शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तिहेरी तलाक प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय सुनावणाऱ फैसला, संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 21:40 IST

गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून तिहेरी तलाक प्रकरणी येणाऱ्या निकालाकडे संपूर्णँ देशाचे लक्ष लागले आहे. 

नवी दिल्ली, दि. 21  -  गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून तिहेरी तलाक प्रकरणी येणाऱ्या निकालाकडे संपूर्णँ देशाचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वेच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ या प्रकरणी निर्णय सुनावणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता याबाबतचा निकाल सुनावण्यात येण्याची शक्यता आहे. तिहेरी तलाक प्रकरणी 11ते 18 मे दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अधिक वाचा महिलांना ट्रिपल तलाक नाकारण्याचा हक्क मिळू शकतो का?ट्रिपल तलाक संपवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे यावं, मोदींचं आवाहनसंघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदीतिहेरी तलाकविषयी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना केंद्र सरकारने आपण तिहेरी तलाकच्या प्रथेला वैध मानत नसल्याचे सांगितले. तसेच सरकार ही कुप्रथा सुरू ठेवण्याच्या बाजूने नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.  याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मुस्लिमांमध्ये विवाहसंबंध संपविण्याची ‘तीन वेळा तलाक’ ही प्रथा विशिष्ट विचारसरणीच्या गटांच्या मते ‘कायदेशीर’ असली तरी प्रत्यक्षात ‘अत्यंत वाईट’ आणि ‘अनिष्ट’ आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने  व्यक्त केले होते. "तीन वेळा तलाक हा कायदेशीर आहे अशी विशिष्ट विचारसरणी आहे; परंतु ती विवाहसंबंध संपविण्याची अत्यंत वाईट आणि अनिष्ट प्रथा आहे, असे सरन्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले होते. यावेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान, मोरोक्को आणि सौदी अरेबिया या देशांत तीन वेळा तलाक म्हणून विवाहसंबंध संपविण्यास परवानगी नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले.   11 ते 18 मे या काळात झालेल्या सुनावणीवेळी निकाहनामा म्हणजे मुस्लिमांच्या विवाहाच्यावेळी मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकला नकार देण्याचा पर्याय मिळू शकतो का ? असा सवाल पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विचारला होता. ट्रिपल तलाकला आव्हान देणा-या याचिकांवर न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे. ट्रिपल तलाकमध्ये मुस्लिमांना तीनवेळा तलाक, तलाक, तलाक बोलून वैवाहिक नाते संपवता येते. 

टॅग्स :IndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय