पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत TMC वारंवार जिंकून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आली आहे, म्हणूनच केंद्र सरकारने येथील जनतेला उपाशी मारण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून राज्याची थकबाकी रोखून धरली आहे असं बॅनर्जी म्हणाले.
पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेनुसार, पूर्व बर्धमान जिल्ह्यातील रैना येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, "जर मी खोटं बोलत असेन तर भाजपाने पुराव्यासह त्याचं खंडन करावं आणि मला जेलमध्ये टाकावं. केंद्राने राज्याच्या प्रकल्पांसाठी १ लाख कोटी रुपयांहून अधिक थकबाकी अद्याप जारी केलेली नाही. बंगालच्या जनतेने सलग विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता दिल्याने येथील गरीब जनतेला उपाशी मारण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचललं आहे."
"ममता बॅनर्जींनी आव्हानाचा खंबीरपणे केला सामना"
पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघाचे खासदार यांनी "केंद्राने कितीही अडचणी निर्माण केल्या असल्या, तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सर्व आव्हानाचा खंबीरपणे सामना केला आहे. ग्रामीण रोजगारासाठी 'कर्मश्री', घरांसाठी 'बंग्लार बारी' आणि पाणीपुरवठा योजनांसारखे प्रकल्प राज्याने स्वतःच्या संसाधनांतून राबवले आहेत" असं म्हटलं आहे.
"बंगाल विरोधी पक्षाला चोख प्रत्युत्तर द्या"
"TMC ला नेहमीच तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं आहे, तर मोदींना तुमच्या डोळ्यात अश्रू पाहायचे आहेत; कारण तुम्ही वारंवार निवडणुकांमध्ये भाजपाला नाकारले आहे. तुम्हाला उपाशी मारण्याचा कट रचणाऱ्या या 'बंगाल विरोधी' पक्षाला चोख प्रत्युत्तर द्या" असं आवाहनही अभिषेक बॅनर्जी यांनी जनतेला केलं आहे.
Web Summary : Abhishek Banerjee accuses the Modi government of withholding funds to starve West Bengal due to TMC's repeated electoral victories. He claims over ₹1 lakh crore is due and challenges BJP to disprove his claims. Banerjee highlights CM Mamata Banerjee's efforts to overcome challenges with state-funded projects.
Web Summary : अभिषेक बनर्जी ने मोदी सरकार पर टीएमसी की चुनावी जीत के कारण पश्चिम बंगाल को भूखा मारने के लिए धन रोकने का आरोप लगाया। उन्होंने दावा किया कि ₹1 लाख करोड़ से अधिक बकाया है और भाजपा को उनके दावों को गलत साबित करने की चुनौती दी। बनर्जी ने राज्य द्वारा वित्त पोषित परियोजनाओं के साथ चुनौतियों को दूर करने के लिए सीएम ममता बनर्जी के प्रयासों पर प्रकाश डाला।