शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

इंडिया आघाडीत बिघाडी! काँग्रेससोबत जाण्यास तृणमूलचा नकार; सांगितली ‘ही’ ३ कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 10:57 IST

INDIA Alliance: तृणमूलने काँग्रेसवर जोरदार टीका करत इंडिया आघाडीसोबत का जात नाही, याची काही कारणे सांगितली आहेत.

INDIA Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बिनसल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. तर आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये लोकसभा निवडणुका एकट्याने लढवण्याचे ठरवले आहे. यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी तीन कारणे सांगितली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये आघाडी न होण्याची तीन कारणे आहेत, ती म्हणजे अधीर रंजन चौधरी, अधीर रंजन चौधरी आणि अधीर रंजन चौधरी. भाजपा आणि अधीर रंजन चौधरी या दोघांनीच आघाडीविरोधात वारंवार विधाने केली. बोलत तेच होते, पण शब्द दिल्लीत बसलेल्या दोघांचे होते. गेल्या दोन वर्षांत अधीर रंजन चौधरी भाजपाची भाषा बोलत आहेत. पश्चिम बंगाल केंद्रीय निधीपासून वंचित असल्याचा मुद्दा त्यांनी एकदाही उपस्थित केला नाही, या शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल केला.

भाजपा नेत्यांच्या विरोधात फारसे बोलत नाहीत

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलवर ईडीची कारवाई झाली तेव्हा अधीर रंजन चौधरी यांनी याचे समर्थन केले. ममता बॅनर्जींचा अपमान करण्यासाठी ते विशेष पत्रकार परिषदा बोलावतात, पण भाजपा नेत्यांच्या विरोधात फारसे बोलत नाहीत, असा मोठा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकांनंतर, काँग्रेसने आपले काम योग्य पद्धतीने केले आणि भाजपाला लक्षणीय जागांवर पराभूत केले, तर तृणमूल काँग्रेस राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या आणि त्यासाठी लढणाऱ्या आघाडीत पूर्णपणे सामील होईल, असे डेरेक ओब्रायन यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, डेरेक ओब्रायन परदेशातून आले आहेत. त्यांना जास्त कळते. त्यामुळे तुम्ही त्यांनाच काय ते विचार, असे प्रत्युत्तर अधीर रंजन चौधरी यांनी दिले. तसेच अधीर रंजन चौधरी यांनी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेस