शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

अरुणाचल सीमेलगत चीनची तीन नवीन गावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 05:05 IST

India-China News : गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

नवी दिल्ली : प्रत्यक्ष ताबा रेषेवर लडाखजवळ लष्करी तणाव सुरू असतानाच चीनने आता अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर नवीन कुरापत काढली आहे. या ठिकाणी तीन नवीन गावे चीनने वसवली असून तेथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शन्नान या प्रांतातून तीन हजारांहून अधिक लोकांचे भारताला लागून असलेल्या सीमारेषेवर पुनर्वसन करण्यासाठीही चीन प्रयत्नशील आहे.गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमाप्रदेशात आपल्या हद्दीत तीन नवीन गावे वसविल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी ही तीन नवीन गावे वसविण्यात आली आहेत ते ठिकाण भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषा जिथे एकत्र येतात त्या बुम ला खिंडीपासून अवघे पाच किमी अंतरावर आहे.२०१७ मध्ये भारत आणि चीन यांच्यात डोकलाम पठाराच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता. तीन महिने चाललेल्या या तणावानंतर उभय सैन्यांनी माघार घेतली. मात्र, अलीकडेच या डोकलाम पठारापासून नजीक भूतानच्या हद्दीत चीनने एक संपूर्ण गाव वसविल्याचे समोर आले. उल्लेखनीय म्हणजे चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट प्रांत मानतो. या प्रांताला खेटूनच ६५ हजार चौरस किमी परिसरावर चीन आपला हक्क सांगत असतो. या पार्श्वभूमीवर चीनने तीन नवीन गावे वसविणे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

वीज, पाणी, रस्ते आणि इंटरनेट सुविधाही उपलब्धया तीनही गावांमध्ये वीज, पाणी, रस्ते आणि इंटरनेट या पायाभूत सुविधाही चीनने उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शन्नान या प्रांतातून तीन हजारांहून अधिक लोकांना सीमारेषेवरील परिसरात राहण्यासाठी आणले जात आहे.दरम्यान, २०१७ मध्ये डोकलाम वाद निवळल्यानंतर चीन अरुणाचल प्रदेश सीमारेषेवर कुरापती काढण्याची शक्यता आहे, असा इशारा तीनही सेनादलांचे संयुक्त प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी दिला होता.  

वादग्रस्त सीमारेषांवर हानवंशीय वा तिबेटमधील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांची वस्ती निर्माण करायची आणि हळूहळू तेथील भूभाग काबीज करायचा, ही चीनची जुनीच खेळी आहे. - ब्रह्मा चेलानी, चीन विश्लेषक 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश