शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

"नितीश कुमारांनी भाजपापासून लांब राहावे, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ", डीजीपींच्या फोनवर धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 10:27 IST

डीजीपी आरएस भट्टी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.

Nitish Kumar (Marathi News) पाटणा : बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यापासून काही घडामोडी सुरु आहेत. यातच बिहारचे डीजीपी आरएस भट्टी यांना फोनवर धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपापासून लांब राहावे, अन्यथा त्यांना बॉम्बने उडवून देऊ आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना ठार मारू, असे म्हटले आहे. 

डीजीपी आरएस भट्टी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. यावर, बिहार पोलिसांनीही तातडीने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपासानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कर्नाटकात छापेमारी करून आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी रात्री उशिरा आरोपीसह पाटणा येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडली होती आणि त्यांच्या जुन्या आघाडी एनडीएसोबत सरकार स्थापन केले होते. यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 12 जानेवारी रोजी 243 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 ऐवजी 129 आमदारांचा पाठिंबा मिळवून एनडीए सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. मात्र, नितीश कुमार महाआघाडी सोडून भाजपामध्ये दाखल झाल्यामुळे अनेक प्रकारचे नाराजी पाहायला मिळत आहे.

नितीश कुमारांच्या निर्णयावर जेडीयूमध्ये नाराजी!नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याने जेडीयू आणि भाजपामधील अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. यानुसार, जेडीयूचे डॉ.संजीव, विमा भारती आणि दिलीप राय यांच्यातील नाराजी सर्वश्रुत झाला आहे. याशिवाय, इतर अनेक आमदारांनीही नितीश कुमार यांच्या एनडीएमध्ये जाण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. त्यात गोपाल मंडल, मनोज यादव असे आमदारही आहेत. तसेच रश्मी वर्मा, भागीरथी देवी आणि मिश्रीलाल यादव यांची बंडखोरी सुद्धा बिहार भाजपामध्ये दिसून आली. मात्र, त्यांची नाराजी इतर कारणांमुळे असल्याचे बोलले जात असले तरी नितीश कुमार यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर हे सर्व समोर येऊ लागले आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना सहजासहजी सरकार चालवणे सोपे नाही, हे उघड होत आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार