शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सरकार बदलण्याची वेळ आली आहे, शरद पवार यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 05:02 IST

देशभर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले आहेत. मात्र, पंतप्रधान नेहमीप्रमाणे गप्प बसले आहेत.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : देशभर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले आहेत. मात्र, पंतप्रधान नेहमीप्रमाणे गप्प बसले आहेत. ते कोणत्या जगात राहतात, हेच समजत नाही. देशभर जनतेच्या मनात आज संतापाच्या ज्वाला उसळल्या असताना पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलायला तयार नाहीत. सारे विरोधक आज त्याची जाणीव करून देण्यासाठीच रस्त्यावर उतरले आहेत, अशा आक्रमक स्वरात सरकारला ललकारीत राहुल गांधींनी रामलीला मैदानावर २१ विरोधी पक्षांचा भारत बंद यशस्वी झाल्याची ग्वाही दिली.विरोधकांच्या संयुक्त बंदच्या निमित्ताने आयोजित धरणे कार्यक्रमात सोनिया गांधी काही काळ अवश्य सहभागी झाल्या. मात्र, त्यांनी भाषण केले नाही. त्या मंचावर आल्या तेव्हा सर्वांनाच असे वाटले की विरोधकांच्या संयुक्त आघाडीचे नेतृत्व त्याच करणार आहेत. मात्र, थोड्याच वेळात त्यांनी हा मंच सोडला व आपल्या निवासस्थानी निघून गेल्या. यानंतर रामलीला मैदानावर विरोधी पक्षांचे नेते जसजसे एकजूट होऊ लागले तेव्हा भारत बंद कार्यक्रमात विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधीच करणार आहेत, हे स्पष्ट झाले. व्यासपीठावर बोलणाऱ्या वक्त्यांचा क्रमही त्याच पद्धतीने ठरला. सर्वात शेवटी राहुल गांधींच्या आधी आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे भाषण झाले. मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवीत पवार म्हणाले, ‘सामान्य माणासाला दिलासा देण्यासाठी जी पावले सरकारने वेळीच उचलायला हवी होती ती उचलली नाहीत. साहजिकच देशभर जनतेच्या मनात रोष उत्पन्न झाला आहे. सत्तर वर्षांत काहीच झाले नाही ती बहाद्दुरी अवघ्या ४ वर्षांत आमच्या सरकारने करून दाखवली आहे, असा मोदी सरकारचा दावा आहे. प्रत्यक्षात इंधनाच्या भाववाढीबरोबर गॅसचे दरही वाढले. डॉलरच्या तुलनेत विक्रमी स्तरावर रुपयाची घसरण झाली, ही सरकारची बहाद्दुरी आहे. हे सरकार जनविरोधी आहे, हे लोकांना पटवून देण्याची जबाबदारी सर्व विरोधी पक्षांवर आहे. केंद्रातले सत्तांतर त्यामुळेच घडेल’, पोलिसांनी येचुरी यांना तासभरासाठी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले.>सरकारने मर्यादा ओलांडल्या - मनमोहन सिंगनरेंद्र मोदी सरकारने घेतलेले अनेक निर्णय देशहिताचे नाहीत. या सरकारने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे उद्गार माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सोमवारी जाहीर सभेत काढले. देशाचे सार्वभौमत्व व लोकशाही यांना वाचविण्यासाठी विरोधी पक्षांनी आपापसातले मतभेद विसरून भाजपा व नरेंद्र मोदी सरकारविरोधात एकजुटीने लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले.ते पुढे म्हणाले की, नोटाबंदी करण्यामागे नेमके काय कारण होते, याचा अद्याप कुणालाही पत्ता लागलेला नाही. त्यानंतर लघु उद्योगांचे कंबरडेच मोडले आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात सपशेल अयशस्वी ठरलेल्या मोदी सरकारच्या कामगिरीवर देशातील युवक, शेतकरी, सामान्य माणसे असे सारेच घटक नाराज आहेत.जनतेच्या मनातील ही भावना ओळखून विरोधी पक्षांनी देश व लोकशाही वाचविण्यासाठी आता संघर्ष केला पाहिजे. या सभेला यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी उपस्थित होत्या; पण त्यांनी भाषण केले नाही.>भाजप, मोदी विद्वेष पसरवत आहेत - राहुल गांधीराजघाटावरून सोमवारी सकाळी राहुल गांधी व अन्य नेते रामलीला मैदानात गेले. तिथे जाहीर सभेत भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की, जे काम सत्तर वर्षांत झाले नाही ते काम मोदी सरकारने चार वर्षांत करून दाखविले आहे ते म्हणजे देशभरात विद्वेष पसरविण्याचे. समाजातील सर्व घटकांत फूट पाडण्याचे उद्योग भाजपने केले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत दर सिलिंडरमागे ८०० रुपये झाली आहे.>गांधीजींना आदरांजली वाहून बंदची सुरुवातकैलास मानसरोवर यात्रेहून दिल्लीत परतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी १६ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.भारत बंददरम्यान सोमवारी नवी दिल्लीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेते उपस्थित होते. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराविरुद्ध काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार