शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कठुआ बलात्कार व खून खटल्यात तिघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 02:59 IST

तीन पोलिसांनाही कैद : आठ वर्षांच्या पीडितेस मरणोत्तर न्याय

पठाणकोट : संपूर्ण देशात ज्यामुळे संतापाची लाट उसळली होती त्या जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या मुलीच्या बलात्कार व खून खटल्यात न्यायालयाने सोमवारी तीन मुख्य आरोपींना जन्मठेप व तीन पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या घटनेला आलेला राजकीय रंग व स्थानिक वकिलांचा बहिष्कार यामुळे सर्वोच्च न्यायालयाने खटला पंजाबमधील पठाणकोट येथे चालविण्याचा आदेश दिला होता.

सत्र न्यायाधीश तेजविंदर सिंग यांनी निकाल सोमवारी सकाळी जाहीर करताना सातपैकी सहा आरोपींना दोषी धरले. शिक्षेवरील युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. खटल्याचे कामकाज ‘इन कॅमेरा’ चालले. नंतर वकिलांनी बाहेर आल्यावर निकालाची माहिती दिली. कठुआच्या रसाना गावात माणुसकीला काळिमा फासणारा गुन्हा घडला. गावप्रमुख व माजी अधिकारी सांझीराम जनगोत्रा, पुतण्या प्रवेश कुमार व पोलीस अधिकारी दीपक खजुरिया या तिघांना कट रचणे, सामूहिक बलात्कार व खून या गुन्ह्यांसाठी जन्मठेप ठोठावण्यात आली. सांझीराम व त्याच्या बहिणीकडून अनुक्रमे तीन लाख व दीड लाख रुपयांची लाच घेऊन प्रकरण दडपून टाकू पाहणारे पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्त वर्मा, जमादार तिलक राज व पोलीस अधिकारी सुरिंदर कुमार वर्मा यांना पाच वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली.

सांझीरामचा मुलगा विशाल जनगोत्रा हाही आरोपी होता. परंतु ही घटना घडली तेव्हा आपण उत्तर प्रदेशमध्ये मुजफ्फरनगरला परीक्षा देत होतो, हा बचाव मान्य करून न्यायालयाने त्यास निर्दोष मुक्त केले. गेल्या वर्षी ३१ मेपासून खटल्याची रोज सुनावणी झाली. आरोपींनाही गुरदासपूर कारागृहात ठेवले होते. विशेष म्हणजे १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची तरतूद करणारा वटहुकूम काश्मीर सरकारने या घटनेनंतर काढला. धार्मिक द्वेषाचे पाशवी कृत्य पीडित मुलगी बक्करवाल या भटक्या मुस्लीम समाजातील होती. काश्मीर पोलिसांच्या तपासी पथकाच्या आरोपपत्रानुसार या समाजाचा मुक्काम कठुआ जिल्ह्यात असताना त्यांच्याकडून काही हिंदू मुलांना मारहाण झाली होती. याचा सूड उगवण्यासाठी बलात्काराचा कट रचला गेला. कुरणांत घोडे चरायला घेऊन गेलेल्या मुलीचे अपहरण केले गेले. तिला गुंगी आणणारे औषध पाजून रसाना गावातील सांझीराम यांच्या मालकीच्या देवळात आठवडाभर डांबले. या काळात तिच्यावर वारंवार बलात्कार केले आणि नंतर गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केल्यावर तिचा मृतदेह बाहेर फेकून देण्यात आला. सरकारमध्ये आले वितुष्टया घटनेला धामिक व राजकीय रंग दिला गेला. गावकऱ्यांच्या विरोधामुळे मुलीचा दफनविधी आठ किमी दूर करावा लागला. त्यानंतर तो भटका समाज जिल्हा सोडून निघून गेला. त्यावेळी काश्मीरच्या सरकारमधील चौधरी लाल सिंग व चंदर प्रकाश गंगा या भाजपच्या मंत्र्यांनी आरोपींचे समर्थन केले होते. वकिलांनाही असहकार पुकारून पोलिसांना आरोपपत्र दाखल करू दिले नाही. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली होती.

 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी