शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती लाडू वादाचा वणवा श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचला, प्रसादाचे नमुने चाचणीसाठी पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 22:31 IST

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रसादाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Ram Mandir Ayodhya : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेवरुन देशभरातील मोठ्या मंदिरांमध्ये केल्या जाणाऱ्या प्रसादाच्या शुद्धतेवर आणि पावित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या घटनेचा धडा घेत देशभरातील अनेक मंदिरे अलर्ट झाली आहेत. यामुळेच आता देशभरातील मंदिरांमधून प्रसादाचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराचाही समावेश आहे. श्रीराम मंदिरातील प्रसादाचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच, अयोध्येतील संतांनी बैठक घेऊन बाजारातून खरेदी केलेला प्रसाद मंदिरांमध्ये देवाला अर्पण करू नये, असे आवाहन केले. अयोध्येच्या राम मंदिरात रामाला रबडी आणि पेढा अर्पण केला जातो आणि प्रसाद म्हणून वेलचीचे दाणे वाटले जातात. या सर्व गोष्टींचे नमुने घेण्यात आले आहेत. तपास अहवाल आल्यानंतर मंदिराच्या प्रसादात भेसळ आहे की नाही, हे निश्चित होईल. 

वेळोवेळी तपास केला जातोराम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता सांगतात की, बाहेरून रामललाला प्रसाद दिला जात नाही. भाविक दर्शनासाठी रिकाम्या हाताने मंदिरात जातात. राम मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना प्रसाद म्हणून वेलची बियांचे वाटप केले जाते. लहान वेलची आणि साखर मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. हा प्रसाद स्वच्छ आणि आरोग्यदायी पद्धतीने बनवला जातो. प्रसादाची वेळोवेळी तपासणी केली जाते. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश