शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 17:07 IST

TMC Raises Question On Rahul Gandhi: ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा करण्याची मागणी तृणमूलने केली आहे.

TMC Attack On Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) च्या पराभवाचा परिणाम इंडिया आघाडीवर दिसून येत आहे. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. ममत बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने तर थेट राहुल गांधींच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राहुल गांधींना कमकुवत नेता म्हटले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'हरियाणा किंवा महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेसकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नाही. भाजपच्या विरोधात लढण्यात काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसने सर्व प्रयोग केले, पण त्यांना यश आले नाही. त्यामुळेच आता त्यांना एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे.' 

टीएमसी इंडिया आघाडीच्या बैठकीतून दूर दरम्यान, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत टीएमसी खासदार सहभागी झाले नव्हते. विशेष म्हणजे, खासदार कल्याण बॅनर्जी यांनी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचा प्रमुख बनवण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेस अन् तृणमूलमध्ये तुतू मैमै सुरू झाली आहे. काँग्रेसने आपला अहंकार दूर करावा आणि ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका