शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"भारत विश्वगुरू बनण्यासाठी वेद, संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास करावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:31 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

साबरकांठा : विश्वगुरू बनण्यासाठी भारताने वेद आणि संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास केला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. श्री भगवान याज्ञवल्क वेदतत्त्वज्ञान योगाश्रम ट्रस्टच्या वतीने गुजरातमधील मुडेती गावामध्ये आयोजिलेल्या वेद संस्कृती ज्ञान गौरव समारंभात ते बोलत होते.

मोहन भागवत यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती ही कधीही सनातनी नव्हती. या संस्कृतीत काळानुसार योग्य बदल झाले. कोणी काय खावे किंवा काय खाऊ नये अशी बंधने भारतीय संस्कृतीने कधीच घातलेली नाहीत. या देशात निर्माण झालेल्या वेदांतील तत्त्वांचे पालन प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. भारताने आपला विकास जरूर साधावा, पण अमेरिका, चीन, रशियाप्रमाणे सत्तापिपासू महाशक्ती बनण्याची गरज नाही. 

ते म्हणाले की, भारताने आपल्या योग्य आचरणातून जगाला शांतता, प्रेम आणि समृद्धीचा मार्ग दाखवणारा देश बनले पाहिजे. भारत हा सर्वांची एकजूट साधणारा, विश्वगुरू बनण्याची इच्छा असलेला देश आहे. या गोष्टींसाठी वेद किंवा वेदविज्ञान, संस्कृती यांचे ज्ञान जोपासण्याची, वाढविण्याची आवश्यकता आहे. हे सारे ज्ञान संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे संस्कृत शिकणेही आवश्यक आहे. संस्कृत भाषा, संगीताचे ज्ञान असेल तर विज्ञानाच्या अनेक संकल्पना सुलभरीत्या शिकता येतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

मोहन भागवत म्हणाले की, युक्रेन-रशिया युद्धात दोन्ही देशांना भारताने आपल्या बाजूने उभे राहावे असे वाटत आहे. मात्र दोन्ही देश आपले मित्र आहेत, अशी भारताने घेतलेली भूमिका योग्य आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारत