शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वेचालक खोटे बोलत आहे, स्थानिकांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 05:04 IST

आपण रेल्वेचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, तरीही लोक हटले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाला.

अमृतसर : आपण रेल्वेचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, तरीही लोक हटले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर लोकांनी रेल्वेवर दगड फेकायला सुरुवात केल्याने आपण रेल्वे थांबविली नाही, असा दावा अमृतसर रेल्वेच्या चालकाने केला आहे. तथापि, चालकाचे म्हणणे खोटे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या अपघातात ६२ जण मृत्युमुखी पडले आहेत.या चालकाने हॉर्न वाजवला नाही वा वेगही कमी केला नाही, असे स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे. रेल्वेवर आम्ही दगडफेक केली, हा चालकाचा दावा तद्दन खोटा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक चिरडले गेल्यानंतर आणि रेल्वेचा वेग खूपच असल्याने लोकांनी दगडफेक केली, असे म्हणणेच चुकीचे आहे. आम्ही त्या अपघाताने गोंधळून गेलो होतो. आमच्या नातेवाईकांना व मित्रांना शोधत होतो. असे असताना आमच्यावर दगडफेकीचा आरोप करणेच अयोग्य आहे, असे त्या लोकांनी म्हटले आहे.या अपघातास रेल्वेचालक वा प्रशासन जबाबदार वा दोषी नाही, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटले असल्याबद्दल पंजाबचे मंत्री नवज्योत सिद्धू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, रेल्वेच्या हद्दीत अपघात झाला. रेल्वेच्या चालकाने लोकांच्या अंगावर रेल्वे घातली. त्यामुळेच इतके लोक मरण पावले. तरीही चौकशी होण्याच्या आधीच चालकाला क्लीन चीट देणे वा आम्ही दोषी नाही, असे मंत्र्यांनी जाहीर करणे चुकीचे आहे.(वृत्तसंस्था)>आयोजक झाला बेपत्तारावणदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाने केले होते. तिथे नवज्योत सिद्धू यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. हा अपघात होताच, नगरसेवकाचा मुलगा तिथून धावत सुटला आणि कारमध्ये बसून निघून गेला, असे दर्शविणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या अपघातानंतर केवळ नगरसेवकाचा मुलगाच नव्हेतर त्याचे आई-वडील व सर्व नातेवाईक घर सोडून निघून गेल्याचे सांगण्यात येते. चिडलेल्या लोकांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढला आणि दगडफेक करून घराच्या काचाही फोडल्या.

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटना