शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

तीन बडे अधिकारी शहीद...! पाकिस्तानने पुन्हा तीच चूक केली; सीमेपलिकडे मोठ्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:54 IST

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये कार्यरत काही दहशतवादी छावण्या मागे घेतल्या जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने येत आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्याचे तीन मोठ्या रँकचे अधिकारी शहीद झाले. एक कर्नल, एक मेजर आणि एक डीएसपी होते. कोकेरनाग भागात जवानांवह हल्ला करणारे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना चारही बाजुंनी घेरले गेले होते. अचानक समोरून हल्ला झाला आणि यात राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष धोनचक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना प्राण गमवावा लागला. 

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण भारतात शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून पुतळे जाळण्यात येत आहेत. भारतीय लष्करही दहशतवाद्यांना घेरण्यासाठी पूर्ण पुराव्यानिशी खोऱ्यात दाखल झाले आहे. या हल्ल्याशी संबंधित लष्कराच्या दोन्ही दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे वृत्त आहे. 

अनंतनाग चकमकीमुळे पाकिस्तानही घाबरल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या हवाई हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान चिंतेत दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये कार्यरत काही दहशतवादी छावण्या मागे घेतल्या जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने येत आहे. सूत्रांनी सांगितले की, हे दहशतवादी तळ एलओसीजवळील लॉन्च पॅडच्या दिशेने हलवण्यात आले आहेत. किंबहुना गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी तळांमध्ये दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे.

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीजवळ काही दहशतवादी तळ हलवल्याची माहिती मिळाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी लष्कराने दहशतवादी तळ हलवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना भारतीय लष्कराच्या कारवाईपासून वाचवणे. हलवण्यात आलेल्या दहशतवादी तळांमध्ये काही छावण्या आहेत जे नियंत्रण रेषेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहेत.

याआधीही पाकिस्तानने केली होती चूक-

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून बदला घेण्याचे ठरवले होते. पुलवामा हल्ल्याच्या बरोबर १२ दिवसांनी, म्हणजे २६ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३ वाजता भारताने बालाकोट हवाई हल्ला केला आणि पाकिस्तानच्या सुमारे ३०० दहशतवाद्यांना ठार केले. सरकारी दाव्यानुसार, मिराज-२००० ने दहशतवादी लक्ष्यांवर सुमारे १००० किलो वजनाचे बॉम्ब टाकले. भारताच्या या कृतीची पाकिस्तानला कल्पनाही नव्हती. पाकिस्तानला ही चूक चांगलीच महागात पडली होती. आता पुन्हा भारत हल्ला करणार असल्याच्यी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे.

आयएसआयकडून दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी दबाव 

पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) सक्रिय असून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करण्यासाठी दबाव आणत असल्याची माहिती मिळाली आहे. आयएसआयने या दहशतवादी संघटनांना इशारा दिला होता की, मोठे हल्ले करण्यात ते यशस्वी झाले नाहीत, तर त्यांना पाकिस्तानकडून मिळणारा निधी बंद केला जाईल.

दहशतवादी संघटनांना शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न-

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोठे दहशतवादी हल्ले होत नसल्यामुळे आयएसआय चिंतेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ती तिच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. अशा स्थितीत त्यांनी दहशतवाद्यांवर दबाव टाकण्याची रणनीती आखली आणि त्यांना हल्ले करण्यासाठी भडकावण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषेवरून शस्त्रे पाठवण्याचा ISI सातत्याने प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत