शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अरुणाचल सीमेलगत चीनची तीन नवीन गावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 05:05 IST

India-China News : गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

नवी दिल्ली : प्रत्यक्ष ताबा रेषेवर लडाखजवळ लष्करी तणाव सुरू असतानाच चीनने आता अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर नवीन कुरापत काढली आहे. या ठिकाणी तीन नवीन गावे चीनने वसवली असून तेथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शन्नान या प्रांतातून तीन हजारांहून अधिक लोकांचे भारताला लागून असलेल्या सीमारेषेवर पुनर्वसन करण्यासाठीही चीन प्रयत्नशील आहे.गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच आता चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमाप्रदेशात आपल्या हद्दीत तीन नवीन गावे वसविल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी ही तीन नवीन गावे वसविण्यात आली आहेत ते ठिकाण भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषा जिथे एकत्र येतात त्या बुम ला खिंडीपासून अवघे पाच किमी अंतरावर आहे.२०१७ मध्ये भारत आणि चीन यांच्यात डोकलाम पठाराच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता. तीन महिने चाललेल्या या तणावानंतर उभय सैन्यांनी माघार घेतली. मात्र, अलीकडेच या डोकलाम पठारापासून नजीक भूतानच्या हद्दीत चीनने एक संपूर्ण गाव वसविल्याचे समोर आले. उल्लेखनीय म्हणजे चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट प्रांत मानतो. या प्रांताला खेटूनच ६५ हजार चौरस किमी परिसरावर चीन आपला हक्क सांगत असतो. या पार्श्वभूमीवर चीनने तीन नवीन गावे वसविणे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

वीज, पाणी, रस्ते आणि इंटरनेट सुविधाही उपलब्धया तीनही गावांमध्ये वीज, पाणी, रस्ते आणि इंटरनेट या पायाभूत सुविधाही चीनने उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शन्नान या प्रांतातून तीन हजारांहून अधिक लोकांना सीमारेषेवरील परिसरात राहण्यासाठी आणले जात आहे.दरम्यान, २०१७ मध्ये डोकलाम वाद निवळल्यानंतर चीन अरुणाचल प्रदेश सीमारेषेवर कुरापती काढण्याची शक्यता आहे, असा इशारा तीनही सेनादलांचे संयुक्त प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी दिला होता.  

वादग्रस्त सीमारेषांवर हानवंशीय वा तिबेटमधील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांची वस्ती निर्माण करायची आणि हळूहळू तेथील भूभाग काबीज करायचा, ही चीनची जुनीच खेळी आहे. - ब्रह्मा चेलानी, चीन विश्लेषक 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश