शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 17:07 IST

TMC Raises Question On Rahul Gandhi: ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा करण्याची मागणी तृणमूलने केली आहे.

TMC Attack On Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) च्या पराभवाचा परिणाम इंडिया आघाडीवर दिसून येत आहे. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. ममत बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने तर थेट राहुल गांधींच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राहुल गांधींना कमकुवत नेता म्हटले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'हरियाणा किंवा महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेसकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नाही. भाजपच्या विरोधात लढण्यात काँग्रेसला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसने सर्व प्रयोग केले, पण त्यांना यश आले नाही. त्यामुळेच आता त्यांना एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे.' 

टीएमसी इंडिया आघाडीच्या बैठकीतून दूर दरम्यान, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत टीएमसी खासदार सहभागी झाले नव्हते. विशेष म्हणजे, खासदार कल्याण बॅनर्जी यांनी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचा प्रमुख बनवण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेस अन् तृणमूलमध्ये तुतू मैमै सुरू झाली आहे. काँग्रेसने आपला अहंकार दूर करावा आणि ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका