शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Narada Case: “तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो”; टीएमसी खासदाराने राज्यपालांना धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 16:28 IST

राज्यपाल आणि ममता सरकार यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देखासदार कल्याण बॅनर्जी यांचे वादग्रस्त वक्तव्यराज्यपालांना तुरुंगात पाठवण्याची धमकीराज्यपाल धनखर यांच्याकडून व्हिडिओ ट्विट

कोलकाता:ममता बॅनर्जी यांनी भाजपला धूळ चारत तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर आता पश्चिम बंगालमधील नारदा स्टिंग प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. त्यातच राज्यपाल आणि ममता सरकार यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची राज्यपालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना जीभ घसरली. राज्यपाल संविधानाचे कसाई आहेत. तुमचा कार्यकाळ संपला की, तुम्हाला तुरुंगातच डांबतो, असा धमकी वजा इशारा कल्याण बॅनर्जी यांनी दिला आहे. (tmc mp kalyan banerjee controversial comments against west bengal governor jagdeep dhankhar)

नारदा गैरव्यवहार प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या अटकेसाठी राज्यपाल जगदीप धनखर जबाबदार असून, हा राज्यपालांनी रचलेला कट असल्याचा आरोप खासदार बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच कोरोना काळातील व्यवस्थापनासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान देशातील जनतेची सुरक्षा करण्यास अकार्यक्षम ठरल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला.

जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावली; मध्य प्रदेशातील घटना

तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो

जगदीप धनखर राज्यपालपदी असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येत नाही. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपताच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. तृणमूल काँग्रेस समर्थक राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक हिंसा भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करतील. तसेच भाजपाकडून राजकारण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अभियोगही दाखल केला जाईल. २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर राज्यपाल जगदीप धनखर यांच्यासह तुरुंगात भाजपाचे अनेक दिग्गज नेते असतील, असे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले

व्हिडिओ राज्यपालांकडून ट्विट

कल्याण बॅनर्जी यांनी हुगली येथील एका कार्यक्रमात बोलताना हे वादग्रस्त विधान केले. मात्र, त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ राज्यपाल धनखर यांनी ट्वीट केला असून, कल्याण बॅनर्जी यांचे विधान धक्कादायक असल्याचे राज्यपाल धनखर यांनी म्हटले आहे. अलीकडेच नारदा प्रकरणात संशय असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेस