शहरं
Join us  
Trending Stories
1
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
2
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
3
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
4
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
5
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
6
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
7
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
8
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
9
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
10
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
11
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
12
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
13
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
14
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
15
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
16
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
17
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
18
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
19
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
20
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता

“आज देशाकडे सक्षम नेतृत्व, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 11:37 IST

संरक्षणमंत्री म्हणाले, मला देशाला हे आश्वासन द्यायचे आहे की, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही.

ठळक मुद्देकोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही.शेजारील देशांशी चांगले संबंध राखण्याचे भारताचे स्पष्ट धोरण आहेभारत आणि चीन यांच्यात तिसऱ्याने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

नवी दिल्ली - चीनसोबत लडाख सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लवकरच या समस्येचा तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. लष्करी व मुत्सद्दी पातळीवर दोन्ही देशांमधील वाटाघाटी सुरूच आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना राजनाथ म्हणाले की, आज देशाकडे सक्षम नेतृत्व आहे. देशाची मान झुकू देणार नाही. देशातील जनतेला यावरही विश्वास आहे. नेपाळबरोबर लिपुलेख वादाच्या वाटाघाटीचे निराकरण करण्याचीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

संरक्षणमंत्री म्हणाले, मला देशाला हे आश्वासन द्यायचे आहे की, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही. भारत कोणालाही डोळे वटारून पाहत नाही, सीमेवरील पायाभूत सुविधांच्या बांधकामाबाबत चीनच्या आक्षेपांवर बोलताना ते म्हणाले की, हा आमचा हक्क आहे. आम्ही जे काही करत आहोत ते आमच्या सीमेत करत आहोत. पायाभूत सुविधा तयार करण्याचा आमचा अधिकार आहे. शेजारील देशांशी चांगले संबंध राखण्याचे भारताचे स्पष्ट धोरण आहे. आमचे प्रयत्न बर्‍याच काळापासून सुरू आहेत. कधीकधी अशा परिस्थिती चीनबरोबर उद्भवतात. मे महिन्यातही अशा परिस्थिती उद्भवल्या आहेत. पण सामंजस्याने समस्या सोडवण्याचा आमच प्रयत्न सुरूच आहे. चिनी राष्ट्रपतींच्या वतीने हेदेखील स्पष्टपणे सांगितले होते की, मुत्सद्दी चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवायचे आहे असं संरक्षण मंत्री म्हणाले.

तसेच कोणत्याही परिस्थितीत तणाव वाढू नये, हा भारताचा प्रयत्न आहे. आवश्यक असल्यास सैन्य पातळीवर आणि मुत्सद्दी स्तरावर वाटाघाटी दूर केल्या पाहिजेत. लष्करी व मुत्सद्दी पातळीवर चीनशी चर्चा सुरू आहे. भारत आणि चीन यांच्यात तिसऱ्याने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही काल अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांशी संवाद साधला. आम्ही त्यांना सांगितले की, भारताने यापूर्वीच एक यंत्रणा विकसित केली आहे ज्या अंतर्गत चीनशी वाद झाल्यास ते सैन्य व मुत्सद्दी वाटाघाटीद्वारे त्या सोडवतात असं राजनाथ सिंह म्हणाले.

दरम्यान, नेपाळबरोबर लिपुलेख वादाबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, हे वाटाघाटीद्वारे सोडवले जाऊ शकते. नेपाळशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. तो भारताचा धाकटा भाऊ आहे. वाटाघाटीद्वारे हे प्रकरण सोडवेल. अलीकडेच नेपाळने लिपुलेखला आपला भाग असल्याचे सांगून हा वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला होता.

 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका