शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
5
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
6
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
7
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
8
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
9
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
10
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
11
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
12
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
13
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
14
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
15
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
16
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
17
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
18
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
19
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
20
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

"तीन चुका अन् त्यात केजरीवालांचं एक ब्लंडर...!" पीके यांनी स्पष्टच सांगितलं दिल्लीतील आपच्या पराभवाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:39 IST

आपचा हा पराभव तीन चुकांमुळे झाला, यात तर एक चूक खुद्द अरविंद केजरीवाल यांची आहे, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे...

दिल्लीतील गेल्या दोन वेळच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी प्रत्येकी ६७ आणि ६२ जागा जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) यावेळी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत आपला केवळ २२ जागाच मिळू शकल्या. तर भारतीय जनता पक्षाने तब्बल २७ वर्षांनंतर मोठा विजयसह दिल्लीत सत्तेवर आला. यातच आता आपच्या या पराभवासंदर्भात जन सूरजचे संस्थापक तथा निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर, यांनी मोठे भाष्य केले आहे. आपचा हा पराभव तीन चुकांमुळे झाला, यात तर एक चूक खुद्द अरविंद केजरीवाल यांची आहे, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "गवर्नेन्स, आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यासंदर्भात झालेल्या चुकांमुळे आम आदमी पक्षाचा पराभव झाला. ते म्हणाले, आपच्या पराभवाचा विचार करता, 'तीन-चार गोष्टी दिसत आहेत, एक म्हणजे, गवर्नन्सचा आभावामुळे निर्माण झालेली अॅन्टी इनकंबन्सी होती. या बाबतीत शिक्षण क्षेत्र सोडल्यास, इतर कुठलीही नवी गोष्ट जनतेला दिसली नाही. गव्हर्नन्स बॅकफुटवर दिसले, प्रामुख्याने गेल्या मानसूनमध्ये ज्या पद्धतीने पाणी साचले होते. 'मोहल्ला क्लिनिक' उध्वस्त झाले होते. यमुना नदी संदर्भातील आश्वासन, प्रदुषणाची समस्या, एकूणच काय तर, लोकांच्या जीवनाशी थेट संबंध असलेल्या विषयांसंदर्भात कुठलाही सुधारणा दिसली नाही. याचा परिणामही झाला असेलच.'

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, कधी 'इंडिया' आघाडीसोबत जाणे, कधी 'इंडिया' आघाडीतून दूर होणे, यामुळे त्यांचे दुहेरी नुकसान झाले. ते म्हणाले, 'पार्टी विथ डिफरन्स' टॅग घेऊन राजकारणात आलेला पक्ष हळू हळू कमकुवत झाला. त्यांचे I.N.D.I.A. मध्ये जाने, परत बाहेर पडणे, समजले नाही. आपण I.N.D.I.A. चा भाग आहात की नाही. लोकसभेत सोबत लढले. नंतर, विधानसभेत वेगळे झाले. यामुळे, एक जो मोठा वर्ग होता, जो म्हणत होता की, केंद्रात मोदी आणि खाली केजरीवाल तो आपल्या हातून निघून गेला. याशिवाय, आपण मोदींना हरवण्यासाठी I.N.D.I.A. सोबत रहावे असे ज्यांना वाटत होते, तेही आपल्यावर नाहाज झाले. असे आपचे दुहेरी नुकसान झाले.'

पीके पुढे म्हणाले, 'केजरीवाल यांची तिसरीचूक म्हणजे, जेव्हा केजरीवाल यांच्यावर दारू घोटाळ्याचा आरोप झाला, त्याच वेळी त्यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता.' याचा त्यांना फायदा झाला असता. लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली असती. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. यावेळी असा वर्गही नाराज झाला, ज्याला केजरीवाल हेच मुख्यमंत्री हवे होते. अर्थात, गव्हर्नन्स, राजकीय पोझिशन आणि राजीनामा, या तिनही गोष्टींमध्ये स्पष्टतेचा आभाव होता.'

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025