शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

तिरुपती लाडू वादाचा वणवा श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचला, प्रसादाचे नमुने चाचणीसाठी पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 22:31 IST

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रसादाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Ram Mandir Ayodhya : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेवरुन देशभरातील मोठ्या मंदिरांमध्ये केल्या जाणाऱ्या प्रसादाच्या शुद्धतेवर आणि पावित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या घटनेचा धडा घेत देशभरातील अनेक मंदिरे अलर्ट झाली आहेत. यामुळेच आता देशभरातील मंदिरांमधून प्रसादाचे नमुने तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराचाही समावेश आहे. श्रीराम मंदिरातील प्रसादाचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच, अयोध्येतील संतांनी बैठक घेऊन बाजारातून खरेदी केलेला प्रसाद मंदिरांमध्ये देवाला अर्पण करू नये, असे आवाहन केले. अयोध्येच्या राम मंदिरात रामाला रबडी आणि पेढा अर्पण केला जातो आणि प्रसाद म्हणून वेलचीचे दाणे वाटले जातात. या सर्व गोष्टींचे नमुने घेण्यात आले आहेत. तपास अहवाल आल्यानंतर मंदिराच्या प्रसादात भेसळ आहे की नाही, हे निश्चित होईल. 

वेळोवेळी तपास केला जातोराम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता सांगतात की, बाहेरून रामललाला प्रसाद दिला जात नाही. भाविक दर्शनासाठी रिकाम्या हाताने मंदिरात जातात. राम मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना प्रसाद म्हणून वेलची बियांचे वाटप केले जाते. लहान वेलची आणि साखर मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. हा प्रसाद स्वच्छ आणि आरोग्यदायी पद्धतीने बनवला जातो. प्रसादाची वेळोवेळी तपासणी केली जाते. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश