शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

चर्चेचा काळ गेला...! पाकिस्तानच्या निमंत्रणावर भारताने दिले चोख प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 22:15 IST

राजदूत राजीव सिक्री यांच्या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारताना पाकिस्तानशी चर्चेचा काळ गेला आहे, असे वक्तव्य केले आहे. 

पाकिस्तानमध्ये होत असलेल्या एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आले आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारताना पाकिस्तानशी चर्चेचा काळ गेला आहे, असे वक्तव्य केले आहे. 

राजदूत राजीव सिक्री यांच्या Strategic Conundrums: Reshaping India's Foreign Policy या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन होते. यावेळी ते बोलत होते. नेबरहुड फर्स्ट पॉलिसीबाबतही पंतप्रधानांनी आपल्याशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये जागतिक संकटावेळी भारताचे शेजारी देश एका छत्रीखाली आश्रय घेतात. कृतींचे परिणाम होतात, असे जयशंकर म्हणाले. तसेच पाकिस्तानवर आपण थोडे समाधानी, धोडे असमाधानी असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सकारात्मक किंवा नकारात्मक क्रिया असेल तर आपण प्रतिक्रिया देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बांग्लादेशातील सरकारसोबत सहकार्याची वृत्ती नेहमीप्रमाणे कायम राहणार आहे. आम्ही संबंधांना सामायिक हिताच्या दृष्टिकोनातून पाहतो. तिथे झालेले राजकीय बदल आम्ही समजून घेतलेले आहेत. श्रीलंकेतील चीनची उपस्थिती पाहता भारतासाठी द्विपक्षीय संबंध महत्त्वाचे असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानशी भारताचे लोक-जनतेचे नाते खूप मजबूत आहे आणि अमेरिकेची उपस्थिती असलेला अफगाणिस्तान आणि त्यानंतरचा अफगाणिस्तान यात फरक आहे. भारताच्या अर्थसंकल्पात भूतानसाठी केलेली तरतूद ही संबंधांना किती प्राधान्य देते हेच दिसून येते, असे शेजारी देशासंबंधी भारताची भूमिका यावर त्यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तान