा पर्याय मिळू शकतो का ? असा सवाल पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विचारला होता. ट्रिपल तलाकला आव्हान देणा-या याचिकांवर न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे. ट्रिपल तलाकमध्ये मुस्लिमांना तीनवेळा तलाक, तलाक, तलाक बोलून वैवाहिक नाते संपवता येते. 

टॅग्स :IndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय