शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

तीन बडे अधिकारी शहीद...! पाकिस्तानने पुन्हा तीच चूक केली; सीमेपलिकडे मोठ्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 14:54 IST

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये कार्यरत काही दहशतवादी छावण्या मागे घेतल्या जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने येत आहे.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्याचे तीन मोठ्या रँकचे अधिकारी शहीद झाले. एक कर्नल, एक मेजर आणि एक डीएसपी होते. कोकेरनाग भागात जवानांवह हल्ला करणारे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना चारही बाजुंनी घेरले गेले होते. अचानक समोरून हल्ला झाला आणि यात राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष धोनचक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना प्राण गमवावा लागला. 

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण भारतात शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून पुतळे जाळण्यात येत आहेत. भारतीय लष्करही दहशतवाद्यांना घेरण्यासाठी पूर्ण पुराव्यानिशी खोऱ्यात दाखल झाले आहे. या हल्ल्याशी संबंधित लष्कराच्या दोन्ही दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे वृत्त आहे. 

अनंतनाग चकमकीमुळे पाकिस्तानही घाबरल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या हवाई हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान चिंतेत दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये कार्यरत काही दहशतवादी छावण्या मागे घेतल्या जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने येत आहे. सूत्रांनी सांगितले की, हे दहशतवादी तळ एलओसीजवळील लॉन्च पॅडच्या दिशेने हलवण्यात आले आहेत. किंबहुना गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी तळांमध्ये दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे.

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीजवळ काही दहशतवादी तळ हलवल्याची माहिती मिळाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी लष्कराने दहशतवादी तळ हलवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना भारतीय लष्कराच्या कारवाईपासून वाचवणे. हलवण्यात आलेल्या दहशतवादी तळांमध्ये काही छावण्या आहेत जे नियंत्रण रेषेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहेत.

याआधीही पाकिस्तानने केली होती चूक-

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून बदला घेण्याचे ठरवले होते. पुलवामा हल्ल्याच्या बरोबर १२ दिवसांनी, म्हणजे २६ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३ वाजता भारताने बालाकोट हवाई हल्ला केला आणि पाकिस्तानच्या सुमारे ३०० दहशतवाद्यांना ठार केले. सरकारी दाव्यानुसार, मिराज-२००० ने दहशतवादी लक्ष्यांवर सुमारे १००० किलो वजनाचे बॉम्ब टाकले. भारताच्या या कृतीची पाकिस्तानला कल्पनाही नव्हती. पाकिस्तानला ही चूक चांगलीच महागात पडली होती. आता पुन्हा भारत हल्ला करणार असल्याच्यी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे.

आयएसआयकडून दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी दबाव 

पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) सक्रिय असून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करण्यासाठी दबाव आणत असल्याची माहिती मिळाली आहे. आयएसआयने या दहशतवादी संघटनांना इशारा दिला होता की, मोठे हल्ले करण्यात ते यशस्वी झाले नाहीत, तर त्यांना पाकिस्तानकडून मिळणारा निधी बंद केला जाईल.

दहशतवादी संघटनांना शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न-

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोठे दहशतवादी हल्ले होत नसल्यामुळे आयएसआय चिंतेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ती तिच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. अशा स्थितीत त्यांनी दहशतवाद्यांवर दबाव टाकण्याची रणनीती आखली आणि त्यांना हल्ले करण्यासाठी भडकावण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषेवरून शस्त्रे पाठवण्याचा ISI सातत्याने प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत