शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

"माझ्यावर पाळत ठेवली जातेय", तृणमूल खासदाराचा धक्कादायक दावा; पत्रातून केला गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 09:37 IST

Mahua Moitra News : दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचा एक फोटो ट्विट करत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. कोणतीही मागणी केलेली नसताना घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले असल्याचं मोइत्रा यांनी म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना देखील पत्र दिलं आहे. मोइत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचा एक फोटो ट्विट करत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महुआ मोइत्रा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव आणि बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे एसएचओ यांच्याकडे आपल्या घराबाहेर तैनात असलेली सुरक्षा हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे. पत्रामध्ये मोईत्रा यांनी बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी (एसएचओ) शुक्रवारी त्यांना दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेटले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाचे तीन सशस्त्र जवान त्यांच्या घराच्या बाहेर नेमण्यात आल्याचं म्हटलं आहे. देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी हा मला दिलेला मूलभूत हक्क असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात महुआ मोईत्रा यांनी "सशस्त्र जवानांच्या हालचालींवरून असं दिसत आहे की, ते माझ्या हालचालींच्या नोंदी ठेवत आहेत. यातून मला असं जाणवतंय की मी एक प्रकारच्या पाळतीखाली आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी हा मला दिलेला मूलभूत हक्क आहे" असं म्हटलं आहे. यासोबतच सुरक्षा काढून घेण्याची देखील मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महुआ मोइत्रा यांनी काही दिवसांपूर्वी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राम मंदिराचा निर्णय दिला होता - मोइत्रा 

राष्‍ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्‍तावावर चर्चा करताना महुआ मोइत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश यांच्या राम मंदिर निर्णयाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. याला भाजपा सदस्यांनी आणि सरकारकडून विरोध करण्यात आला. मात्र, यानंतरही महुआ मोइत्रा यांनी याचा पुनरुच्चार केला होता. रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राम मंदिराचा निर्णय दिला होता, असे महुआ मोइत्रा यांनी म्हटलं होतं. याचबरोबर, महुआ मोइत्रा यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, अर्थव्यवस्थेची स्थिती, नवीन कृषी कायदे यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, न्यायव्यवस्था आता पवित्र नाही. याशिवाय, केंद्र सरकारने चुकीची माहिती आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी कुटीर उद्योग बनविला आहे. काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि असत्य याला धैर्य मानतात, असे म्हणत महुआ मोइत्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाdelhiदिल्लीPoliceपोलिसRanjan Gogoiरंजन गोगोई