शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तामिळनाडूत भीषण दुर्घटना; मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 16:47 IST

मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा.

चेन्नई: मागील काही दिवसांपासून दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले असून, अनेकांचा मृत्यूही झालाय. यातच मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. वेल्लोर शहरात सकाळी एक घर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 मुले आणि 4 महिलांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रत्येकी 5 लाख देण्याची घोषणाया दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. घराच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर  मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

पद्दुचेरीत मुसळधार पाऊस

हवामान खात्याने चेन्नई, कुड्डालोर, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरुवल्लुवरसह तामिळनाडूच्या 16 जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच नजीकच्या केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आंध्रमध्ये पुराचा कहर, नद्या-नाले तुडूंब भरले

गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात पुराने कहर केला आहे. पावसामुळे डोंगरावरचे झरे आणि नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तिकडे तिरुपतीच्या प्रसिद्ध मंदिरातही पाणी शिरले आहे. सखल भागातील रस्त्यांवर वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहात वाहने वाहून जात आहेत. तसचे, शहरालगतच्या ग्रामीण भागात आलेल्या पुरात शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. एकूणच नुकसानीचे आकलन करणे कठीण आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूRainपाऊसfloodपूरAndhra Pradeshआंध्र प्रदेश