शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:58 IST

या प्रकारणांचा कोर्टामधील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक भारतीय कायदे व तरतुदी हटविण्याचा करण्याचा विचार करीत आहे.

ठळक मुद्देकॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी १ जून रोजी सर्व मंत्रालये आणि विभागांना एका पत्राद्वारे यासंबंधी आढावा घेण्यास सांगितले होते.किरकोळ गुन्ह्यांसाठी अटक आणि खटला दाखल करण्यासाठी जबाबदारी आरपीएफवर आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता अनेक लहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या तरतुदी हटविण्याचा विचार करीत आहे. यामध्ये तिकिटाशिवाय प्रवास करणे किंवा पायरीवर उभे राहून प्रवास करणे यासाठी फक्त दंड आकारण्याची तरतूद असणार आहे. यासाठी तुरूंगवासाची असणारी तरतूद हटविली जाण्याची शक्यता आहे.

या प्रकारणांचा कोर्टामधील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक भारतीय कायदे व तरतुदी हटविण्याचा करण्याचा विचार करीत आहे. यात रेल्वे कायदा 1989 च्या अंतर्गत एक अवैध कृती म्हणून भीक मागणे यासारख्या गुन्ह्यांना हटविणे देखील समाविष्ट आहे. या योजनेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंत्रालयाने आता कायद्याच्या सर्व तरतुदींचा व्यापक आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे किरकोळ उल्लंघन केल्याप्रकरणी खटला चालवणे सोपे होऊ शकेल.

कॅबिनेट सचिवांनी सर्व मंत्रालयांना अशा किरकोळ गुन्ह्यांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. आम्ही मंत्रालयाच्या विद्यमान कायद्यांचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेत आहोत, असे रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले. सध्या, संशयितांवर कारवाई करण्याची जबाबदारी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्यावर सोपविण्यात आली आहे, जे अशा गुन्ह्यांचा तपास आणि खटला दाखल करतात. रेल्वे आणि रेल्वे परिसरात प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा करण्याची जबाबदारी आरपीएफ आणि जीआरपी यांच्यावर संयुक्तरित्या आहे. किरकोळ गुन्ह्यांसाठी अटक आणि खटला दाखल करण्यासाठी जबाबदारी आरपीएफवर आहे. 

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी १ जून रोजी सर्व मंत्रालये आणि विभागांना एका पत्राद्वारे यासंबंधी आढावा घेण्यास सांगितले होते. सध्या रेल्वे, रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे मालमत्तेशी संबंधित गुन्हा केल्यास दंड, तुरूंग किंवा दोन्ही शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. विनाकारण अलार्म चेन खेचणे, तिकीट न घेता प्रवास करणे, राखीव कोचमध्ये प्रवास करणे किंवा तेथून जाणे अशा गुन्ह्यांत आता तुरूंगवासाच्या शिक्षेची तदतूद केली जाणार नसल्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कायद्यानुसार 16 तरतुदी हटविण्याची शक्यता आहे. 

आणखी बातम्या...

21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...

चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे - कॅप्टन अमरिंदर सिंग

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

टॅग्स :railwayरेल्वे