शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

तृणमूल, राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:27 IST

तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी या पक्षांना कारणे दाखवा नोटीस जारी करून या पक्षांचा राष्टÑीय राजकीय पक्षाचा दर्जा का रद्द करू नये, अशी विचारणा केली आहे. तसेच ५ आॅगस्टपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.सध्या काँग्रेस, भाजप, सीपीएम, सीपीआय, बसपा, एनसीपी आणि तृणमूल काँग्रेस हे आठ राष्टÑीय राजकीय पक्ष आहेत. नॅशनल पीपल्स पार्टीला मणिपूर, मेघालय आणि नागालँडमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता आहे.२०१४ मध्ये निवडणूक आयोगाने राष्टÑीय राजकीय पक्षांच्या दर्जाच्या निकषानुसार पात्र न ठरल्यामुळे तृणमूल काँग्रेस, एनसीपी आणि सीपीआय या तीन राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. तथापि, या राजकीय पक्षांनी साकडे घातल्यानंतर निवडणूक आयोगाने नरमाईची भूमिका घेत राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या दर्जासंबंधीच्या नियमात दुरुस्ती केली होती. राष्टÑीय किंवा प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत पाच वर्षांऐवजी दर दहा वर्षांनी आढावा घेतला जाईल (एक निवडणुकीऐवजी दोन निवडणुका), असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. बसपाने यावेळी लोकसभेच्या दहा जागा जिंकल्या असून, विधानसभेच्याही काही जिंकल्या आहेत. त्यामुळे बसपाचा राष्टÑीय दर्जा शाबूत राहील.तथापि, तृणमूल काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांंना या नामुष्कीला सामोरे जावे लागू शकते.ईशान्य राज्यांतील खराब कामगिरीमुळे एनसीपीला राष्टÑीय दर्जा गमवावा लागण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचीही इतर राज्यांत उपस्थिती नाही. राष्टÑीय दर्जामुळे राजकीय पक्षांना सर्व राज्यांत कायमस्वरूपी एक निवडणूक चिन्ह राखता येते. याशिवाय निवडणुकीदरम्यान आकाशवाणी, दूरदर्शनवरून प्रचारासाठी ठराविक वेळ दिला जातो; तसेच नवी दिल्लीत पक्ष कार्यालय थाटता येते.>काय आहे निवडणूक आयोगाची नियमावलीनिवडणूक आयोगाची नियमावली, निवडणूक चिन्हांसदर्भातील (राखीव आणि वाटप) १९६८ च्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीत ६ टक्के मत मिळविणाऱ्या उमेदवारांच्या पक्षाला राष्टÑीय राजकीय पक्षाचा दिला जातो किंवा कोणत्याही राज्यांतून पक्षाचे चार खासदार निवडून आल्यास किंवा मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत किमान दोन जाग जिंकणाºया अथवा चार राज्यांत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असलेल्या पक्षाला राष्टÑीय पक्षाचा दर्जा दिला जातो.२०१४ च्या निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने याबाबत मवाळ भूमिका घेतली होती; परंतु यावेळी निवडणूक आयोग गय करणार नाही, असे दिसते. या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केल्यास राष्टÑीय दर्जा असलेल्या पक्षांची संख्या ८ वरून ५ वर येईल. ईशान्य राज्यांतील खराब कामगिरीमुळे एनसीपीला राष्टÑीय दर्जा गमवावा लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जी