शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

"तीन चुका अन् त्यात केजरीवालांचं एक ब्लंडर...!" पीके यांनी स्पष्टच सांगितलं दिल्लीतील आपच्या पराभवाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:39 IST

आपचा हा पराभव तीन चुकांमुळे झाला, यात तर एक चूक खुद्द अरविंद केजरीवाल यांची आहे, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे...

दिल्लीतील गेल्या दोन वेळच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी प्रत्येकी ६७ आणि ६२ जागा जिंकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) यावेळी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत आपला केवळ २२ जागाच मिळू शकल्या. तर भारतीय जनता पक्षाने तब्बल २७ वर्षांनंतर मोठा विजयसह दिल्लीत सत्तेवर आला. यातच आता आपच्या या पराभवासंदर्भात जन सूरजचे संस्थापक तथा निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर, यांनी मोठे भाष्य केले आहे. आपचा हा पराभव तीन चुकांमुळे झाला, यात तर एक चूक खुद्द अरविंद केजरीवाल यांची आहे, असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "गवर्नेन्स, आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यासंदर्भात झालेल्या चुकांमुळे आम आदमी पक्षाचा पराभव झाला. ते म्हणाले, आपच्या पराभवाचा विचार करता, 'तीन-चार गोष्टी दिसत आहेत, एक म्हणजे, गवर्नन्सचा आभावामुळे निर्माण झालेली अॅन्टी इनकंबन्सी होती. या बाबतीत शिक्षण क्षेत्र सोडल्यास, इतर कुठलीही नवी गोष्ट जनतेला दिसली नाही. गव्हर्नन्स बॅकफुटवर दिसले, प्रामुख्याने गेल्या मानसूनमध्ये ज्या पद्धतीने पाणी साचले होते. 'मोहल्ला क्लिनिक' उध्वस्त झाले होते. यमुना नदी संदर्भातील आश्वासन, प्रदुषणाची समस्या, एकूणच काय तर, लोकांच्या जीवनाशी थेट संबंध असलेल्या विषयांसंदर्भात कुठलाही सुधारणा दिसली नाही. याचा परिणामही झाला असेलच.'

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, कधी 'इंडिया' आघाडीसोबत जाणे, कधी 'इंडिया' आघाडीतून दूर होणे, यामुळे त्यांचे दुहेरी नुकसान झाले. ते म्हणाले, 'पार्टी विथ डिफरन्स' टॅग घेऊन राजकारणात आलेला पक्ष हळू हळू कमकुवत झाला. त्यांचे I.N.D.I.A. मध्ये जाने, परत बाहेर पडणे, समजले नाही. आपण I.N.D.I.A. चा भाग आहात की नाही. लोकसभेत सोबत लढले. नंतर, विधानसभेत वेगळे झाले. यामुळे, एक जो मोठा वर्ग होता, जो म्हणत होता की, केंद्रात मोदी आणि खाली केजरीवाल तो आपल्या हातून निघून गेला. याशिवाय, आपण मोदींना हरवण्यासाठी I.N.D.I.A. सोबत रहावे असे ज्यांना वाटत होते, तेही आपल्यावर नाहाज झाले. असे आपचे दुहेरी नुकसान झाले.'

पीके पुढे म्हणाले, 'केजरीवाल यांची तिसरीचूक म्हणजे, जेव्हा केजरीवाल यांच्यावर दारू घोटाळ्याचा आरोप झाला, त्याच वेळी त्यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता.' याचा त्यांना फायदा झाला असता. लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली असती. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. यावेळी असा वर्गही नाराज झाला, ज्याला केजरीवाल हेच मुख्यमंत्री हवे होते. अर्थात, गव्हर्नन्स, राजकीय पोझिशन आणि राजीनामा, या तिनही गोष्टींमध्ये स्पष्टतेचा आभाव होता.'

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025