शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Toll Plaza: टोल नाक्यांबाबत नितीन गडकरींनी घेतला मोठा निर्णय, ६० किमीमागे असेल केवळ एक टोल प्लाझा, तर स्थानिकांना मिळेल पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 20:16 IST

Toll Plaza News: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री itin Gadkari यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आता महामार्गांवर टोल नाक्यांची संख्या मर्यादित केली जाईल. तर स्थानिकांना आता टोल द्यावा लागणार नाही.

नवी दिल्ली - येणाऱ्या काळात महामार्गांवरून प्रवास करणे स्वस्त होणार आहे. कारण याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून, त्यासाठी एक प्लॅनही तयार करण्यात आला आहे. सरकार एका निश्चित कालावधीमध्ये एकवेळाच टोल वसूल करणार आहे. तसेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि सातत्याने महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आखण्यात आली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आता महामार्गांवर टोल नाक्यांची संख्या मर्यादित केली जाईल. तर स्थानिकांना आता टोल द्यावा लागणार नाही. सरकारची ही योजना पुढच्या ३ महिन्यांमध्ये लागू होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, सरकार येत्या ३ महिन्यांमध्ये देशातील टोल नाक्यांची संख्या कमी करणार आहे. तसेच ६० किमीच्या अंतरामध्ये केवळ एकट टोल प्लाझा सुरू राहील. नितीन गडकरींनी सांगितले की, पुढच्या तीन महिन्यांमध्ये ६० किमीच्या अंतरामध्ये येणारे अन्य टोल नाके बंद केले जातील.

नितीन गडकरींनी टोल नाक्यांजवळ राहणाऱ्यांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहेत. त्यांनी सांगितले की, टोल नाक्यांजवळ राहणाऱ्यांना टोल द्यावा लागणार नाही. त्यांच्यासाठी पास जारी केला जाईल. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच अधिकाधिक लोकांना टोल देऊन महामार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रेरित करता येईल.

केंद्र सरकार सध्या महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहे. दरम्यान, टोलमधून सवलत देण्यात यावी अशी टोल नाक्याजवळ राहणाऱ्यांकडून सातत्याने मागणी करण्यात होती. कारण त्यांना त्या मार्गावरून वारंवार प्रवास करावा लागे.   

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाCentral Governmentकेंद्र सरकार