शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम; ३ महिने खबरदारी घेणं गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 05:24 IST

Coronavirus in India: महाराष्ट्रात १५ टक्के रुग्ण, ६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांहून अधिक आहे. यात अरुणाचल प्रदेशातील ७ आणि  आसाममधील ५ जिल्ह्यांसह २८ जिल्ह्यांत हा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे

ठळक मुद्देदेशभरात ७१ टक्के प्रौढांना एक डोस आणि २७ टक्के प्रौढांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.रशियातील स्थिती वाईट असल्याने स्पुटनिक लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत आहेत.विषाणूचे नवे रूप शोधण्यासाठी ७० हजार नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली

नितीन अग्रवालनवी दिल्ली :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप पुरता टळलेला नाही. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असले तरी सण, उत्सव आणि लग्नसराईमुळे पुढील तीन महिने अत्यंत सावधगिरी बाळगणे  जरूरी आहे, असे आवाहन सरकारने लोकांना केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांच्या अधिक धोकादायक पातळीपेक्षाही जास्त आहे. देशभरातील एकूण रुग्णसंख्या सध्या २.४४ लाख आहे. यापैकी महाराष्ट्रात ३६,७६७ आणि केरळमध्ये १.२२ लाख रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील एकूण रुग्णांपैकी केरळमध्ये ५०.७३ टक्के आणि महाराष्ट्रात १५.०६ टक्के रुग्ण आहेत. याशिवाय मिझोराममध्ये १६,६३७, कर्नाटकात ११,८४८ रुग्ण आहेत. 

मिझोराममध्ये नवीन रुग्ण आढळण्याचा दर सर्वाधिक २१.६४ टक्के आहे. केरळमध्ये १३.७२ टक्के आणि सिक्कीममध्ये १२.७६ टक्के लोकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. या ठिकाणी धोका अजूनही कायम आहे. निष्काळजीपणा केल्यास रुग्णवाढीचा दर धोकादायक पातळी गाठू शकतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरदरम्यान नवरात्र, दसरा, दुर्गापूजा, दिवाळी, ईद आणि  नाताळ, तसेच नवीन वर्ष यासारखे सण, उत्सव साजरे होत नसल्याने हे तीन महिने अत्यंत सावधगिरी बाळगणे जरूरी आहे. आगामी सण, उत्सव  लोकांनी घरीच राहून ऑनलाइन साजरे करावेत, असा सल्लाही अग्रवाल यांनी दिला आहे. 

निति आयोगाने सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांनी अमेरिका आणि ब्रिटनचे उदाहरण देत सांगितले की, धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासह लसीचे दोन्ही डोस घेणे  जरूरी आहे. झायडसच्या विनाइंजेक्शनची  लस देण्याचे प्रशिक्षण दिले जात असून, ही लस लवकरच देण्यास सुरुवात होईल. रशियातील स्थिती वाईट असल्याने स्पुटनिक लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत आहेत. कोरोनाचा विषाणूच्या नवीन स्वरूपाबाबत त्यांनी सांगितले की, यावर सातत्याने लक्ष दिले जात आहे. विषाणूचे नवे रूप शोधण्यासाठी ७० हजार नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. 

३४ जिल्ह्यांत रुग्णांचा दर १० टक्के६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांहून अधिक आहे. यात अरुणाचल प्रदेशातील ७ आणि  आसाममधील ५ जिल्ह्यांसह २८ जिल्ह्यांत हा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. केरळच्या १३, मिझोरामच्या ७ जिल्ह्यांसह ३४ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांहून जास्त आहे. ९२.७७ कोटी लोकांना देशभरात लस देण्यात आली असून, यापैकी ६७.०२ कोटी लोकांना एक डोस आणि २५.७५ कोटी लोकांना दोन डोस देण्यात आले आहेत. देशभरात ७१ टक्के प्रौढांना एक डोस आणि २७ टक्के प्रौढांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या