शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कठुआ बलात्कार व खून खटल्यात तिघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 02:59 IST

तीन पोलिसांनाही कैद : आठ वर्षांच्या पीडितेस मरणोत्तर न्याय

पठाणकोट : संपूर्ण देशात ज्यामुळे संतापाची लाट उसळली होती त्या जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या मुलीच्या बलात्कार व खून खटल्यात न्यायालयाने सोमवारी तीन मुख्य आरोपींना जन्मठेप व तीन पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या घटनेला आलेला राजकीय रंग व स्थानिक वकिलांचा बहिष्कार यामुळे सर्वोच्च न्यायालयाने खटला पंजाबमधील पठाणकोट येथे चालविण्याचा आदेश दिला होता.

सत्र न्यायाधीश तेजविंदर सिंग यांनी निकाल सोमवारी सकाळी जाहीर करताना सातपैकी सहा आरोपींना दोषी धरले. शिक्षेवरील युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. खटल्याचे कामकाज ‘इन कॅमेरा’ चालले. नंतर वकिलांनी बाहेर आल्यावर निकालाची माहिती दिली. कठुआच्या रसाना गावात माणुसकीला काळिमा फासणारा गुन्हा घडला. गावप्रमुख व माजी अधिकारी सांझीराम जनगोत्रा, पुतण्या प्रवेश कुमार व पोलीस अधिकारी दीपक खजुरिया या तिघांना कट रचणे, सामूहिक बलात्कार व खून या गुन्ह्यांसाठी जन्मठेप ठोठावण्यात आली. सांझीराम व त्याच्या बहिणीकडून अनुक्रमे तीन लाख व दीड लाख रुपयांची लाच घेऊन प्रकरण दडपून टाकू पाहणारे पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्त वर्मा, जमादार तिलक राज व पोलीस अधिकारी सुरिंदर कुमार वर्मा यांना पाच वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली.

सांझीरामचा मुलगा विशाल जनगोत्रा हाही आरोपी होता. परंतु ही घटना घडली तेव्हा आपण उत्तर प्रदेशमध्ये मुजफ्फरनगरला परीक्षा देत होतो, हा बचाव मान्य करून न्यायालयाने त्यास निर्दोष मुक्त केले. गेल्या वर्षी ३१ मेपासून खटल्याची रोज सुनावणी झाली. आरोपींनाही गुरदासपूर कारागृहात ठेवले होते. विशेष म्हणजे १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची तरतूद करणारा वटहुकूम काश्मीर सरकारने या घटनेनंतर काढला. धार्मिक द्वेषाचे पाशवी कृत्य पीडित मुलगी बक्करवाल या भटक्या मुस्लीम समाजातील होती. काश्मीर पोलिसांच्या तपासी पथकाच्या आरोपपत्रानुसार या समाजाचा मुक्काम कठुआ जिल्ह्यात असताना त्यांच्याकडून काही हिंदू मुलांना मारहाण झाली होती. याचा सूड उगवण्यासाठी बलात्काराचा कट रचला गेला. कुरणांत घोडे चरायला घेऊन गेलेल्या मुलीचे अपहरण केले गेले. तिला गुंगी आणणारे औषध पाजून रसाना गावातील सांझीराम यांच्या मालकीच्या देवळात आठवडाभर डांबले. या काळात तिच्यावर वारंवार बलात्कार केले आणि नंतर गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केल्यावर तिचा मृतदेह बाहेर फेकून देण्यात आला. सरकारमध्ये आले वितुष्टया घटनेला धामिक व राजकीय रंग दिला गेला. गावकऱ्यांच्या विरोधामुळे मुलीचा दफनविधी आठ किमी दूर करावा लागला. त्यानंतर तो भटका समाज जिल्हा सोडून निघून गेला. त्यावेळी काश्मीरच्या सरकारमधील चौधरी लाल सिंग व चंदर प्रकाश गंगा या भाजपच्या मंत्र्यांनी आरोपींचे समर्थन केले होते. वकिलांनाही असहकार पुकारून पोलिसांना आरोपपत्र दाखल करू दिले नाही. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली होती.

 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी