शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

अरुणाचल सीमेलगत चीनची तीन नवीन गावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 05:05 IST

India-China News : गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

नवी दिल्ली : प्रत्यक्ष ताबा रेषेवर लडाखजवळ लष्करी तणाव सुरू असतानाच चीनने आता अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर नवीन कुरापत काढली आहे. या ठिकाणी तीन नवीन गावे चीनने वसवली असून तेथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शन्नान या प्रांतातून तीन हजारांहून अधिक लोकांचे भारताला लागून असलेल्या सीमारेषेवर पुनर्वसन करण्यासाठीही चीन प्रयत्नशील आहे.गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमाप्रदेशात आपल्या हद्दीत तीन नवीन गावे वसविल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी ही तीन नवीन गावे वसविण्यात आली आहेत ते ठिकाण भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषा जिथे एकत्र येतात त्या बुम ला खिंडीपासून अवघे पाच किमी अंतरावर आहे.२०१७ मध्ये भारत आणि चीन यांच्यात डोकलाम पठाराच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता. तीन महिने चाललेल्या या तणावानंतर उभय सैन्यांनी माघार घेतली. मात्र, अलीकडेच या डोकलाम पठारापासून नजीक भूतानच्या हद्दीत चीनने एक संपूर्ण गाव वसविल्याचे समोर आले. उल्लेखनीय म्हणजे चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट प्रांत मानतो. या प्रांताला खेटूनच ६५ हजार चौरस किमी परिसरावर चीन आपला हक्क सांगत असतो. या पार्श्वभूमीवर चीनने तीन नवीन गावे वसविणे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

वीज, पाणी, रस्ते आणि इंटरनेट सुविधाही उपलब्धया तीनही गावांमध्ये वीज, पाणी, रस्ते आणि इंटरनेट या पायाभूत सुविधाही चीनने उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शन्नान या प्रांतातून तीन हजारांहून अधिक लोकांना सीमारेषेवरील परिसरात राहण्यासाठी आणले जात आहे.दरम्यान, २०१७ मध्ये डोकलाम वाद निवळल्यानंतर चीन अरुणाचल प्रदेश सीमारेषेवर कुरापती काढण्याची शक्यता आहे, असा इशारा तीनही सेनादलांचे संयुक्त प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी दिला होता.  

वादग्रस्त सीमारेषांवर हानवंशीय वा तिबेटमधील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांची वस्ती निर्माण करायची आणि हळूहळू तेथील भूभाग काबीज करायचा, ही चीनची जुनीच खेळी आहे. - ब्रह्मा चेलानी, चीन विश्लेषक 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश