शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 11:14 IST

नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 18 जण जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी खंडवा जिल्ह्यातील मेरापाणी गावातील लोक हरदा जिल्ह्यातील रोलगाव येथून नवस पूर्ण करून गावाकडे परतत होते. 

खिरकीया ते छनेरा दरम्यान धनोरा गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे ती उलटली. या अपघातात तीन महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर प्रवाशांच्या मदतीने जखमींना तातडीने सार्वजनिक आरोग्य केंद्र खिरकीया येथे नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले. 18 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी तीन जखमींना खांडवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

हरदाचे जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक खिरकियाला पाठवण्यात आले आहे. या अपघातात तीन महिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तर पाच ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात खंडवा जिल्ह्यातील छनेरा पोलीस ठाण्याच्या धनोरा गावाजवळ घडला, मात्र तेथून आरोग्य केंद्र खिरकीया जवळ असल्याने सर्व जखमींना येथे उपचारासाठी आणण्यात आले. 

अपघातात राकेश रतिराम, फूलवती राजाराम, अंजली कमल, निशिता रतन, सुंदर मुन्ना, गणेश शंकर, जय सिंह रामसिंह, पतिराम गोगाराम, राजेश रामसिंह, शमोती मंगलसिंह, सीता मंगल सिंह, भगवती भालसिंह, तुलसा गुलाब, श्याम भाई पतिराम, बेटू सुंदर, कुंवरसिंह मंगलसिंह, नानाबाई मोतीराम, केशु भाई रामसिंह हे जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Accidentअपघात