शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 10:40 IST

१४ मे रोजी झालेल्या डिजीएओ स्तरावरील चर्चेत १८ मेपर्यंत या युद्धविरामाची मुदत वाढवण्याचा करार झाल्याचे म्हटले जात होते. या करारानुसार आजचा दिवस युद्धविरामाचा शेवटचा दिवस असणार का?, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने देखील 'ऑपरेशन सिंदूर' करून चोख उत्तर दिले. मात्र,त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. तर, भारतीय सैन्याने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला. १४ मे रोजी झालेल्या डिजीएओ स्तरावरील चर्चेत १८ मेपर्यंत या युद्धविरामाची मुदत वाढवण्याचा करार झाल्याचे म्हटले जात होते. या करारानुसार आजचा दिवस युद्धविरामाचा शेवटचा दिवस असणार का?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर आता भारतीय सैन्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम आज संपणार का? १४ मे रोजी झालेल्या डीजीएमओ स्तरावरील चर्चेत १८ मेपर्यंत युद्धबंदी वाढवण्याचा करार झाला होता का? आज पुन्हा दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये बैठक होणार आहे का? या प्रश्नांची उत्तरे भारतीय सैन्याकडून मिळाली आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका!

या प्रश्नांची उत्तरे देताना, आज दोन्ही देशांमध्ये डीजीएमओ स्तरावरील कोणतीही चर्चा होणार नसल्याचे लष्कराने म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये १२ मे रोजी झालेल्या युद्धबंदी कराराची कोणतीही अंतिम तारीख निश्चित केलेली नाही, असेही लष्कराने स्पष्ट केले. म्हणजेच दोन्ही देशांमधील हा युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरू राहील. युद्धविराम संपल्याच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे देखील लष्कराकडून सांगण्यात आले आहे. 

पाकिस्तान म्हणतंय करार मोडू, जर...   दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानसोबत झालेला सिंधु करार स्थगित करून भारताने पाकचे पाणी बंद केले. भारत आणि पाकिस्तानमधील दीर्घकाळापासून सुरू असलेला सिंधू पाणी कराराचा वाद सोडवला नाही, तर युद्धविरामाचा करार धोक्यात येऊ शकतो, असे पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी १९६०चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला चिथावणीखोरी म्हटले आणि जर हा प्रश्न सोडवला गेला नाही तर, तो युद्धाचा मुद्दा मानला जाऊ शकतो असे म्हटले.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला