शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

इंडिया आघाडीत बिघाडी! काँग्रेससोबत जाण्यास तृणमूलचा नकार; सांगितली ‘ही’ ३ कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 10:57 IST

INDIA Alliance: तृणमूलने काँग्रेसवर जोरदार टीका करत इंडिया आघाडीसोबत का जात नाही, याची काही कारणे सांगितली आहेत.

INDIA Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बिनसल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. तर आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये लोकसभा निवडणुका एकट्याने लढवण्याचे ठरवले आहे. यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी तीन कारणे सांगितली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये आघाडी न होण्याची तीन कारणे आहेत, ती म्हणजे अधीर रंजन चौधरी, अधीर रंजन चौधरी आणि अधीर रंजन चौधरी. भाजपा आणि अधीर रंजन चौधरी या दोघांनीच आघाडीविरोधात वारंवार विधाने केली. बोलत तेच होते, पण शब्द दिल्लीत बसलेल्या दोघांचे होते. गेल्या दोन वर्षांत अधीर रंजन चौधरी भाजपाची भाषा बोलत आहेत. पश्चिम बंगाल केंद्रीय निधीपासून वंचित असल्याचा मुद्दा त्यांनी एकदाही उपस्थित केला नाही, या शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल केला.

भाजपा नेत्यांच्या विरोधात फारसे बोलत नाहीत

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलवर ईडीची कारवाई झाली तेव्हा अधीर रंजन चौधरी यांनी याचे समर्थन केले. ममता बॅनर्जींचा अपमान करण्यासाठी ते विशेष पत्रकार परिषदा बोलावतात, पण भाजपा नेत्यांच्या विरोधात फारसे बोलत नाहीत, असा मोठा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकांनंतर, काँग्रेसने आपले काम योग्य पद्धतीने केले आणि भाजपाला लक्षणीय जागांवर पराभूत केले, तर तृणमूल काँग्रेस राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या आणि त्यासाठी लढणाऱ्या आघाडीत पूर्णपणे सामील होईल, असे डेरेक ओब्रायन यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, डेरेक ओब्रायन परदेशातून आले आहेत. त्यांना जास्त कळते. त्यामुळे तुम्ही त्यांनाच काय ते विचार, असे प्रत्युत्तर अधीर रंजन चौधरी यांनी दिले. तसेच अधीर रंजन चौधरी यांनी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेस