शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"भारत विश्वगुरू बनण्यासाठी वेद, संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास करावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:31 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

साबरकांठा : विश्वगुरू बनण्यासाठी भारताने वेद आणि संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास केला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. श्री भगवान याज्ञवल्क वेदतत्त्वज्ञान योगाश्रम ट्रस्टच्या वतीने गुजरातमधील मुडेती गावामध्ये आयोजिलेल्या वेद संस्कृती ज्ञान गौरव समारंभात ते बोलत होते.

मोहन भागवत यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती ही कधीही सनातनी नव्हती. या संस्कृतीत काळानुसार योग्य बदल झाले. कोणी काय खावे किंवा काय खाऊ नये अशी बंधने भारतीय संस्कृतीने कधीच घातलेली नाहीत. या देशात निर्माण झालेल्या वेदांतील तत्त्वांचे पालन प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. भारताने आपला विकास जरूर साधावा, पण अमेरिका, चीन, रशियाप्रमाणे सत्तापिपासू महाशक्ती बनण्याची गरज नाही. 

ते म्हणाले की, भारताने आपल्या योग्य आचरणातून जगाला शांतता, प्रेम आणि समृद्धीचा मार्ग दाखवणारा देश बनले पाहिजे. भारत हा सर्वांची एकजूट साधणारा, विश्वगुरू बनण्याची इच्छा असलेला देश आहे. या गोष्टींसाठी वेद किंवा वेदविज्ञान, संस्कृती यांचे ज्ञान जोपासण्याची, वाढविण्याची आवश्यकता आहे. हे सारे ज्ञान संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे संस्कृत शिकणेही आवश्यक आहे. संस्कृत भाषा, संगीताचे ज्ञान असेल तर विज्ञानाच्या अनेक संकल्पना सुलभरीत्या शिकता येतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

मोहन भागवत म्हणाले की, युक्रेन-रशिया युद्धात दोन्ही देशांना भारताने आपल्या बाजूने उभे राहावे असे वाटत आहे. मात्र दोन्ही देश आपले मित्र आहेत, अशी भारताने घेतलेली भूमिका योग्य आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारत