शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

जंगलाच्या वाटेने तिघं युवक रात्रीच्या अंधारातून जात होते, तितक्याच दबा धरून बसलेला वाघ आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:25 IST

पीलीभीतच्या दियूरिया कला येथे राहणारे ३ युवक रात्रीच्या वेळी बाईकवरून प्रवास करत होते.

ठळक मुद्देया घटनेबाबत गावात बातमी पसरल्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. पोलिसांनी वनविभागाच्या सहाय्याने जंगलात शोधमोहिम सुरू केली. जंगलात पुढे गेल्यानंतर एकाचा मृत्यू अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला. पीलीभीत जिल्ह्यात वाघाने हल्ला केल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकदा वाघाने लोकांवर हल्ले केले आहेत

उत्तर प्रदेशच्या पीलीभीत एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका वाघाने दुचाकीवरून जाणाऱ्या ३ युवकांवर हल्ला केला आहे. ज्यात २ युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्याने कसाबसा स्वत:चा जीव वाचवला आहे. पोलिसांनी २ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. तर एकाची अवस्था ठीक आहे

पीलीभीतच्या दियूरिया कला येथे राहणारे ३ युवक रात्रीच्या वेळी बाईकवरून प्रवास करत होते. त्यावेळी जंगलाच्या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने या तिघांवर हल्ला केला. यात २ युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिसरा जखमी अवस्थेत एका झाडावर चढला त्यामुळे त्याचा जीव वाचला. या घटनेबाबत गावात बातमी पसरल्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. झाडावर चढलेल्या युवकाने सांगितले की, आम्ही तिघं घरच्या दिशेने येत होतो. तेव्हा रस्त्यात जंगल येते. त्याठिकाणी वाघाने अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर वाघाने दोघांनाही जंगलात नेले. मी झाडावर चढून बसलो होतो. त्यामुळे माझा जीव वाचला. सकाळी जेव्हा लोकांनी मला पाहिल्यानंतर खाली उतरवलं.

या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वनविभागाच्या सहाय्याने जंगलात शोधमोहिम सुरू केली. जंगलात पुढे गेल्यानंतर एकाचा मृत्यू अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला. तर दुसरीकडे सोनूचा मृतदेह काही अंतरावर सापडला. हे तिघं शाहजहांपूर येथे नातेवाईकांच्या घरी गेले होते. तिथून परतताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाच्या टीमने वाघाला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पीलीभीत जिल्ह्यात वाघाने हल्ला केल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकदा वाघाने लोकांवर हल्ले केले आहेत. वन्यप्राण्यांनी आतापर्यंत केलेल्या हल्ल्यात अनेक लोकांचे जीव गेले आहेत. या हल्ल्याबाबत पोलीस अधीक्षक किरीट राठोड म्हणाले की, वाघाने तीन युवकांवर हल्ला केला आहे. ज्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीने प्रसंगावधना राखत त्याचा जीव वाचवला आहे. दोघांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. या घटनेचा आणखी तपास केला जात आहे. तर घटनास्थळापासून आजूबाजूला २० कॅमेरा लावण्यात आले आहेत. अलर्ट जारी केला आहे. लोकांनी या रोडने एकट्याने जाऊ नये असं वनविभागाने आवाहन केले आहे.  

टॅग्स :Tigerवाघforestजंगल