शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गमती-गमतीत ट्रेनमध्ये बसल्या तीन मुली, आई-वडिलांनी घेतली पोलीस ठाण्यात धाव, अखेर रात्री ११ वाजता... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:17 IST

Uttar Pradesh News: एकट्याने फिरायला जायचा प्लॅन करून गमती-गमतीत तीन मुली ट्रेनमध्ये चढून प्रवासाला निघाल्याने कुटुंबीयांच्या तोंडचं पाणी पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकट्याने फिरायला जायचा प्लॅन करून गमती-गमतीत तीन मुली ट्रेनमध्ये चढून प्रवासाला निघाल्याने कुटुंबीयांच्या तोंडचं पाणी पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत एकमेकींसोबत कुठेतरी फिरायला जायचं ठरवून या मुली रेल्वेत बसून प्रवासाला निघाल्या होत्या. मात्र वाटेत पैसे संपल्याने घाबरून लखनौ स्टेशनवर उतरल्या. मात्र यादरम्यान, कुटुंबीयांनी पोलिसांना खबर दिल्याने वेळीच तपासाला सुरुवात होऊन या मुलींचा शोध घेण्यात यश मिळाले.

ही घटना उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बांसडीह पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या केवरा गावात घडली असून, या कुटुंबातील आठ आणि नऊ वर्षांच्या दोन मुली फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. या मुलींचे वडील पिंटू यांनी सांगितले की, त्यांच्या दोन मुली शाळेमध्ये गेल्या असताना मैत्रिणीसोबत त्यांचं काही बोलणं झालं. त्यावेळी त्यांनी कुठेतरी फिरायला जाण्याचं ठरवलं. त्यानंतर या मुली बलिया रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये बसल्या. ट्रेन पुढच्या प्रवासाला निघाल्यावर वाटेत या मुलींकडे असलेले पैसे संपले. त्यामुळे आता माघारी कसं फिरायचं, असा प्रश्न त्यांना पडला आणि त्या घाबरल्या.

दरम्यान, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या मुली लखनौ रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. अनोळख्या ठिकाणी आल्याने त्या गोंधळल्या. घाबरलेल्या स्थितीत त्या ट्रेनमधून उतरल्या. एकडे मुली अचानक गायब झाल्याने त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईकांच्या तोंडचे पाणी पळाले. खूप शोधाशोध केल्यानंतर अखेरीस त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवली आणि मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेरीस एका ऑटोवाल्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले आणि कुटुंबीयांना त्या सापडल्याची माहिती दिली. घडल्या प्रकारामुळे या तिन्ही मुली खूप घाबरल्या होत्या, अखेरीस आई-वडिलांची भेट होताच त्या अगदी भावूक होऊन त्यांना बिलगल्या.

दरम्यान, या घटनेबाबत बांसडीहचे पोलीस ठाणे प्रमुख संजय सिंह यांनी सांगितले की, सीडब्ल्यूसीसमोर हजर केल्यानंतर या मुलींना नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आलं आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश