शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम; ३ महिने खबरदारी घेणं गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 05:24 IST

Coronavirus in India: महाराष्ट्रात १५ टक्के रुग्ण, ६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांहून अधिक आहे. यात अरुणाचल प्रदेशातील ७ आणि  आसाममधील ५ जिल्ह्यांसह २८ जिल्ह्यांत हा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे

ठळक मुद्देदेशभरात ७१ टक्के प्रौढांना एक डोस आणि २७ टक्के प्रौढांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.रशियातील स्थिती वाईट असल्याने स्पुटनिक लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत आहेत.विषाणूचे नवे रूप शोधण्यासाठी ७० हजार नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली

नितीन अग्रवालनवी दिल्ली :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप पुरता टळलेला नाही. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असले तरी सण, उत्सव आणि लग्नसराईमुळे पुढील तीन महिने अत्यंत सावधगिरी बाळगणे  जरूरी आहे, असे आवाहन सरकारने लोकांना केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांच्या अधिक धोकादायक पातळीपेक्षाही जास्त आहे. देशभरातील एकूण रुग्णसंख्या सध्या २.४४ लाख आहे. यापैकी महाराष्ट्रात ३६,७६७ आणि केरळमध्ये १.२२ लाख रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील एकूण रुग्णांपैकी केरळमध्ये ५०.७३ टक्के आणि महाराष्ट्रात १५.०६ टक्के रुग्ण आहेत. याशिवाय मिझोराममध्ये १६,६३७, कर्नाटकात ११,८४८ रुग्ण आहेत. 

मिझोराममध्ये नवीन रुग्ण आढळण्याचा दर सर्वाधिक २१.६४ टक्के आहे. केरळमध्ये १३.७२ टक्के आणि सिक्कीममध्ये १२.७६ टक्के लोकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. या ठिकाणी धोका अजूनही कायम आहे. निष्काळजीपणा केल्यास रुग्णवाढीचा दर धोकादायक पातळी गाठू शकतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरदरम्यान नवरात्र, दसरा, दुर्गापूजा, दिवाळी, ईद आणि  नाताळ, तसेच नवीन वर्ष यासारखे सण, उत्सव साजरे होत नसल्याने हे तीन महिने अत्यंत सावधगिरी बाळगणे जरूरी आहे. आगामी सण, उत्सव  लोकांनी घरीच राहून ऑनलाइन साजरे करावेत, असा सल्लाही अग्रवाल यांनी दिला आहे. 

निति आयोगाने सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांनी अमेरिका आणि ब्रिटनचे उदाहरण देत सांगितले की, धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासह लसीचे दोन्ही डोस घेणे  जरूरी आहे. झायडसच्या विनाइंजेक्शनची  लस देण्याचे प्रशिक्षण दिले जात असून, ही लस लवकरच देण्यास सुरुवात होईल. रशियातील स्थिती वाईट असल्याने स्पुटनिक लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत आहेत. कोरोनाचा विषाणूच्या नवीन स्वरूपाबाबत त्यांनी सांगितले की, यावर सातत्याने लक्ष दिले जात आहे. विषाणूचे नवे रूप शोधण्यासाठी ७० हजार नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. 

३४ जिल्ह्यांत रुग्णांचा दर १० टक्के६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांहून अधिक आहे. यात अरुणाचल प्रदेशातील ७ आणि  आसाममधील ५ जिल्ह्यांसह २८ जिल्ह्यांत हा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. केरळच्या १३, मिझोरामच्या ७ जिल्ह्यांसह ३४ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांहून जास्त आहे. ९२.७७ कोटी लोकांना देशभरात लस देण्यात आली असून, यापैकी ६७.०२ कोटी लोकांना एक डोस आणि २५.७५ कोटी लोकांना दोन डोस देण्यात आले आहेत. देशभरात ७१ टक्के प्रौढांना एक डोस आणि २७ टक्के प्रौढांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या