शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गमती-गमतीत ट्रेनमध्ये बसल्या तीन मुली, आई-वडिलांनी घेतली पोलीस ठाण्यात धाव, अखेर रात्री ११ वाजता... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:17 IST

Uttar Pradesh News: एकट्याने फिरायला जायचा प्लॅन करून गमती-गमतीत तीन मुली ट्रेनमध्ये चढून प्रवासाला निघाल्याने कुटुंबीयांच्या तोंडचं पाणी पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकट्याने फिरायला जायचा प्लॅन करून गमती-गमतीत तीन मुली ट्रेनमध्ये चढून प्रवासाला निघाल्याने कुटुंबीयांच्या तोंडचं पाणी पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत एकमेकींसोबत कुठेतरी फिरायला जायचं ठरवून या मुली रेल्वेत बसून प्रवासाला निघाल्या होत्या. मात्र वाटेत पैसे संपल्याने घाबरून लखनौ स्टेशनवर उतरल्या. मात्र यादरम्यान, कुटुंबीयांनी पोलिसांना खबर दिल्याने वेळीच तपासाला सुरुवात होऊन या मुलींचा शोध घेण्यात यश मिळाले.

ही घटना उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बांसडीह पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या केवरा गावात घडली असून, या कुटुंबातील आठ आणि नऊ वर्षांच्या दोन मुली फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. या मुलींचे वडील पिंटू यांनी सांगितले की, त्यांच्या दोन मुली शाळेमध्ये गेल्या असताना मैत्रिणीसोबत त्यांचं काही बोलणं झालं. त्यावेळी त्यांनी कुठेतरी फिरायला जाण्याचं ठरवलं. त्यानंतर या मुली बलिया रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये बसल्या. ट्रेन पुढच्या प्रवासाला निघाल्यावर वाटेत या मुलींकडे असलेले पैसे संपले. त्यामुळे आता माघारी कसं फिरायचं, असा प्रश्न त्यांना पडला आणि त्या घाबरल्या.

दरम्यान, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या मुली लखनौ रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. अनोळख्या ठिकाणी आल्याने त्या गोंधळल्या. घाबरलेल्या स्थितीत त्या ट्रेनमधून उतरल्या. एकडे मुली अचानक गायब झाल्याने त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईकांच्या तोंडचे पाणी पळाले. खूप शोधाशोध केल्यानंतर अखेरीस त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवली आणि मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेरीस एका ऑटोवाल्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले आणि कुटुंबीयांना त्या सापडल्याची माहिती दिली. घडल्या प्रकारामुळे या तिन्ही मुली खूप घाबरल्या होत्या, अखेरीस आई-वडिलांची भेट होताच त्या अगदी भावूक होऊन त्यांना बिलगल्या.

दरम्यान, या घटनेबाबत बांसडीहचे पोलीस ठाणे प्रमुख संजय सिंह यांनी सांगितले की, सीडब्ल्यूसीसमोर हजर केल्यानंतर या मुलींना नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आलं आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश