शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

इंडिया आघाडीत बिघाडी! काँग्रेससोबत जाण्यास तृणमूलचा नकार; सांगितली ‘ही’ ३ कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 10:57 IST

INDIA Alliance: तृणमूलने काँग्रेसवर जोरदार टीका करत इंडिया आघाडीसोबत का जात नाही, याची काही कारणे सांगितली आहेत.

INDIA Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बिनसल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. तर आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये लोकसभा निवडणुका एकट्याने लढवण्याचे ठरवले आहे. यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय का घेतला, याबाबत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी तीन कारणे सांगितली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये आघाडी न होण्याची तीन कारणे आहेत, ती म्हणजे अधीर रंजन चौधरी, अधीर रंजन चौधरी आणि अधीर रंजन चौधरी. भाजपा आणि अधीर रंजन चौधरी या दोघांनीच आघाडीविरोधात वारंवार विधाने केली. बोलत तेच होते, पण शब्द दिल्लीत बसलेल्या दोघांचे होते. गेल्या दोन वर्षांत अधीर रंजन चौधरी भाजपाची भाषा बोलत आहेत. पश्चिम बंगाल केंद्रीय निधीपासून वंचित असल्याचा मुद्दा त्यांनी एकदाही उपस्थित केला नाही, या शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल केला.

भाजपा नेत्यांच्या विरोधात फारसे बोलत नाहीत

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलवर ईडीची कारवाई झाली तेव्हा अधीर रंजन चौधरी यांनी याचे समर्थन केले. ममता बॅनर्जींचा अपमान करण्यासाठी ते विशेष पत्रकार परिषदा बोलावतात, पण भाजपा नेत्यांच्या विरोधात फारसे बोलत नाहीत, असा मोठा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकांनंतर, काँग्रेसने आपले काम योग्य पद्धतीने केले आणि भाजपाला लक्षणीय जागांवर पराभूत केले, तर तृणमूल काँग्रेस राज्यघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या आणि त्यासाठी लढणाऱ्या आघाडीत पूर्णपणे सामील होईल, असे डेरेक ओब्रायन यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, डेरेक ओब्रायन परदेशातून आले आहेत. त्यांना जास्त कळते. त्यामुळे तुम्ही त्यांनाच काय ते विचार, असे प्रत्युत्तर अधीर रंजन चौधरी यांनी दिले. तसेच अधीर रंजन चौधरी यांनी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेस