शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 11:03 IST

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठे संकेत दिले आहेत. 

Abhishek Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय चर्चांना वेग आला आहे. मु्ख्यमंत्री ममता बॅनर्जी या आता मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका पार पाडणार आहेत का? त्यांना पुढच्या पिढीकडे राजकारण सोपवायचे आहे का? असे  प्रश्न सध्या कोलकात्यापासून दिल्लीपर्यंतच्या लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. याचे कारण म्हणजे, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठे संकेत दिले आहेत. 

डायमंड हार्बरचे खासदार पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, असे विधान राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांनी केले आहे. दरम्यान, कुणाल घोष यांच्या या विधानावर विरोधी पक्षांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.  सत्ताधारी पक्ष घराणेशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे.दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कुणाल घोष यांनी त्यांना चांगले आरोग्य, विशेषत: त्याच्या डोळ्यांशी संबंधित समस्या बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, अभिषेक बॅनर्जी यांच्या पक्षातील योगदानाचेही कुणाल घोष यांनी कौतुक केले.

कुणाल घोष यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की," अभिषेक बॅनर्जी यांनी अगदी लहान वयातच आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली आहे. मी राजकारणात सक्रीय राहो की नाही, या उगवत्या ताऱ्याला मी जवळून पाहीन. अभिषेक तरुण आहेत, पण जोपर्यंत मी टीएमसीमध्ये सक्रिय आहे, तोपर्यंत ते माझे नेता आहेत. राजकारणापलीकडेही मला त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर आहे. मी ममता बॅनर्जी यांना वर्षानुवर्षे नेतृत्व करताना पाहिले आहे, आणि आता मी अभिषेक यांना  उदयास येताना पाहत आहे."

कुणाल घोष पुढे म्हणाले की, "अभिषेक बॅनर्जी काळानुसार अधिक परिपक्व होत आहेत, आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ करत आहेत, आपल्या कौशल्यात अधिक सुधारणा करत आहेत. अभिषेक हे एक दिवस पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होतील आणि तृणमूल काँग्रेसला एका नव्या युगात घेऊन जातील. ते ममता बॅनर्जींच्या भावना आणि वारशाचे प्रतीक आहेत." दरम्यान, अभिषेक बॅनर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. त्यामुळे कुणाल घोष यांच्या दाव्यावरून कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य नसले तरी सध्या राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.

भाजप, माकपाकडून टीकाकुणाल घोष यांच्या विधानावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले, 'तृणमूल काँग्रेस हा लोकांचा पक्ष नाही, तो एक कौटुंबिक व्यवसाय आहे. ते वारसा म्हणून मुख्यमंत्रिपद सोपवण्याच्या तयारीत आहेत. पश्चिम बंगालमधील लोक अशा घराणेशाहीला कंटाळले आहेत आणि खरे प्रतिनिधित्व शोधत आहेत. दुसरीकडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) नेते सुजन चक्रवर्ती यांनीही टीएमसीवर कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगालChief Ministerमुख्यमंत्री