शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान, शस्त्रास्त्र जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 08:39 IST

रविवारी सकाळी जम्मू काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत लष्कराला तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.

ठळक मुद्दे रविवारी सकाळी जम्मू काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराला तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरलं होतं तसंच दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू होता.

श्रीनगर- रविवारी सकाळी जम्मू काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत लष्कराला तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरलं होतं तसंच दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू होता. लष्कराने संपूर्ण परिसराची नाकाबंदीही केली होती. रविवारी रात्री उशिरा तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराने या तीन दहशतवाद्यांकडून 2 एके 47 रायफल, एक एके युबीजीएल, काही ग्रेनेड्स, पेट्रोल बॉम्ब, 2 आयईडीएस आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. रविवारी सकाळी चकमक सुरू झाल्यावर स्थानिक नागरिकांना चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.  

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांकडून सुरू असलेले ऑपरेशन ऑल आऊट बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचं सांगितलं. तसेच काश्मीर खोऱ्यातील विशेषत: दक्षिण काश्मिरमधील परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दहशतवादाच्या मार्गाने जाऊन हातात हत्यार घेणाऱ्या काश्मिरी तरुणांनी दहशतवादाचा रस्ता सोडावा, असं आवाहन त्यांनी केलं.  

दरम्यान,  पाकिस्तानी सैन्याने जम्मू, सांबा आणि पूंछ जिल्ह्यात भारतीय सीमांवरील चौक्या, तसंच नागरी वस्त्यांवर शनिवारी रात्रभर गोळीबार केला. यात बीएसएफचे दोन जवान आणि पाच गावकरी जखमी झाले. सीमावर्ती भागातील २० गावांना पाकिस्तानने लक्ष्य केल्याने, या भागातील शेकडो लोकांना घर सोडून जावं लागत आहे. गत काही दिवसांत अरणिया आणि आरएस पुरा या भागातील २० हजार लोकांनी गाव सोडलं आहे.

अधिका-यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने अरणिया, आरएस पुरा आणि रामगढ सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळपासून गोळीबार सुरूके ला. गोळीबारात आरएस पुरा सेक्टरच्या सतोवाली गावात तीन लोक जखमी झाले. अरणिया सेक्टरमध्ये एक जण जखमी झाला. सांबाच्या रामगढ सेक्टरमध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. पूंछ भागात पाकच्या गोळीबारात ८ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. पोलिसांनी ५०० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यांना शिबिरात ठेवले आहे.

पाकिस्तानने १३ ते १८ सप्टेंबर सातत्याने गोळीबार केला. दोन दिवसांनंतर, २१ तारखेपासून गोळीबार सुरू झाला आहे. त्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. या वर्षी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या २८५ घटना घडल्या आहेत. ही संख्या २०१६ मध्ये २२८ होती. सीमेवर सतत होणा-या गोळीबारामुळे अनिता कुमार यांच्यासारखी अनेक कुटुंबे भीतीच्या छायेत जगत आहेत. त्यांना गुरुवारी रात्री घरात पलंगाखाली लपून राहावे लागले. या गोळीबाराला त्रासून घर सोडण्याचा निर्णय त्यांनी शुक्रवारी घेतला

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू काश्मिरIndian Armyभारतीय जवान