शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाटपारा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपाकडून त्रिसदस्यीय समिती गठीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 09:04 IST

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 2109 हिंसक घटनांची नोंद झाली आहे. टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढतच चालला असून हिंसा भडकविण्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर केला जात आहे.

भाटपारा - पश्चिम बंगालमधील भाटपारा शहरातील परिस्थिती अजूनही तणापूर्ण आहे. भाजपाकडून भाटपारा हिंसाचारानिमित्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाटपारा हिंसाचाराविरोधात चौकशीसाठी भाजपाची समिती स्थापन केली आहे. ही समिती शनिवारी भाटपारा येथे भेट देऊन घडलेल्या घटनेचा निषेध करतील तसेच ही समिती भाटपाडा येथील घटनास्थळाची पाहणी करुन आपला अहवाल अमित शाह यांच्याकडे सादर करतील.

पश्चिम बंगाल येथील भाटपाडा येथे गुरूवारी झालेल्या हिंसाचारा दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. भाजपा आणि टीएमसीच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली होती. या हिंसाचाराविरोधात शुक्रवारी भाजपाने विरोध प्रदर्शने केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.  परिसरातील तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांकडून त्याठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं होतं. त्यानंतरही भाजपाच्या समर्थकांनी मोर्चा काढला. 

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 2109 हिंसक घटनांची नोंद झाली आहे. टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढतच चालला असून हिंसा भडकविण्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर केला जात आहे. भाटपारा हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. 

भाटपारामधील कायदा-सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती लक्षात घेता तिथे नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले होते. त्याचे पोलीस महासंचालक वीरेंद्रकुमार यांच्या हस्ते सोमवारी सकाळी उद्घाटन होणार होते. त्याच्या काही तास आधी या परिसरात पुन्हा हिंसाचार उफाळला होता. भातपारामध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन जण मरण पावल्याचा भाजपाने केलेला आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे. जमावाला पांगविण्यासाठी फक्त अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, भातपारातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्या पक्षाचे एक शिष्टमंडळ तिथे जाणार आहे.

प. बंगालमधील एकेकाळच्या हिंसाचारग्रस्त जंगलमहल, दार्जिलिंगसारखी सध्या भातपाराची अवस्था झाली आहे. भातपारामध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प. बंगालचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव व अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात आली. भातपारामध्ये १९ मे रोजी विधानसभेची पोटनिवडणुक घेण्यात आली. तेव्हापासून या परिसरात तृणमूल काँग्रेस व भाजपत सातत्याने हिंसक संघर्ष होत आहे. गावठी बॉम्ब हल्ला प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा