शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Employment: पर्यटनामुळे ८ कोटी लोकांना रोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:33 IST

भारतात पर्यटन उद्योगाचा झपाट्याने होतोय विकास; परकीय चलनातून मिळाले २,७७,८४२ कोटी रुपये; पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाल्याचा परिणाम; अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली: भारतात प्रचंड वेगाने पायाभूत सुविधांचा विकास होत असून, याचा फायदा पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या पर्यटन उद्योगामुळे २०३० पर्यंत या क्षेत्रातून साडेचार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन मिळू शकते आणि देशाच्या जीडीपीत या क्षेत्राचा वाटा सात टक्क्यांहून अधिक असेल, असे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातून परकीय चलनात मिळकत २,३१,९२७ कोटी रुपये इतकी होती, जी २०२४ मध्ये वाढून २,७७,८४२ कोटी रुपये झाली आहे. २०२४ मध्ये पर्यटनातून परकीय चलन २,७७,८४२ कोटी रुपये मिळाले. यात ८ ते १० टक्क्यांच्या वाढीची अपेक्षा आहे. पर्यटनातील वाढ कायम राहिल्यास परकीय चलन मिळकत ४,५०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते. ८ कोटी लोकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. हे प्रमाण एकूण रोजगाराच्या १२% आहे. १० कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना २०४७ पर्यंत आकर्षित करण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे.

पर्यटनामुळे कोणते रोजगार मिळतात?थेट रोजगारांमध्ये हॉटेल्स, विमान सेवा कंपन्या, प्रवासविषयक संस्था व टूर ऑपरेटर यांचा समावेश. अप्रत्यक्ष रोजगारामध्ये बांधकाम, अन्न प्रक्रिया या क्षेत्रांचा समावेश आहे. देशांतर्गत पर्यटनही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत या क्षेत्राचा वाटा १५ ते २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. हे क्षेत्र अधिक ग्राहककेंद्रित होत आहे. वेलनेस टुरिझम, ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, हेरिटेज सर्किट आणि लक्झरी एक्सपीरियन्स यासारख्या नवीन प्रवासाच्या ट्रेंडमुळे ट्रॅव्हल बिझनेससाठी संधी निर्माण होत आहेत.

टॅग्स :tourismपर्यटनEmployeeकर्मचारीjobनोकरी