शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तीन बडे अधिकारी शहीद...! पाकिस्तानने पुन्हा तीच चूक केली; सीमेपलिकडे मोठ्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:54 IST

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये कार्यरत काही दहशतवादी छावण्या मागे घेतल्या जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने येत आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्याचे तीन मोठ्या रँकचे अधिकारी शहीद झाले. एक कर्नल, एक मेजर आणि एक डीएसपी होते. कोकेरनाग भागात जवानांवह हल्ला करणारे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना चारही बाजुंनी घेरले गेले होते. अचानक समोरून हल्ला झाला आणि यात राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष धोनचक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना प्राण गमवावा लागला. 

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण भारतात शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून पुतळे जाळण्यात येत आहेत. भारतीय लष्करही दहशतवाद्यांना घेरण्यासाठी पूर्ण पुराव्यानिशी खोऱ्यात दाखल झाले आहे. या हल्ल्याशी संबंधित लष्कराच्या दोन्ही दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे वृत्त आहे. 

अनंतनाग चकमकीमुळे पाकिस्तानही घाबरल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या हवाई हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान चिंतेत दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये कार्यरत काही दहशतवादी छावण्या मागे घेतल्या जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने येत आहे. सूत्रांनी सांगितले की, हे दहशतवादी तळ एलओसीजवळील लॉन्च पॅडच्या दिशेने हलवण्यात आले आहेत. किंबहुना गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी तळांमध्ये दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे.

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीजवळ काही दहशतवादी तळ हलवल्याची माहिती मिळाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी लष्कराने दहशतवादी तळ हलवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना भारतीय लष्कराच्या कारवाईपासून वाचवणे. हलवण्यात आलेल्या दहशतवादी तळांमध्ये काही छावण्या आहेत जे नियंत्रण रेषेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहेत.

याआधीही पाकिस्तानने केली होती चूक-

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून बदला घेण्याचे ठरवले होते. पुलवामा हल्ल्याच्या बरोबर १२ दिवसांनी, म्हणजे २६ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३ वाजता भारताने बालाकोट हवाई हल्ला केला आणि पाकिस्तानच्या सुमारे ३०० दहशतवाद्यांना ठार केले. सरकारी दाव्यानुसार, मिराज-२००० ने दहशतवादी लक्ष्यांवर सुमारे १००० किलो वजनाचे बॉम्ब टाकले. भारताच्या या कृतीची पाकिस्तानला कल्पनाही नव्हती. पाकिस्तानला ही चूक चांगलीच महागात पडली होती. आता पुन्हा भारत हल्ला करणार असल्याच्यी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे.

आयएसआयकडून दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी दबाव 

पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) सक्रिय असून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करण्यासाठी दबाव आणत असल्याची माहिती मिळाली आहे. आयएसआयने या दहशतवादी संघटनांना इशारा दिला होता की, मोठे हल्ले करण्यात ते यशस्वी झाले नाहीत, तर त्यांना पाकिस्तानकडून मिळणारा निधी बंद केला जाईल.

दहशतवादी संघटनांना शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न-

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोठे दहशतवादी हल्ले होत नसल्यामुळे आयएसआय चिंतेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ती तिच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. अशा स्थितीत त्यांनी दहशतवाद्यांवर दबाव टाकण्याची रणनीती आखली आणि त्यांना हल्ले करण्यासाठी भडकावण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषेवरून शस्त्रे पाठवण्याचा ISI सातत्याने प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत