शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नरेंद्र मोदी व उद्दाम सरकारमुळे राज्यघटना धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 5:39 AM

देशात आणीबाणी लादण्यावरून काँग्रेसवर लोकशाही व राज्यघटनेच्या गळचेपीचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता

नवी दिल्ली : देशात आणीबाणी लादण्यावरून काँग्रेसवर लोकशाही व राज्यघटनेच्या गळचेपीचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या राजवटीतीतच घटनात्मक लोकशाही संस्थांना पद्धतशीरपणे सुरुंग लावला जात आहे, असे खरमरीत प्रत्युत्तर काँग्रेसने मंगळवारी दिले.आणीबाणीच्या ४३व्या वर्षदिनानिमित्त केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवर तीन भागांमध्ये ब्लॉग लिहून काँग्रेसवर टीका केली व पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली. तेच सूत्र पकडून पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी मुंबईतील कार्यक्रमात एका कुटुंबाची (गांधी-नेहरू) सत्ता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसने राज्यघटना गुंडाळून ठेवून आणीबाणीत संपूर्ण देशाला तुरुंग करून टाकले, असा आरोप केला.काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी टिष्ट्वटरवर जेटली व मोदींच्या या टीकेचा खरपूस समाचार घेतला. मोदींच्या वक्तव्याचा संदर्भ न देता शर्मा यांनी लिहिले की, भारतात सध्या एकाधिकारशाही पंतप्रधान व उद्दाम सरकारच्या देखरेखीखाली सर्व घटनात्मक संस्थांना सुरुंग लावून सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे.जेटलींनी इंदिरा गांधींशी केलेली तुलना ‘हास्यास्पद, अपमानकारक व इतिहासाचा विपर्यास करणारी’ आहे, असे नमूद करून त्यांनी लिहिले की, इंदिराजी त्यांच्या काळातील उत्तुंग नेत्या व लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधान होत्या. इंदिराजींचे लोकनियुक्त सरकार असंवैधानिक व लोकशाहीविरोधी पद्धतीने उलथून टाकण्याचे प्रयत्न झाल्याने आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी लादणे गैर होते, हे मान्य करून इंदिराजींनी नंतर खेदही व्यक्त केला होता.जेटलींना ‘सोईस्कर स्मृतिभ्रंश’ झाल्याचे दिसते, असा टोमणा मारत शर्मा यांनी म्हटले की, हुकूमशहा कधी निवडणुका घेत नसतात, परंतु इंदिराजींनी आणीबाणी उठवून निवडणूक घेतली व पराभव विनम्रतेने स्वीकारला, याची आठवण भाजपाला करून देण्याची गरज आहे. जनतेने पुन्हा १९८०च्या निवडणुकीत इंदिराजींना भरघोस बहुमताने निवडून दिले व त्यांच्यामागे हात धुऊन लागलेल्यांना इतिहासाच्या कचराकुंडीत फेकून वादावर निर्णायक फैसला दिला होता.