शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

२०२४ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार बनणार? शपथविधीनंतर नितीश कुमार यांचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:04 IST

Nitish Kumar News: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतही सूचक विधान केलं आहे.

पाटणा - बिहारमध्ये घडलेल्या नाट्यमय घाडामोडींदरम्यान कुठलाही गाजावाजा न करता नितीश कुमार यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरची वाट दाखवली. त्यानंतर नितीश यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत पुन्हा एकदा महाआघाडी करत पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतही सूचक विधान केलं आहे.

नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर भाजपा, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नियोजनबद्धरीत्या पलटवार केला. ते म्हणाले की, भाजपाला वाटलं होतं की, विरोधी पक्ष संपुष्टात येईल. मात्र आता आम्हीही विरोधी पक्षामध्ये आहोत. त्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, २०१४ मध्ये येणारे २०२४ मध्ये राहतील तेव्हा ना. आम्ही राहू अथवा न राहू. पण २०२४ मध्ये ते राहणार नाहीत. मी विरोधी पक्षांना २०२४ मध्ये एकजूट होण्याचं आवाहन करतो.  मात्र पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारीबाबत विचारले असता नितीश कुमार यांनी सांगितले की, मी पंतप्रधानपदासाठी उमेदवार नाही आहे.

गेल्या ९ वर्षांत नितीश कुमार यांना दोन वेळा भाजपाची साथ सोडून आरजेडीसोबत घरोबा केला आहे. २०१३ मध्ये नितीश कुमार यांनी भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची निवड केल्यानंतर त्याला विरोध करत भाजपासोबतची आघाडी मोडली होती. त्यांनंतर २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत लालूंच्या आरजेडीसोबत महाआघाडी करत नितीश कुमार यांनी भाजपाचा दारुण पराभव केला होता. मात्र पुढे २०१७ मध्ये नितीश कुमार हे महाआघाडीची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत एनडीएच्या गोटात दाखल झाले होते. त्यानंतर अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी भाजपासोबत आघाडी करून विजय मिळवला होता. त्यानंतर आता नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरजेडीसोबत जवळीक करत आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी