शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'शहीद' भावाच्या हातावर बांधली तिंरग्याची 'राखी'; बहिणींच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 17:37 IST

हांसी तालुक्यातील ढंढेरी गावात उभारण्यात आलेल्या शहीद भावाच्या स्मारकावर जाऊन तिन्ही बहिणींनी तिरंग्याची राखी बांधली.

चंडीगड - देशाच्या सीमारेषेवरील राजौरी येथे दहशतवाद्यांच्या चकमकीत गतवर्षी रक्षाबंधन दिनीच निशांत मलिक शहीद झाले होते. ११ ऑगस्ट २०२२ रोजी मलिक कुटुंबातील सुपुत्रला वीरमरण आलं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज भावाला शहीद होऊन एक वर्ष झाले. त्यामुळे, शहीद भावाच्या आठवणी जपत निशांत यांच्या तिन्ही बहिणी आई आणि वडिलांसह ढंडेरी गावातील सरकारी शाळेत पोहोचल्या. जेथे असलेल्या शहीद भावाच्या स्मारकाला तिरंग्याची राखी बांधत कपाळी टिळा लावला. हा भाऊक क्षण नकळत अश्रूंचा साक्षीदार बनला.

हांसी तालुक्यातील ढंढेरी गावात उभारण्यात आलेल्या शहीद भावाच्या स्मारकावर जाऊन तिन्ही बहिणींनी तिरंग्याची राखी बांधली. यावेळी, बहिणींच्या डोळ्यात अश्रू तरळले. आम्हाला प्रत्येक जन्मात निशांतच भाऊ मिळू दे, अशी आर्त प्रार्थनाही या बहिणींनी देवाकडे केली. एकुलत्या एक भावाला गमावल्याचं दु:ख तिन्ही बहिणींना आणि शहीदाच्या माता-पित्याला आहे.  

दरम्यान, गतवर्षी ११ ऑगस्ट २०२२ रोजी राखी पौर्णिमेच्या दिवशीच दहशतवाद्यांशी लढताना निशांत मलिक शहीद झाले होते. राजौरी येथे निशांत यांनी दशतवाद्यांनाही कंठस्नान घातले होते. मात्र, वयाच्या २१ व्या वर्षी ते शहीद झाले. किरण, ज्योती व नीरज या तीन बहिणींचा हा लहान भाऊ होता, जो देशासाठी शहीद झाला. या भावाची आठवण ठेवत या तिन्ही बहिणींनी वडिल जयबीरसिंह मलिक आणि आई राजबाल यांच्यासमवेत शहीद स्मारकाला भेट दिली. 

निशांतने आपल्या लहान बहिणीसाठी गाडी बुक केली होती. नोव्हेंबर महिन्यात बहिणीचं लग्न होणार होतं. निशांत, बहिणीला लग्नाचं गिफ्ट म्हणून गाडी देणार होता. बहिण नीरजचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, नियतीच्या मनात वेगळंच होतं. ऑगस्ट महिन्यात राखी पौर्णिमेदिवशीच हा वीर भाऊ शहीद झाला.  

टॅग्स :MartyrशहीदHaryanaहरयाणाIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकterroristदहशतवादी