शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीची तटबंदी... नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राममध्ये दिल्ली सीमेवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 15:22 IST

Farmers’ ‘Dilli Chalo’ March : महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Farmers’ ‘Dilli Chalo’ March (Marathi News)नवी दिल्ली :  आज दिल्ली-एनसीआरच्या वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे दिल्लीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीतील एक कोटीहून अधिक लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाझीपूरमध्ये अनेक ठिकाणी रुग्णवाहिका जाममध्ये अडकल्या आहेत. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आंदोलकांच्या मोर्चापूर्वीच दिल्लीत वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. कालिंदी कुंज, गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडी झाली आहेत. त्याचवेळी नोएडामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चाच्या घोषणेमुळे वाहतूक कोंडी वाढण्याचा धोका आहे. डीएनडी उड्डाणपुलावर बॅरिकेड्स लावून सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग खूपच मंदावला झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी हरयाणातील शंभू सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. त्याच धर्तीवर दिल्लीची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. टिकरी बॉर्डरवर 13 थरांची सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांकडून हायड्रोलिक आणि पोकलेन मशीनचीही तयारी सुरू आहे. आज दिल्लीच्या सीमेवर कडक वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रत्येक एंट्री पॉइंटवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमा मजबूत केल्या आहेत. हरयाणाच्या सिंघू आणि टिकरीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. काँक्रीट आणि लोखंडी खिळ्यांनी बनवलेल्या बॅरिकेड्सचे अनेक स्तर तेथे बसविण्यात आले आहेत. गाझीपूर सीमेवरील दोन मार्गिकाही बंद करण्यात आल्या आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गरज भासल्यास बुधवारी गाझीपूर सीमाही बंद केली जाऊ शकते. पण दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे आणि एनएच-9 वर यूपी गेट सीमेवर प्रचंड गर्दी असल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते.  तसेच, बॅरिकेडिंगमुळे मध्य दिल्लीतील वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरयाणामध्येही प्रत्येक कोपऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान, ट्रॅक्टर-ट्रॉली, बुलडोझर, हायड्रोलिक मशिन, क्रेन आणि खोदकामाच्या साधनांनी सुसज्ज शंभू सीमा आणि खनौरी सीमावर्ती भागातील 20 हजार शेतकरी सकाळी 11 वाजता दिल्लीकडे मोर्चा काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वेळीही शेतकरी आंदोलनादरम्यान वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. दरम्यान, ग्रेटर नोएडातील वाहतुकीवरही आज परिणाम होऊ शकतो. कारण ग्रेटर नोएडातील स्थानिक शेतकऱ्यांचा एक गट पंजाबमधील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निषेध मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे परी चौक आणि सूरजपूर दरम्यानची वाहतूक प्रभावित होऊ शकते. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन