शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 10:40 IST

१४ मे रोजी झालेल्या डिजीएओ स्तरावरील चर्चेत १८ मेपर्यंत या युद्धविरामाची मुदत वाढवण्याचा करार झाल्याचे म्हटले जात होते. या करारानुसार आजचा दिवस युद्धविरामाचा शेवटचा दिवस असणार का?, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने देखील 'ऑपरेशन सिंदूर' करून चोख उत्तर दिले. मात्र,त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. तर, भारतीय सैन्याने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला. १४ मे रोजी झालेल्या डिजीएओ स्तरावरील चर्चेत १८ मेपर्यंत या युद्धविरामाची मुदत वाढवण्याचा करार झाल्याचे म्हटले जात होते. या करारानुसार आजचा दिवस युद्धविरामाचा शेवटचा दिवस असणार का?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर आता भारतीय सैन्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम आज संपणार का? १४ मे रोजी झालेल्या डीजीएमओ स्तरावरील चर्चेत १८ मेपर्यंत युद्धबंदी वाढवण्याचा करार झाला होता का? आज पुन्हा दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये बैठक होणार आहे का? या प्रश्नांची उत्तरे भारतीय सैन्याकडून मिळाली आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका!

या प्रश्नांची उत्तरे देताना, आज दोन्ही देशांमध्ये डीजीएमओ स्तरावरील कोणतीही चर्चा होणार नसल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये १२ मे रोजी झालेल्या युद्धबंदी कराराची कोणतीही अंतिम तारीख निश्चित केलेली नाही, असेही लष्कराने स्पष्ट केले. म्हणजेच दोन्ही देशांमधील हा युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरू राहील. युद्धविराम संपल्याच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे देखील लष्कराकडून सांगण्यात आले आहे. 

पाकिस्तान म्हणतंय करार मोडू, जर...   दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानसोबत झालेला सिंधु करार स्थगित करून भारताने पाकचे पाणी बंद केले. भारत आणि पाकिस्तानमधील दीर्घकाळापासून सुरू असलेला सिंधू पाणी कराराचा वाद सोडवला नाही, तर युद्धविरामाचा करार धोक्यात येऊ शकतो, असे पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी १९६०चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला चिथावणीखोरी म्हटले आणि जर हा प्रश्न सोडवला गेला नाही तर, तो युद्धाचा मुद्दा मानला जाऊ शकतो असे म्हटले.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला