शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीची तटबंदी... नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राममध्ये दिल्ली सीमेवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 15:22 IST

Farmers’ ‘Dilli Chalo’ March : महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Farmers’ ‘Dilli Chalo’ March (Marathi News)नवी दिल्ली :  आज दिल्ली-एनसीआरच्या वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे दिल्लीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीतील एक कोटीहून अधिक लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाझीपूरमध्ये अनेक ठिकाणी रुग्णवाहिका जाममध्ये अडकल्या आहेत. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आंदोलकांच्या मोर्चापूर्वीच दिल्लीत वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. कालिंदी कुंज, गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडी झाली आहेत. त्याचवेळी नोएडामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चाच्या घोषणेमुळे वाहतूक कोंडी वाढण्याचा धोका आहे. डीएनडी उड्डाणपुलावर बॅरिकेड्स लावून सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग खूपच मंदावला झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी हरयाणातील शंभू सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. त्याच धर्तीवर दिल्लीची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. टिकरी बॉर्डरवर 13 थरांची सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांकडून हायड्रोलिक आणि पोकलेन मशीनचीही तयारी सुरू आहे. आज दिल्लीच्या सीमेवर कडक वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रत्येक एंट्री पॉइंटवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमा मजबूत केल्या आहेत. हरयाणाच्या सिंघू आणि टिकरीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. काँक्रीट आणि लोखंडी खिळ्यांनी बनवलेल्या बॅरिकेड्सचे अनेक स्तर तेथे बसविण्यात आले आहेत. गाझीपूर सीमेवरील दोन मार्गिकाही बंद करण्यात आल्या आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गरज भासल्यास बुधवारी गाझीपूर सीमाही बंद केली जाऊ शकते. पण दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे आणि एनएच-9 वर यूपी गेट सीमेवर प्रचंड गर्दी असल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते.  तसेच, बॅरिकेडिंगमुळे मध्य दिल्लीतील वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरयाणामध्येही प्रत्येक कोपऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान, ट्रॅक्टर-ट्रॉली, बुलडोझर, हायड्रोलिक मशिन, क्रेन आणि खोदकामाच्या साधनांनी सुसज्ज शंभू सीमा आणि खनौरी सीमावर्ती भागातील 20 हजार शेतकरी सकाळी 11 वाजता दिल्लीकडे मोर्चा काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वेळीही शेतकरी आंदोलनादरम्यान वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. दरम्यान, ग्रेटर नोएडातील वाहतुकीवरही आज परिणाम होऊ शकतो. कारण ग्रेटर नोएडातील स्थानिक शेतकऱ्यांचा एक गट पंजाबमधील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निषेध मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे परी चौक आणि सूरजपूर दरम्यानची वाहतूक प्रभावित होऊ शकते. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन