शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

बिहारमध्ये जन-गन-मन यात्रेवर 8 वेळा दगडफेक अन् आता कन्हैया कुमारवर फेकली चप्पल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:20 IST

एनआरसी आणि सीएएविरोधात कन्हैयाने 'जन-गण-मन' यात्रा काढली आहे. एका महिन्याच्या या कालावधीत ते बिहारमधील बहुतेक सर्व प्रमुख शहरांमध्ये भेट देणार आहे.

ठळक मुद्देएनआरसी आणि सीएएविरोधात कन्हैयाची 'जन-गण-मन' यात्राबिहारमध्ये कन्हैया कुमार 50 सभा घेणार कन्हैया कुमार यांना देशात दंगल भडकवायची आहे, चप्पल फेकणाऱ्याचा आरोप

पटणा - बिहारमध्ये पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) च्या छात्रसंघाचे माजी अध्यक्ष आणि माकपचे नेते कन्हैया कुमार यांना विरोधाचा सामना करावा लागला आहे. कन्हैया यांची जन गण मन यात्रा लखीसराय येथे पोहचल्यानंतर कन्हैयाच्या सभेदरम्यान मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. चप्पल स्टेजवर पोहोचली नाही. दरम्यान, कार्यकर्त्यांनी आरोपी युवकाला पकडून जोरदार मारहाण केली. 

कन्हैया कुमार यांच्या बिहार येथील यात्रेवर आतापर्यंत 8 वेळा दगडफेक करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया आपल्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार गांधी मैदान येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरूणाने मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. पण ही चप्पल स्टेजपर्यंत पोहचू शकत नाही. मात्र यावेळी काही कार्यकर्त्यांनी आरोपी तरूणाला पकडून जोरदार मारहाण केली. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी जमावापासून तरूणांना वाचवले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कन्हैया कुमार यांच्या दिशेने चप्पल फेकणाऱ्या युवकाचे नाव चंदन कुमार असे आहे.

आरामध्येही यात्रेवर दगडफेक चंदनने सांगितले की, कन्हैया कुमार यांना देशात दंगल भडकवायची आहे. डाव्यांची विचारसरणी कधीही चालणार नाही असं सांगत मी देशभक्त आहे असं तो म्हणाला. याआधी शुक्रवारी कन्हैयाच्या ताफ्यावरही आरा येथे दगडफेक करण्यात आली होती, त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

कन्हैया कुमार बिहारमध्ये घेणार 50 सभा एनआरसी आणि सीएएविरोधात कन्हैयाने 'जन-गण-मन' यात्रा काढली आहे. एका महिन्याच्या या कालावधीत ते बिहारमधील बहुतेक सर्व प्रमुख शहरांमध्ये भेट देणार आहे. सुमारे 50 सभा बिहारमध्ये होणार आहे. कन्हैयाने 30 जानेवारी रोजी बेतियाहून हा यात्रेला सुरुवात केली. 29 फेब्रुवारीला त्यांची यात्रा संपणार आहे. यापूर्वी कन्हैयाच्या ताफ्यावर जमुई, सुपौल, कटिहारसह अनेक भागात हल्ला झाला आहे. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारBiharबिहारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी