शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

भीषण अपघात! नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 11:14 IST

नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 18 जण जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी खंडवा जिल्ह्यातील मेरापाणी गावातील लोक हरदा जिल्ह्यातील रोलगाव येथून नवस पूर्ण करून गावाकडे परतत होते. 

खिरकीया ते छनेरा दरम्यान धनोरा गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे ती उलटली. या अपघातात तीन महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर प्रवाशांच्या मदतीने जखमींना तातडीने सार्वजनिक आरोग्य केंद्र खिरकीया येथे नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले. 18 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी तीन जखमींना खांडवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

हरदाचे जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक खिरकियाला पाठवण्यात आले आहे. या अपघातात तीन महिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तर पाच ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात खंडवा जिल्ह्यातील छनेरा पोलीस ठाण्याच्या धनोरा गावाजवळ घडला, मात्र तेथून आरोग्य केंद्र खिरकीया जवळ असल्याने सर्व जखमींना येथे उपचारासाठी आणण्यात आले. 

अपघातात राकेश रतिराम, फूलवती राजाराम, अंजली कमल, निशिता रतन, सुंदर मुन्ना, गणेश शंकर, जय सिंह रामसिंह, पतिराम गोगाराम, राजेश रामसिंह, शमोती मंगलसिंह, सीता मंगल सिंह, भगवती भालसिंह, तुलसा गुलाब, श्याम भाई पतिराम, बेटू सुंदर, कुंवरसिंह मंगलसिंह, नानाबाई मोतीराम, केशु भाई रामसिंह हे जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Accidentअपघात