मॉडेलचे अपहरण करणार्या तीन पोलिसांना अटक
By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:09+5:302015-04-24T00:55:09+5:30
मॉडेलचे अपहरण करणार्या तीन पोलिसांना अटक

मॉडेलचे अपहरण करणार्या तीन पोलिसांना अटक
म डेलचे अपहरण करणार्या तीन पोलिसांना अटकपोलीस ठाण्यात विनयभंग : सुटकेसाठी चार लाख उकळल्याचा आरोपमुंबई : शहरातील पंचतारांकित हॉटेलबाहेरून मॉडेल व तिच्या मित्राचे अपहरण करून पोलीस ठाण्यात आणून तिचा विनयभंग करून साडेचार लाखांची खंडणी उकळण्याचा आरोप तीन पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात तीन पोलिसांसह सहाजणांना गुरूवारी गजाआड करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे.बुधवारी या मॉडेलने पोलीस आयुक्त राकेश मारिया सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेत घडला प्रकार सांगितला. तेव्हा मारिया यांनी तात्काळ गुन्हे शाखा, एमआयडीसी युनीटच्या वरिष्ठ निरिक्षक गोपिका जहागिरदार यांना बोलावून घेत या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला.ही घटना ३ एप्रिलला साकिनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉलीडे इन हॉटेलमध्ये घडली. या मॉडेलला तिच्या कॉऑर्डीनेटर महिलेने हॉटेलमध्ये २ लाख रूपयांची रोकड आणण्यासाठी पाठवले होते. ती तेथे गेली तेव्हा संबंधीत व्यक्तीने(पैसे देणार्या) तिला हॉटेलच्या खोलीत बोलावले. तिला संशय व भीती वाटल्याने तिने खोलीत जाण्यास नकार दिला. तसेच मित्राला मदतीसाठी बोलावून घेतले. मित्र आल्यानंतर ते दोघे हॉटेलबाहेर पडले. मात्र त्याचवेळी तेथे एक खासगी गाडी धडकली. त्यातून खाली उतरलेल्या तीन तरूणांनी या दोघांना ताब्यात घेतले, गाडीत कोंबले व साकिनाका पोलीस ठाण्यात आणले. या सहाजणांमध्ये एपीआय खटापे, एपीआय सूर्यवंशी आणि पोलीस शिपाई कोदे यांचा सहभाग होता. उर्वरित तिघांमध्ये महिला व दोन तरूण होते, असे पिडीत मॉडेलने तक्रारीत म्हटले आहे़पोलीस अधिकार्यांनी मॉडेलवर वेश्या तर तिच्या मित्रावर दलाल असल्याचा आरोप केला. तिचे दागिने काढून घेतले. या दरम्यान तिचा विनयभंग केला. तसेच गुन्हा न नोंदविण्यासाठी व सुटकेसाठी मित्राकडून साडेचार लाख रूपये उकळले, असा आरोप आहे. मॉडेलने केलेला आरोप गंभीर आहे. दोन अधिकार्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, पोलीस दलाची बदनामी होऊ नये यासाठी कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया सहआयुक्त देवेन भारती यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)