शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तीन राज्यांनी दिले ५६ आमदार; आता सीएम आदिवासी हवा, भाजपवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 10:01 IST

२०१८ मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील एसटीच्या ७६ पैकी १९ जागा, तसेच राजस्थानमधील २५ पैकी ८ जागा जिंकल्या होत्या.

हरीश गुप्तानवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील आदिवासींच्या अनेक जागा भाजपने जिंकल्यामुळे छत्तीसगडमध्ये किमान एका आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रिपदी नेमण्यासाठी मोठा दबाव आहे.

२०१८ मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील एसटीच्या ७६ पैकी १९ जागा, तसेच राजस्थानमधील २५ पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. २०२३ मध्ये या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भाजपने तीन राज्यांत ५६ जागा जिंकल्या असून, आता मुख्यमंत्रिपदी एसटी नेत्याची निवड होण्याची शक्यता वाढली आहे. २०२३ मध्ये भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये एसटीच्या ४४ आणि राजस्थानमध्ये १२ जागा जिंकल्या आहेत. महिला आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड करण्याच्या भाजपच्या निर्णयामुळे पक्षाला मोठा राजकीय लाभ झाला, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

छत्तीसगडमध्ये आदिवासीबहुल जागा भाजपने जिंकल्यामुळे पक्षाचा सत्तेचा मार्ग सुकर झाला. या एकूण २९ मतदारसंघांपैकी यावेळी १७ जागा भाजपने जिंकल्या. गेल्या वेळी भाजपने केवळ तीनच जागांवर विजय मिळविला हाेता.

अनेकांचे मत आहे की, आदिवासी मंत्रालयाच्या राज्यमंत्री रेणुका सिंग सरुता यांना विधानसभेत उमेदवारी दिल्याचा भाजपला भरपूर लाभ झाला. त्या आदिवासी आहेत व मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव कायम आघाडीवर आहे.

टॅग्स :BJPभाजपाChhattisgarhछत्तीसगडElectionनिवडणूक