शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:58 IST

या प्रकारणांचा कोर्टामधील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक भारतीय कायदे व तरतुदी हटविण्याचा करण्याचा विचार करीत आहे.

ठळक मुद्देकॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी १ जून रोजी सर्व मंत्रालये आणि विभागांना एका पत्राद्वारे यासंबंधी आढावा घेण्यास सांगितले होते.किरकोळ गुन्ह्यांसाठी अटक आणि खटला दाखल करण्यासाठी जबाबदारी आरपीएफवर आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता अनेक लहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या तरतुदी हटविण्याचा विचार करीत आहे. यामध्ये तिकिटाशिवाय प्रवास करणे किंवा पायरीवर उभे राहून प्रवास करणे यासाठी फक्त दंड आकारण्याची तरतूद असणार आहे. यासाठी तुरूंगवासाची असणारी तरतूद हटविली जाण्याची शक्यता आहे.

या प्रकारणांचा कोर्टामधील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक भारतीय कायदे व तरतुदी हटविण्याचा करण्याचा विचार करीत आहे. यात रेल्वे कायदा 1989 च्या अंतर्गत एक अवैध कृती म्हणून भीक मागणे यासारख्या गुन्ह्यांना हटविणे देखील समाविष्ट आहे. या योजनेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंत्रालयाने आता कायद्याच्या सर्व तरतुदींचा व्यापक आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे किरकोळ उल्लंघन केल्याप्रकरणी खटला चालवणे सोपे होऊ शकेल.

कॅबिनेट सचिवांनी सर्व मंत्रालयांना अशा किरकोळ गुन्ह्यांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. आम्ही मंत्रालयाच्या विद्यमान कायद्यांचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेत आहोत, असे रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले. सध्या, संशयितांवर कारवाई करण्याची जबाबदारी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्यावर सोपविण्यात आली आहे, जे अशा गुन्ह्यांचा तपास आणि खटला दाखल करतात. रेल्वे आणि रेल्वे परिसरात प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा करण्याची जबाबदारी आरपीएफ आणि जीआरपी यांच्यावर संयुक्तरित्या आहे. किरकोळ गुन्ह्यांसाठी अटक आणि खटला दाखल करण्यासाठी जबाबदारी आरपीएफवर आहे. 

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी १ जून रोजी सर्व मंत्रालये आणि विभागांना एका पत्राद्वारे यासंबंधी आढावा घेण्यास सांगितले होते. सध्या रेल्वे, रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे मालमत्तेशी संबंधित गुन्हा केल्यास दंड, तुरूंग किंवा दोन्ही शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. विनाकारण अलार्म चेन खेचणे, तिकीट न घेता प्रवास करणे, राखीव कोचमध्ये प्रवास करणे किंवा तेथून जाणे अशा गुन्ह्यांत आता तुरूंगवासाच्या शिक्षेची तदतूद केली जाणार नसल्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कायद्यानुसार 16 तरतुदी हटविण्याची शक्यता आहे. 

आणखी बातम्या...

21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...

चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे - कॅप्टन अमरिंदर सिंग

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

टॅग्स :railwayरेल्वे