शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

रेल्वेचालक खोटे बोलत आहे, स्थानिकांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 05:04 IST

आपण रेल्वेचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, तरीही लोक हटले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाला.

अमृतसर : आपण रेल्वेचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, तरीही लोक हटले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर लोकांनी रेल्वेवर दगड फेकायला सुरुवात केल्याने आपण रेल्वे थांबविली नाही, असा दावा अमृतसर रेल्वेच्या चालकाने केला आहे. तथापि, चालकाचे म्हणणे खोटे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अपघातात ६२ जण मृत्युमुखी पडले आहेत.या चालकाने हॉर्न वाजवला नाही वा वेगही कमी केला नाही, असे स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे. रेल्वेवर आम्ही दगडफेक केली, हा चालकाचा दावा तद्दन खोटा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक चिरडले गेल्यानंतर आणि रेल्वेचा वेग खूपच असल्याने लोकांनी दगडफेक केली, असे म्हणणेच चुकीचे आहे. आम्ही त्या अपघाताने गोंधळून गेलो होतो. आमच्या नातेवाईकांना व मित्रांना शोधत होतो. असे असताना आमच्यावर दगडफेकीचा आरोप करणेच अयोग्य आहे, असे त्या लोकांनी म्हटले आहे.या अपघातास रेल्वेचालक वा प्रशासन जबाबदार वा दोषी नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटले असल्याबद्दल पंजाबचे मंत्री नवज्योत सिद्धू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, रेल्वेच्या हद्दीत अपघात झाला. रेल्वेच्या चालकाने लोकांच्या अंगावर रेल्वे घातली. त्यामुळेच इतके लोक मरण पावले. तरीही चौकशी होण्याच्या आधीच चालकाला क्लीन चीट देणे वा आम्ही दोषी नाही, असे मंत्र्यांनी जाहीर करणे चुकीचे आहे.(वृत्तसंस्था)>आयोजक झाला बेपत्तारावणदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाने केले होते. तिथे नवज्योत सिद्धू यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. हा अपघात होताच, नगरसेवकाचा मुलगा तिथून धावत सुटला आणि कारमध्ये बसून निघून गेला, असे दर्शविणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या अपघातानंतर केवळ नगरसेवकाचा मुलगाच नव्हेतर त्याचे आई-वडील व सर्व नातेवाईक घर सोडून निघून गेल्याचे सांगण्यात येते. चिडलेल्या लोकांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला आणि दगडफेक करून घराच्या काचाही फोडल्या.

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटना