शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

“आज देशाकडे सक्षम नेतृत्व, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 11:37 IST

संरक्षणमंत्री म्हणाले, मला देशाला हे आश्वासन द्यायचे आहे की, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही.

ठळक मुद्देकोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही.शेजारील देशांशी चांगले संबंध राखण्याचे भारताचे स्पष्ट धोरण आहेभारत आणि चीन यांच्यात तिसऱ्याने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

नवी दिल्ली - चीनसोबत लडाख सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लवकरच या समस्येचा तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. लष्करी व मुत्सद्दी पातळीवर दोन्ही देशांमधील वाटाघाटी सुरूच आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना राजनाथ म्हणाले की, आज देशाकडे सक्षम नेतृत्व आहे. देशाची मान झुकू देणार नाही. देशातील जनतेला यावरही विश्वास आहे. नेपाळबरोबर लिपुलेख वादाच्या वाटाघाटीचे निराकरण करण्याचीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

संरक्षणमंत्री म्हणाले, मला देशाला हे आश्वासन द्यायचे आहे की, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही. भारत कोणालाही डोळे वटारून पाहत नाही, सीमेवरील पायाभूत सुविधांच्या बांधकामाबाबत चीनच्या आक्षेपांवर बोलताना ते म्हणाले की, हा आमचा हक्क आहे. आम्ही जे काही करत आहोत ते आमच्या सीमेत करत आहोत. पायाभूत सुविधा तयार करण्याचा आमचा अधिकार आहे. शेजारील देशांशी चांगले संबंध राखण्याचे भारताचे स्पष्ट धोरण आहे. आमचे प्रयत्न बर्‍याच काळापासून सुरू आहेत. कधीकधी अशा परिस्थिती चीनबरोबर उद्भवतात. मे महिन्यातही अशा परिस्थिती उद्भवल्या आहेत. पण सामंजस्याने समस्या सोडवण्याचा आमच प्रयत्न सुरूच आहे. चिनी राष्ट्रपतींच्या वतीने हेदेखील स्पष्टपणे सांगितले होते की, मुत्सद्दी चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवायचे आहे असं संरक्षण मंत्री म्हणाले.

तसेच कोणत्याही परिस्थितीत तणाव वाढू नये, हा भारताचा प्रयत्न आहे. आवश्यक असल्यास सैन्य पातळीवर आणि मुत्सद्दी स्तरावर वाटाघाटी दूर केल्या पाहिजेत. लष्करी व मुत्सद्दी पातळीवर चीनशी चर्चा सुरू आहे. भारत आणि चीन यांच्यात तिसऱ्याने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही काल अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांशी संवाद साधला. आम्ही त्यांना सांगितले की, भारताने यापूर्वीच एक यंत्रणा विकसित केली आहे ज्या अंतर्गत चीनशी वाद झाल्यास ते सैन्य व मुत्सद्दी वाटाघाटीद्वारे त्या सोडवतात असं राजनाथ सिंह म्हणाले.

दरम्यान, नेपाळबरोबर लिपुलेख वादाबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, हे वाटाघाटीद्वारे सोडवले जाऊ शकते. नेपाळशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. तो भारताचा धाकटा भाऊ आहे. वाटाघाटीद्वारे हे प्रकरण सोडवेल. अलीकडेच नेपाळने लिपुलेखला आपला भाग असल्याचे सांगून हा वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला होता.

 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका