शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

रेल्वेचालक खोटे बोलत आहे, स्थानिकांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 05:04 IST

आपण रेल्वेचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, तरीही लोक हटले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाला.

अमृतसर : आपण रेल्वेचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, तरीही लोक हटले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर लोकांनी रेल्वेवर दगड फेकायला सुरुवात केल्याने आपण रेल्वे थांबविली नाही, असा दावा अमृतसर रेल्वेच्या चालकाने केला आहे. तथापि, चालकाचे म्हणणे खोटे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अपघातात ६२ जण मृत्युमुखी पडले आहेत.या चालकाने हॉर्न वाजवला नाही वा वेगही कमी केला नाही, असे स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे. रेल्वेवर आम्ही दगडफेक केली, हा चालकाचा दावा तद्दन खोटा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक चिरडले गेल्यानंतर आणि रेल्वेचा वेग खूपच असल्याने लोकांनी दगडफेक केली, असे म्हणणेच चुकीचे आहे. आम्ही त्या अपघाताने गोंधळून गेलो होतो. आमच्या नातेवाईकांना व मित्रांना शोधत होतो. असे असताना आमच्यावर दगडफेकीचा आरोप करणेच अयोग्य आहे, असे त्या लोकांनी म्हटले आहे.या अपघातास रेल्वेचालक वा प्रशासन जबाबदार वा दोषी नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटले असल्याबद्दल पंजाबचे मंत्री नवज्योत सिद्धू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, रेल्वेच्या हद्दीत अपघात झाला. रेल्वेच्या चालकाने लोकांच्या अंगावर रेल्वे घातली. त्यामुळेच इतके लोक मरण पावले. तरीही चौकशी होण्याच्या आधीच चालकाला क्लीन चीट देणे वा आम्ही दोषी नाही, असे मंत्र्यांनी जाहीर करणे चुकीचे आहे.(वृत्तसंस्था)>आयोजक झाला बेपत्तारावणदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाने केले होते. तिथे नवज्योत सिद्धू यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. हा अपघात होताच, नगरसेवकाचा मुलगा तिथून धावत सुटला आणि कारमध्ये बसून निघून गेला, असे दर्शविणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या अपघातानंतर केवळ नगरसेवकाचा मुलगाच नव्हेतर त्याचे आई-वडील व सर्व नातेवाईक घर सोडून निघून गेल्याचे सांगण्यात येते. चिडलेल्या लोकांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला आणि दगडफेक करून घराच्या काचाही फोडल्या.

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटना