शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Mamata Banerjee On Congress: “काँग्रेसवर अवलंबून राहण्यात आता काहीच अर्थ नाही”; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 11:17 IST

Mamata Banerjee On Congress: काँग्रेसने तृणमूलमध्ये विलीन होऊन ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली काम करावे, या शब्दांत टीएमसी नेत्यांनी निशाणा साधला आहे.

कोलकाता: देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यांत प्रचंड मोठे यश मिळून सत्ता राखली आहे. यानंतर काँग्रेसवर चौफेर टीका होत असून, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपविरोधात लढा देण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे. काँग्रेसवर अवलंबून राहण्यात आता अर्थ नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी ममता बॅनर्जी यांनीही मीडियाशी संवाद साधताना आपली मते व्यक्त केली आहेत. काँग्रेस आता सगळीकडे पराभूत होत चालली आहे. काँग्रेसला आता जिंकण्यात काही स्वारस्य राहिलेले आहे, असे दिसत नाही. काँग्रेसची विश्वासार्हता संपत चालली आहे आणि आता त्यांच्यावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसकडे संघठन राहिलेले नाही

काँग्रेस आधी जिंकत असे, कारण काँग्रेस पक्षाचे संघटन चांगले होते, असे सांगत भाजपविरोधी गटामध्ये काँग्रेसला एकत्र ठेवण्यात अर्थ नाही. कारण ती गोष्ट आता काँग्रेसमध्ये राहिली नाही, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला. अनेक मजबूत प्रादेशिक पक्ष आहेत आणि ते एकत्र आले तर अधिक प्रभावी होतील. आता काय करायचे आहे हे काँग्रेसने ठरवायचे आहे. पण भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे मला वाटते. काँग्रेसची वाट पाहण्यात अर्थ नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्याची योजना आहे का

विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्याची तुमची योजना आहे का, या प्रश्नावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ते इतरांना ठरवू द्या. स्टॅलिन (DMK) आणि के. चंद्रशेखर राव (TRS) यांनी गेल्या महिन्यात फोनवरील संभाषणात हा प्रस्ताव मांडला होता, अशी माहिती बॅनर्जी यांनी दिली. तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसवर पलटवार करताना, केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप काँग्रेसमुक्त भारताचे नारे देतात, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी करू इच्छिते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

दरम्यान, भाजपला राष्ट्रीय पातळीवर लढा देण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. काँग्रेस पक्षाचे तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन होण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने तृणमूलमध्ये विलीन होऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे. हीच योग्य वेळ आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेस