शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीची तटबंदी... नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राममध्ये दिल्ली सीमेवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 15:22 IST

Farmers’ ‘Dilli Chalo’ March : महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Farmers’ ‘Dilli Chalo’ March (Marathi News)नवी दिल्ली :  आज दिल्ली-एनसीआरच्या वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे दिल्लीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीतील एक कोटीहून अधिक लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाझीपूरमध्ये अनेक ठिकाणी रुग्णवाहिका जाममध्ये अडकल्या आहेत. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आंदोलकांच्या मोर्चापूर्वीच दिल्लीत वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. कालिंदी कुंज, गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडी झाली आहेत. त्याचवेळी नोएडामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चाच्या घोषणेमुळे वाहतूक कोंडी वाढण्याचा धोका आहे. डीएनडी उड्डाणपुलावर बॅरिकेड्स लावून सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग खूपच मंदावला झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी हरयाणातील शंभू सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. त्याच धर्तीवर दिल्लीची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. टिकरी बॉर्डरवर 13 थरांची सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांकडून हायड्रोलिक आणि पोकलेन मशीनचीही तयारी सुरू आहे. आज दिल्लीच्या सीमेवर कडक वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रत्येक एंट्री पॉइंटवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमा मजबूत केल्या आहेत. हरयाणाच्या सिंघू आणि टिकरीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. काँक्रीट आणि लोखंडी खिळ्यांनी बनवलेल्या बॅरिकेड्सचे अनेक स्तर तेथे बसविण्यात आले आहेत. गाझीपूर सीमेवरील दोन मार्गिकाही बंद करण्यात आल्या आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गरज भासल्यास बुधवारी गाझीपूर सीमाही बंद केली जाऊ शकते. पण दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे आणि एनएच-9 वर यूपी गेट सीमेवर प्रचंड गर्दी असल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते.  तसेच, बॅरिकेडिंगमुळे मध्य दिल्लीतील वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरयाणामध्येही प्रत्येक कोपऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान, ट्रॅक्टर-ट्रॉली, बुलडोझर, हायड्रोलिक मशिन, क्रेन आणि खोदकामाच्या साधनांनी सुसज्ज शंभू सीमा आणि खनौरी सीमावर्ती भागातील 20 हजार शेतकरी सकाळी 11 वाजता दिल्लीकडे मोर्चा काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वेळीही शेतकरी आंदोलनादरम्यान वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. दरम्यान, ग्रेटर नोएडातील वाहतुकीवरही आज परिणाम होऊ शकतो. कारण ग्रेटर नोएडातील स्थानिक शेतकऱ्यांचा एक गट पंजाबमधील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निषेध मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे परी चौक आणि सूरजपूर दरम्यानची वाहतूक प्रभावित होऊ शकते. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन