शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तीन बडे अधिकारी शहीद...! पाकिस्तानने पुन्हा तीच चूक केली; सीमेपलिकडे मोठ्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:54 IST

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये कार्यरत काही दहशतवादी छावण्या मागे घेतल्या जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने येत आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्याचे तीन मोठ्या रँकचे अधिकारी शहीद झाले. एक कर्नल, एक मेजर आणि एक डीएसपी होते. कोकेरनाग भागात जवानांवह हल्ला करणारे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना चारही बाजुंनी घेरले गेले होते. अचानक समोरून हल्ला झाला आणि यात राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष धोनचक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना प्राण गमवावा लागला. 

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण भारतात शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून पुतळे जाळण्यात येत आहेत. भारतीय लष्करही दहशतवाद्यांना घेरण्यासाठी पूर्ण पुराव्यानिशी खोऱ्यात दाखल झाले आहे. या हल्ल्याशी संबंधित लष्कराच्या दोन्ही दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे वृत्त आहे. 

अनंतनाग चकमकीमुळे पाकिस्तानही घाबरल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या हवाई हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान चिंतेत दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये कार्यरत काही दहशतवादी छावण्या मागे घेतल्या जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने येत आहे. सूत्रांनी सांगितले की, हे दहशतवादी तळ एलओसीजवळील लॉन्च पॅडच्या दिशेने हलवण्यात आले आहेत. किंबहुना गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी तळांमध्ये दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे.

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीजवळ काही दहशतवादी तळ हलवल्याची माहिती मिळाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी लष्कराने दहशतवादी तळ हलवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना भारतीय लष्कराच्या कारवाईपासून वाचवणे. हलवण्यात आलेल्या दहशतवादी तळांमध्ये काही छावण्या आहेत जे नियंत्रण रेषेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहेत.

याआधीही पाकिस्तानने केली होती चूक-

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून बदला घेण्याचे ठरवले होते. पुलवामा हल्ल्याच्या बरोबर १२ दिवसांनी, म्हणजे २६ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३ वाजता भारताने बालाकोट हवाई हल्ला केला आणि पाकिस्तानच्या सुमारे ३०० दहशतवाद्यांना ठार केले. सरकारी दाव्यानुसार, मिराज-२००० ने दहशतवादी लक्ष्यांवर सुमारे १००० किलो वजनाचे बॉम्ब टाकले. भारताच्या या कृतीची पाकिस्तानला कल्पनाही नव्हती. पाकिस्तानला ही चूक चांगलीच महागात पडली होती. आता पुन्हा भारत हल्ला करणार असल्याच्यी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे.

आयएसआयकडून दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी दबाव 

पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) सक्रिय असून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करण्यासाठी दबाव आणत असल्याची माहिती मिळाली आहे. आयएसआयने या दहशतवादी संघटनांना इशारा दिला होता की, मोठे हल्ले करण्यात ते यशस्वी झाले नाहीत, तर त्यांना पाकिस्तानकडून मिळणारा निधी बंद केला जाईल.

दहशतवादी संघटनांना शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न-

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोठे दहशतवादी हल्ले होत नसल्यामुळे आयएसआय चिंतेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ती तिच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. अशा स्थितीत त्यांनी दहशतवाद्यांवर दबाव टाकण्याची रणनीती आखली आणि त्यांना हल्ले करण्यासाठी भडकावण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषेवरून शस्त्रे पाठवण्याचा ISI सातत्याने प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत