शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ, नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 13:13 IST

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राइक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देआपला शत्रू आपल्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेदेशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका, ही वेळ संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ

नवी दिल्ली - पुलवामा येथे जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोराने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून घेतला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. तसेच आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका, ही वेळ संपूर्ण शक्तिनिशी लष्करासोबत उभे राहण्याची वेळ आहे. असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची भावना सध्या वेगळ्या पातळीवर आहे. देशाचे वीर जवान सीमेवर आणि सीमेपार आपला पराक्रम दाखवत आहेत. आज संपूर्ण देश आज एकजुटीने आपल्या जवानांसोबत उभे आहेत. संपूर्ण जग आमची एकजूट बघत आहे. देशाच्या सेनेच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल अशी कृती करून नका. तसेच आपल्या शत्रूला आपल्याविरोधात बोट दाखवता येईल, असे वागू नका.'' 

 यावेळी पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली. ''आपला शत्रू आपल्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशाची प्रगती थांबावी, यासाठी ते प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपण सर्व देशवासीयांनी एकजुटीने उभे राहण्याची शक्यता आहे.'' असे  मोदी म्हणाले. 

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारत