शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

चाचण्या घटल्या, बाधितांचे प्रमाण घटले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 6:51 AM

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांत देशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले आहे. परिणामी बाधितांच्या संख्येतही घट झाल्याचे चित्र आहे. बाधितांच्या संख्येत घट नोंदवली जात असल्याने देशव्यापी टाळेबंदीचा निर्णय घ्यावा किंवा नाही, या मुद्द्यावरून केंद्र सरकार संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत चाचण्यांमध्ये सर्वाधिक घट

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती. दिल्लीतही पाच दिवसांत २७ टक्क्यांनी चाचण्या कमी झाल्या आहेत. उत्तर प्रदेश कोरोनास्थिती उत्तमरित्या हाताळत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच केले होते. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. उत्तर प्रदेशात २२ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली असली तरी चाचण्यांचे प्रमाण १५ टक्क्यांनी घटले असल्याचे निदर्शनास आले आहे.

आकडेवारी नेमकी किती?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत असले तरी त्यामागे चाचण्यांची घटलेली संख्या हे कारण आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तर लोकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे चुकीचे अहवालही दिले जात आहेत किंवा ते पॉझिटिव्ह असल्याचे तोंडी सांगितले जात आहे. या अनागोंदीमुळे कोरोनाबाधितांची नेमकी आकडेवारी किती, याबाबत संभ्रम आहे.

    देशाचे चित्रn देशात गेल्या पाच दिवसांत चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले. ३० एप्रिल रोजी देशभरात १९ लाख ५० हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर ४ मे रोजी हेच प्रमाण १५ लाख ४० हजार एवढे होते. n नेमक्या याच कालावधीत देशातील कोरोनाबाधितांचा आलेख घसरू लागल्याचे आढळले. n चाचण्यांची संख्या घटल्याने रुग्णनोंद घटल्याचे वास्तव मात्र विचारात घेतले गेलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली