शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
2
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
3
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
4
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
5
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
6
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
7
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
8
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

पाकिस्तानला हुसकवणारा वाघ परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 5:28 AM

वाघा बॉर्डर : पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना हुसकावून लावणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी शुक्रवारी रात्री ९ ...

वाघा बॉर्डर : पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना हुसकावून लावणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी पाकिस्तानातून भारताच्या भूमीत पाऊल टाकले.

पाकच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन वर्धमान यांना भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले. तेथून त्यांना लगेचच अमृतसरला नेण्यात आले. तिथे त्यांचे आई-वडील वाट पाहत होते. तेथून ते सर्व जण हवाई दलाच्या विशेष विमानाने अधिकाऱ्यांसह दिल्लीकडे रवाना झाले. ते दिल्लीच्या पालम विमानतळावर नेण्यात आले. पालम विमानतळ हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आहे. तिथे ते रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तिथेही त्यांच्या स्वागतासाठी हवाई दलाचे, तसेच लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी भारतीय भूमीत प्रवेश केला, तेव्हा त्यांनी निळ्या रंगाचा कोट घातला होता. त्यांच्या चेहºयावर हास्यही दिसत होते. मात्र, गंभीरपणे ते साºया औपचारिक प्रक्रियांना सामोरे गेले. ते भारतात आल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून दिसताच भारताच्या अनेक भागांत फटाके वाजवण्यात आले आणि मिठाईही वाटण्यात आले. रात्री अनेक शहरांत लोक भारतीय तिरंगा फडकावून आणि ‘भारत माता की जय’ चा जयजयकार करताना दिसत होते.

पाकिस्तानमधून भारतीय भूमीवर प्रवेश करताना, ते अतिशय आत्मविश्वासाने चालताना दिसत होते. त्यांच्यासोबत हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन थॉमस जॉय कुरियन तसेच भारताचे पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील संरक्षण विभागाचे अधिकारी होते. तसेच काही पाकिस्तानी अधिकारीही होते.भारतीय सीमेवर ते जेमतेम पाचच मिनिटे होते. तेथून हवाई दलाच्या कारमधून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अमृतसरला नेले. ते २९ किलोमीटरचे अंतर पार करायला त्यांना सुमारे अर्धा तास लागला. ते अमृतसरला पोहोचले, तेव्हा ९ वाजून ५0 मिनिटे झाले होते. विमानतळावरच ते जेवतील, असे आधी ठरले होते. पण नंतर हवाई दलाच्या विमानातच जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी पालम विमानतळावर साडेदहा वाजण्याच्या सुमारात पोहोचणार होते. त्यामुळे पंतप्रधान विमानतळावरून निघून गेल्यानंतर हवाई दलाचे विमान तिथे पोहाचले.

दिल्लीत पोहोचताच, त्यांना लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांची प्रकृती तपासण्यात आली. त्यांच्या शरीरावर जखमा आहेत का, त्या कशामुळे झाल्या आहेत, ही सर्व माहिती तेथील डॉक्टरांनी घेतली. तसेच काही उपचारही करण्यात आले. ते मानसिकरित्या शांत आहेत ना, हेही डॉक्टरांनी तपासले. अर्थात ते भारतात अतिशय धिरोदात्तपणे आले होते. त्यामुळे केवळ उपचार म्हणून हे सारे करण्यात आले.

वाघा बार्डर तिथे उपस्थित असलेल्या हजारो भारतीयांना परत जाण्याची विनंती करण्यात आली. पण तरीही तेथून लोक हलायला तयार नव्हते. अभिनंदन यांचे आगमन होणार असल्याने या सीमेवर रोज संध्याकाळी होणारा बिटिंग द रिट्रीट हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. तरीही वाघा बॉर्डरच्या परिसरात सुमारे २५ हजार लोक उपस्थित होते. पण अभिनंदन आले, तेव्हा त्यांना जवळ येऊ ही दिले नाही. त्यामुळे हे लोक तिथे असूनही या भारतीय वाघाला पाहू शकले नाहीत. त्यांची कार जातानाच त्यांना पहायला मिळाले. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान