शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

चर्चेचा काळ गेला...! पाकिस्तानच्या निमंत्रणावर भारताने दिले चोख प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 22:15 IST

राजदूत राजीव सिक्री यांच्या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारताना पाकिस्तानशी चर्चेचा काळ गेला आहे, असे वक्तव्य केले आहे. 

पाकिस्तानमध्ये होत असलेल्या एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आले आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारताना पाकिस्तानशी चर्चेचा काळ गेला आहे, असे वक्तव्य केले आहे. 

राजदूत राजीव सिक्री यांच्या Strategic Conundrums: Reshaping India's Foreign Policy या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन होते. यावेळी ते बोलत होते. नेबरहुड फर्स्ट पॉलिसीबाबतही पंतप्रधानांनी आपल्याशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये जागतिक संकटावेळी भारताचे शेजारी देश एका छत्रीखाली आश्रय घेतात. कृतींचे परिणाम होतात, असे जयशंकर म्हणाले. तसेच पाकिस्तानवर आपण थोडे समाधानी, धोडे असमाधानी असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सकारात्मक किंवा नकारात्मक क्रिया असेल तर आपण प्रतिक्रिया देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बांग्लादेशातील सरकारसोबत सहकार्याची वृत्ती नेहमीप्रमाणे कायम राहणार आहे. आम्ही संबंधांना सामायिक हिताच्या दृष्टिकोनातून पाहतो. तिथे झालेले राजकीय बदल आम्ही समजून घेतलेले आहेत. श्रीलंकेतील चीनची उपस्थिती पाहता भारतासाठी द्विपक्षीय संबंध महत्त्वाचे असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानशी भारताचे लोक-जनतेचे नाते खूप मजबूत आहे आणि अमेरिकेची उपस्थिती असलेला अफगाणिस्तान आणि त्यानंतरचा अफगाणिस्तान यात फरक आहे. भारताच्या अर्थसंकल्पात भूतानसाठी केलेली तरतूद ही संबंधांना किती प्राधान्य देते हेच दिसून येते, असे शेजारी देशासंबंधी भारताची भूमिका यावर त्यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तान