शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

उष्णतेच्या लाटेने होरपळ; वाराणसीत तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 11:17 IST

प्रयागराज @ ४६.९ अंश सेल्सिअस; देशातील सर्वांत उष्ण शहर, शाळांच्या सुट्टया वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : उत्तर प्रदेशातील उष्णतेची लाट कायम आहे. परिस्थिती एवढी भीषण झाली आहे की, लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांच्या उन्हाळी सुट्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना आता २८ जूनपर्यंत सुट्या असतील. यापूर्वी सुट्या १५ जूनपर्यंत होत्या. दरम्यान, वाराणसीत आज उष्णतेमुळे महिला पर्यटकांसह ३ जणांचा मृत्यू झाला. पुढील काही दिवस दिल्ली आणि उत्तर भारतीय राज्यांमध्ये असेच हवामान राहण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशसह पाच राज्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्यानुसार, मान्सून १५ जून रोजी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल होऊ शकतो. त्यामुळे या सर्व राज्यांमधील लोकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा केंद्रबिंदू

- राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतीय राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. अनेक राज्यांमध्ये पारा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे देशातील सर्वांत उष्ण शहर ठरले. तेथे कमाल तापमान ४६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गोरखपूरमध्ये दुपारी ४ वाजता ४२ अंश तापमान होते. राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास आणखी सात दिवसांचा अवधी आहे.

- दिल्लीपासून बिहार, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशपर्यंत कमाल तापमान ४५ अंशांच्या आसपास राहिले.

टॅग्स :VaranasiवाराणसीHeat Strokeउष्माघात