शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:58 IST

या प्रकारणांचा कोर्टामधील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक भारतीय कायदे व तरतुदी हटविण्याचा करण्याचा विचार करीत आहे.

ठळक मुद्देकॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी १ जून रोजी सर्व मंत्रालये आणि विभागांना एका पत्राद्वारे यासंबंधी आढावा घेण्यास सांगितले होते.किरकोळ गुन्ह्यांसाठी अटक आणि खटला दाखल करण्यासाठी जबाबदारी आरपीएफवर आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता अनेक लहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या तरतुदी हटविण्याचा विचार करीत आहे. यामध्ये तिकिटाशिवाय प्रवास करणे किंवा पायरीवर उभे राहून प्रवास करणे यासाठी फक्त दंड आकारण्याची तरतूद असणार आहे. यासाठी तुरूंगवासाची असणारी तरतूद हटविली जाण्याची शक्यता आहे.

या प्रकारणांचा कोर्टामधील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक भारतीय कायदे व तरतुदी हटविण्याचा करण्याचा विचार करीत आहे. यात रेल्वे कायदा 1989 च्या अंतर्गत एक अवैध कृती म्हणून भीक मागणे यासारख्या गुन्ह्यांना हटविणे देखील समाविष्ट आहे. या योजनेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंत्रालयाने आता कायद्याच्या सर्व तरतुदींचा व्यापक आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे किरकोळ उल्लंघन केल्याप्रकरणी खटला चालवणे सोपे होऊ शकेल.

कॅबिनेट सचिवांनी सर्व मंत्रालयांना अशा किरकोळ गुन्ह्यांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. आम्ही मंत्रालयाच्या विद्यमान कायद्यांचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेत आहोत, असे रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले. सध्या, संशयितांवर कारवाई करण्याची जबाबदारी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्यावर सोपविण्यात आली आहे, जे अशा गुन्ह्यांचा तपास आणि खटला दाखल करतात. रेल्वे आणि रेल्वे परिसरात प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा करण्याची जबाबदारी आरपीएफ आणि जीआरपी यांच्यावर संयुक्तरित्या आहे. किरकोळ गुन्ह्यांसाठी अटक आणि खटला दाखल करण्यासाठी जबाबदारी आरपीएफवर आहे. 

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी १ जून रोजी सर्व मंत्रालये आणि विभागांना एका पत्राद्वारे यासंबंधी आढावा घेण्यास सांगितले होते. सध्या रेल्वे, रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे मालमत्तेशी संबंधित गुन्हा केल्यास दंड, तुरूंग किंवा दोन्ही शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. विनाकारण अलार्म चेन खेचणे, तिकीट न घेता प्रवास करणे, राखीव कोचमध्ये प्रवास करणे किंवा तेथून जाणे अशा गुन्ह्यांत आता तुरूंगवासाच्या शिक्षेची तदतूद केली जाणार नसल्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कायद्यानुसार 16 तरतुदी हटविण्याची शक्यता आहे. 

आणखी बातम्या...

21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...

चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे - कॅप्टन अमरिंदर सिंग

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

टॅग्स :railwayरेल्वे